शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातून कर्जमाफीसाठी १९४८ अर्ज, ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 17:19 IST

महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत.

ठळक मुद्देअद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत. जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांनी भरले आॅनलाईन अर्ज

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात येत असतानाच जिल्ह्यातील एकूण ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांना ६८ कोटी ३४ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र, अद्याप १२ हजार ६१३ शेतकरी प्रतीक्षा यादीत आहेत. या योजनेंतर्गत सन २००१ ते २००९ अखेर कर्जमाफी घोषित केल्यानंतर जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत.सलग चार वर्षे (२०१२ ते २०१६) अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे ते नव्याने कर्ज घेऊ शकलेले नाहीत. राज्य शासनाने २०१७मध्ये थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफी जाहीर केली.

या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी, दीड लाखावरील शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रूपयांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. २००९-१० ते २०१५-१६ या कालावधीत कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६पर्यंत थकबाकीदार असतील त्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता.शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची राज्य शासनाने पुरवलेल्या कॉलम १ ते ६६ नमुन्याप्रमाणे आॅनलाईन माहिती भरून दिली होती. जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांचे मिळून ६१ हजार ४४१ शेतकरी आहेत.

त्यातील ४७ हजार १९४ शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केल्याने ते कर्जमाफीसाठी पात्र झाले होते. पात्र शेतकऱ्यांची माहिती भरून घेण्यात आली. राज्य शासनाकडून केलेल्या छाननीत जून २०१८पर्यंत ३४ हजार ५८१ शेतकऱ्यांचे ६७ कोटी ३४ लाखांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. अद्याप १२ हजार ६१३ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही.सन २००१ ते २००९ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. परंतु, त्या कालावधीत झालेल्या कर्जमाफीचे लाभार्थी झाले नाहीत, अशा पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली होती. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १,९४८ आॅनलाईन अर्ज शेतकऱ्यांकडून सादर करण्यात आले आहेत.

शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ ग्रीनलीस्ट देण्यात आल्या. काही कर्जदारांचा समावेश यलो लीस्टमध्ये करण्यात आला. जुन्या यादीप्रमाणे १२ हजार ६१३ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून, त्यांचा कोणत्या यादीत समावेश करणार, हे स्पष्ट झालेले नाही.

राज्य शासनाकडून आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत दोनवेळा वाढवली होती. त्याचवेळी २००१ ते २००९ या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ दिला होता. त्यामुळे १५ जूनपर्यंत नव्याने आॅनलाईन माहिती भरण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १,९४८ शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी झाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी