शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

रत्नागिरी जिल्ह्यात १५३७ निवडणूक साक्षरता क्लब, प्रशासनाची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:47 IST

लोकशाही प्रणाली, निवडणूक आयोग आणि त्याचे कामकाज, लोकप्रतिनिधी अधिनियम आदींबाबत नवमतदारांमध्ये जाणीव जागृती व्हावी, यातून सुजाण नागरिक तयार व्हावेत, या उद्देशाने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाकडून १५३७ निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात १५३७ निवडणूक साक्षरता क्लब, प्रशासनाची मोहीम नवमतदारांमध्ये जाणीव जागृतीसुजाण भावी मतदार घडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मोहीम

शोभना कांबळेरत्नागिरी : लोकशाही प्रणाली, निवडणूक आयोग आणि त्याचे कामकाज, लोकप्रतिनिधी अधिनियम आदींबाबत नवमतदारांमध्ये जाणीव जागृती व्हावी, यातून सुजाण नागरिक तयार व्हावेत, या उद्देशाने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाकडून १५३७ निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले आहेत.अजूनही नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत अनभिज्ञता आहे. त्यामुळे लोकशाही प्रणाली यशस्वीपणे राबवताना अनेक अडचणी येत आहेत. अजूनही मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग १०० टक्के नाही. त्यामुळे पात्र उमेदवार निवडून येत नाहीत. त्यामुळे सर्वच निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये त्याचबरोबर नवमतदारांमध्ये जाणीव जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात निवडणूक साक्षरता क्लब तयार करण्याची प्रक्रिया जानेवारी २०१८पासून सुरू झाली आहे.विद्यार्थीदशेत या विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक कार्यपद्धती याबाबत जागृती होत राहिल्याने हे विद्यार्थी १८ वर्षांचे झाल्यानंतर ते आपोआपच सुजाण नागरिक होणार आहेत. यासाठी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

निवडणूक साक्षरता क्लब शाळा, महाविद्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापन करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाकडून सुरू रहाणार आहे. याकरिता दिल्ली येथील निवडणूक कार्यालयाकडून कार्यालयीन निधी तसेच याबाबतचे साहित्य जिल्हास्तरावर लवकरच उपलब्ध होणार आहे.

तसेच येथील निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्ली येथे याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार असून ते कर्मचारी इथ आल्यानंतर प्रशिक्षण घेणार आहेत. हे साक्षरता क्लब लोकशाही प्रणालीबाबत जागरूकता निर्माण करणार असून लोकशाही कशी बळकट होणे आवश्यक आहेत, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.जिल्ह्यात स्थापन झालेले निवडणूक साक्षरता क्लबशाळा, कनिष्ठ महाविद्यालय स्तर : १८७नव मतदार (वरिष्ठ महाविद्यालय स्तर) : ६५मतदान केंद्र स्तरावर : १२०२तसेच मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये ८३ क्लब स्थापन करण्यात आले असून, ही प्रक्रिया यापुढेही विविध शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था यांमध्ये सुरू रहाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक