शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

रत्नागिरी जिल्ह्यातून कर्जमाफीसाठी १९४८ अर्ज, ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 17:19 IST

महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत.

ठळक मुद्देअद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत. जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांनी भरले आॅनलाईन अर्ज

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत. या योजनेंतर्गत सन २००१ ते २००९ अखेर कर्जमाफी घोषित केल्यानंतर जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत.सलग चार वर्षे (२०१२ ते २०१६) अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे ते नव्याने कर्ज घेऊ शकलेले नाहीत. राज्य शासनाने २०१७मध्ये थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफी जाहीर केली.

या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी, दीड लाखावरील शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६पर्यंत थकबाकीदार असतील त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता.शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची राज्य शासनाने पुरवलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती. जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांचे मिळून ६१ हजार ४४१ शेतकरी आहेत.

त्यातील ४७ हजार १९४ शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केल्याने ते कर्जमाफीसाठी पात्र झाले होते. पात्र शेतकऱ्यांची माहिती भरून घेण्यात आली. राज्य शासनाकडून केलेल्या छाननीत जून २०१८पर्यंत ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांचे ६७ कोटी ३४ लाखांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. अद्याप १२ हजार ६१३ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही.सन २००१ ते २००९ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. परंतु, त्या कालावधीत झालेल्या कर्जमाफीचे लाभार्थी झाले नाहीत, अशा पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली होती. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १,९४८ आॅनलाईन अर्ज शेतकऱ्यांकडून सादर करण्यात आले आहेत.

शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ ग्रीनलीस्ट देण्यात आल्या. काही कर्जदारांचा समावेश यलो लीस्टमध्ये करण्यात आला. जुन्या यादीप्रमाणे १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून, त्यांचा कोणत्या यादीत समावेश करणार, हे स्पष्ट झालेले नाही.

राज्य शासनाकडून आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत दोनवेळा वाढवली होती. त्याचवेळी २००१ ते २००९ या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ दिला होता. त्यामुळे १५ जूनपर्यंत नव्याने आॅनलाईन माहिती भरण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी झाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी