शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

रत्नागिरी जिल्ह्यातून कर्जमाफीसाठी १९४८ अर्ज, ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 17:19 IST

महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत.

ठळक मुद्देअद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत. जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांनी भरले आॅनलाईन अर्ज

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत. या योजनेंतर्गत सन २००१ ते २००९ अखेर कर्जमाफी घोषित केल्यानंतर जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत.सलग चार वर्षे (२०१२ ते २०१६) अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे ते नव्याने कर्ज घेऊ शकलेले नाहीत. राज्य शासनाने २०१७मध्ये थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफी जाहीर केली.

या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी, दीड लाखावरील शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६पर्यंत थकबाकीदार असतील त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता.शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची राज्य शासनाने पुरवलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती. जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांचे मिळून ६१ हजार ४४१ शेतकरी आहेत.

त्यातील ४७ हजार १९४ शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केल्याने ते कर्जमाफीसाठी पात्र झाले होते. पात्र शेतकऱ्यांची माहिती भरून घेण्यात आली. राज्य शासनाकडून केलेल्या छाननीत जून २०१८पर्यंत ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांचे ६७ कोटी ३४ लाखांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. अद्याप १२ हजार ६१३ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही.सन २००१ ते २००९ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. परंतु, त्या कालावधीत झालेल्या कर्जमाफीचे लाभार्थी झाले नाहीत, अशा पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली होती. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १,९४८ आॅनलाईन अर्ज शेतकऱ्यांकडून सादर करण्यात आले आहेत.

शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ ग्रीनलीस्ट देण्यात आल्या. काही कर्जदारांचा समावेश यलो लीस्टमध्ये करण्यात आला. जुन्या यादीप्रमाणे १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून, त्यांचा कोणत्या यादीत समावेश करणार, हे स्पष्ट झालेले नाही.

राज्य शासनाकडून आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत दोनवेळा वाढवली होती. त्याचवेळी २००१ ते २००९ या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ दिला होता. त्यामुळे १५ जूनपर्यंत नव्याने आॅनलाईन माहिती भरण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी झाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी