शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाशिष्ठी नदीतून पंधरा दिवसांत १५ हजार घनमीटर गाळ उपसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 18:15 IST

शासनाने दिलेल्या १० कोटी निधीपैकी ६ कोटी खर्च झाला

चिपळूण : येथील वाशिष्ठी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी नाम फाउंडेशनच्या पुढाकारातून गेल्या १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा केला जात आहे. एकाच वेळी चार ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू असून, अडथळे येऊनही पंधरा दिवसांत १५ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात यश आले आहे. अजूनही पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाचा मोठा पल्ला बाकी आहे. त्यादृष्टीने नाम फाउंडेशनने तयारी ठेवली आहे.जलसंपदा विभागाने वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा कामासाठी तीन टप्पे तयार केले आहेत. गतवर्षीच्या पावसामुळे वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाचे काम काही ठिकाणी थांबले होते. पावसाळ्यानंतर पहिल्या टप्प्यातील उर्वरित तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ८.१० दशलक्ष घनमीटर गाळ काढून झाला आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या १० कोटी निधीपैकी ६ कोटी खर्च झाला आहे, तर ४ कोटी रूपये शिल्लक आहेत.दुसऱ्या टप्प्यातील काम संथ गतीने होत असल्याने चिपळूण बचाव समितीने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी गंभीर दखल घेत यंत्रणा हलवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत गाळ उपसा कामासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पहिल्या टप्प्यातील शिल्लक राहिलेला संपूर्ण गाळ नाम फाउंडेशन काढेल, अशी ग्वाही मल्हार पाटेकर यांनी दिली. त्यानुसार नाम फाउंडेशनचे ८ पोकलेन व १५ टिप्पर, एक ४५ मीटरचा लॉंग रिच बूम दाखल झाला. या यंत्रणेच्या साहाय्याने १५ दिवस सातत्याने गाळ उपशाचे काम सुरू आहे.शहरातील पेठमाप भाटण, बाजारपूल गणेश विसर्जन घाट, उक्ताड व गोवळकोट धक्का, अशा चार ठिकाणी एकाच वेळी गाळ उपशाचे काम केले जात आहे. यामध्ये गोवळकोट धक्का येथे लॉंग रिच बूमच्या साहाय्याने गाळ उपसा केला जातो. हे काम पूर्णतः पाण्यात असल्याने नाम फाउंडेशनची यंत्रणा मोठ्या शिताफीने काम करीत आहे. साधारण ८०० मीटर लांबीचे येथे बेट असून, त्यातील बहुतांशी गाळ उपसा करण्यात आला. याशिवाय उक्ताड जुवाड बेट येथे २ पोकलेन, पेठमाप २ व बाजारपूल येथे १ पोकलेन आणि जेसीबीने काम सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीriverनदी