महावितरणचे १५ कोटी थकीत
By Admin | Updated: June 30, 2016 23:11 IST2016-06-30T23:05:51+5:302016-06-30T23:11:48+5:30
कोकण परिमंडल : महावितरणच्या १ लाख १२ हजार ग्राहकांचा समावेश

महावितरणचे १५ कोटी थकीत
रत्नागिरी : महावितरणच्या कोकण परिमंडलातील १ लाख १२ हजार ५११ ग्राहकांकडे १५ कोटी ५० लाख ३८ हजारांची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ हजार ३२८ ग्राहकांकडे ८ कोटी २२ लाख ७ हजार रुपयांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४७ हजार १८३ ग्राहकांकडे ७ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांची थकबाकी आहे.वर्षानुवर्षे वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या कोकण परिमंडलातील २८ हजार ५५३ ग्राहकांकडे ९ कोटी ६ लाखांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने पावले उचलली आहेत. कायमस्वरूपी बंद तरीही घरातील अन्य सदस्यांच्या नावे मीटर घेण्यात आलेल्या ग्राहकांना शोधून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
कोकण परिमंडलातील ८४ हजार ७० घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ८४ लाख ७४ हजार, वाणिज्यिक १२ हजार ७३० ग्राहकांकडे २ कोटी ९५ लाख ८३ हजार, औद्योगिक २ हजार १२७ ग्राहकांकडे १ कोटी ४९ लाख १४ हजार, कृषिपंपाच्या ९ हजार १०४ ग्राहकांकडे ६८ लाख ९० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठाधारक १४८७ ग्राहकांकडे १ कोटी १२ लाख ४१ हजार, १६०० पथदिव्यांची २ कोटी १३ लाख ३० हजार आणि अन्य १३९३ ग्राहकांकडे २६ लाख ७ हजारांची थकबाकी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विभागातील १६ हजार ८५६ ग्राहकांकडे २ कोटी १५ लाख ७२ हजार, खेड विभागातील १८ हजार २१० ग्राहकांकडे २ कोटी ६३ लाख २२ हजार, रत्नागिरी विभागातील ३० हजार २६२ ग्राहकांकडे ३ कोटी ४३ लाख १३ हजारांची थकबाकी असून, जिल्हाभरातील एकूण ६५ हजार ३२८ ग्राहकांकडे ८ कोटी २२ लाख ७ हजारांची थकबाकी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विभागातील २५ हजार २५३ ग्राहकांकडे ३ कोटी ७७ लाख ५० हजार, कणकवली विभागातील २१ हजार ९३० ग्राहकांकडे ३ कोटी ५० लाख ८१ हजारांची थकबाकी असून, एकूण ४७ हजार १८३ ग्राहकांकडे ७ कोटी २८ लाख ३१ हजारांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी)
वसुलीची कार्यवाही : घरगुती वीज ग्राहकांची संख्या अधिक
महावितरण कंपनीने थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले आहे. वसुलीसाठी पथक नियुक्त करण्यात आले असून, ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे. थकबाकीची रक्कम भरून होणारी कारवाई टाळावी. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास सुरळीत होईपर्यंत सहकार्य करावे.
- कांचन आजनाळकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.