शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

रत्नागिरी जिल्ह्यात १५३७ निवडणूक साक्षरता क्लब, प्रशासनाची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:47 IST

लोकशाही प्रणाली, निवडणूक आयोग आणि त्याचे कामकाज, लोकप्रतिनिधी अधिनियम आदींबाबत नवमतदारांमध्ये जाणीव जागृती व्हावी, यातून सुजाण नागरिक तयार व्हावेत, या उद्देशाने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाकडून १५३७ निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात १५३७ निवडणूक साक्षरता क्लब, प्रशासनाची मोहीम नवमतदारांमध्ये जाणीव जागृतीसुजाण भावी मतदार घडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मोहीम

शोभना कांबळेरत्नागिरी : लोकशाही प्रणाली, निवडणूक आयोग आणि त्याचे कामकाज, लोकप्रतिनिधी अधिनियम आदींबाबत नवमतदारांमध्ये जाणीव जागृती व्हावी, यातून सुजाण नागरिक तयार व्हावेत, या उद्देशाने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाकडून १५३७ निवडणूक साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले आहेत.अजूनही नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत अनभिज्ञता आहे. त्यामुळे लोकशाही प्रणाली यशस्वीपणे राबवताना अनेक अडचणी येत आहेत. अजूनही मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग १०० टक्के नाही. त्यामुळे पात्र उमेदवार निवडून येत नाहीत. त्यामुळे सर्वच निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये त्याचबरोबर नवमतदारांमध्ये जाणीव जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी प्रदीप पी. आणि निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात निवडणूक साक्षरता क्लब तयार करण्याची प्रक्रिया जानेवारी २०१८पासून सुरू झाली आहे.विद्यार्थीदशेत या विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक कार्यपद्धती याबाबत जागृती होत राहिल्याने हे विद्यार्थी १८ वर्षांचे झाल्यानंतर ते आपोआपच सुजाण नागरिक होणार आहेत. यासाठी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

निवडणूक साक्षरता क्लब शाळा, महाविद्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापन करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाकडून सुरू रहाणार आहे. याकरिता दिल्ली येथील निवडणूक कार्यालयाकडून कार्यालयीन निधी तसेच याबाबतचे साहित्य जिल्हास्तरावर लवकरच उपलब्ध होणार आहे.

तसेच येथील निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्ली येथे याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार असून ते कर्मचारी इथ आल्यानंतर प्रशिक्षण घेणार आहेत. हे साक्षरता क्लब लोकशाही प्रणालीबाबत जागरूकता निर्माण करणार असून लोकशाही कशी बळकट होणे आवश्यक आहेत, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.जिल्ह्यात स्थापन झालेले निवडणूक साक्षरता क्लबशाळा, कनिष्ठ महाविद्यालय स्तर : १८७नव मतदार (वरिष्ठ महाविद्यालय स्तर) : ६५मतदान केंद्र स्तरावर : १२०२तसेच मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी विविध कार्यालयांमध्ये ८३ क्लब स्थापन करण्यात आले असून, ही प्रक्रिया यापुढेही विविध शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था यांमध्ये सुरू रहाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक