शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जिल्ह्यात क्षयरोगाच्या १०२, कुष्ठरोगाच्या ९ रुग्णांची नोंद, सव्वा आठ लाख लोकांची तपासणी पूर्ण         

By रहिम दलाल | Updated: September 25, 2022 18:23 IST

रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोगाच्या १०२, कुष्ठरोगाच्या ९ रुग्णांची नोंद झाली आहे. 

रत्नागिरी: आरोग्य विभागाने १३ सप्टेंबरपासून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत सुरु केलेल्या कुष्ठ व क्षयरोग शोध मोहिमेमध्ये आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील ८ लाख ३० हजार ३०६ लोकांची तपासणी केली आहे. त्यामध्ये जिल्हाभरात क्षयरोगाचे १०२ रुग्ण तर ९ कुष्ठ रोगी सापडले आहेत.

आरोग्य विभागाकडून कुष्ठ व क्षयरोग शोध मोहीम १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १,२६९ आरोग्य पथकांमध्ये २,५९६ कर्मचारी आणि २६२ सुपरवायझर काम करत आहेत . यामध्ये जिल्ह्यातील सुमारे १६ लाख २६ हजार ९२४ लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य पथकांकडून त्यापैकी जिल्ह्यातील ८ लाख ३० हजार ३०६ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन क्षयरोग आणि कुष्ठरोगाचे सर्वेक्षण केले जात आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यात मागील १० दिवसांमध्ये क्षयरोगाचे रुग्ण पुढीलप्रमाणे आढळले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी- ११ रुग्ण, राजापूर- १४, चिपळूण -१८, दापोली –७, गुहागर -८, संगमेश्वर -१८, खेड -११, लांजा -६, मंडणगड - ९ रुग्ण आढळले आहेत. या तपासणीला लोकांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHealthआरोग्य