शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

...तर राजीनामा द्या अन् निवडणूक मैदानात या! , अमित शाह यांचे मुख्यमंत्री गेहलोत यांना खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 01:56 IST

राजस्थानमधील गंगापूर शहरात सहकार किसान मेळाव्याला संबोधित करताना शाह बोलत होते.

जयपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी ‘लाल डायरी’च्या मुद्द्यावरून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला. या मुद्द्यावर गेहलोत यांनी राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असे ते म्हणाले.

राजस्थानमधील गंगापूर शहरात सहकार किसान मेळाव्याला संबोधित करताना शाह बोलत होते. ते म्हणाले, “आजकाल गेहलोत साहेब लाल डायरीला खूपच घाबरतात. का बरं घाबरत असतील... राजस्थानच्या लोकांनो तुम्हीच सांगा?... डायरीचा वरचा भाग लाल असला तरी आत काळे कारनामे दडलेले आहेत.

कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा त्या डायरीत आहे. मी गेहलोत यांना हे सांगायला येथे आलो आहे की, थोडीशी चाड उरली असेल तर लाल डायरीच्या मुद्द्यावर राजीनामा द्या आणि निवडणुकीच्या मैदानात या… दोन हात करा.’’ (वृत्तसंस्था)

भाजपने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केलेयापूर्वीच्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, तर भाजपने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले. अनेक योजना सुरू केल्या, असा दावा शाह यांनी केला. ‘‘काँग्रेस सरकार सत्तेवर असताना कृषी बजेट २२ हजार कोटी रुपयांचे होते, जे मोदीजींनी सहा पटीने वाढवून एक लाख २५ हजार कोटी रुपये केले,’’ असे ते म्हणाले. यावेळी खासदार सुखबीरसिंग जौनपुरिया व जसकौर मीना, राज्यसभा सदस्य किरोरी लाल मीना आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड उपस्थित होते.    

घरात लाल रंगाची डायरी ठेवू नका... भाषणाच्या शेवटी ते तिरकसपणे म्हणाले, “घरात डायरी काेणतीही असू द्या; पण तिचा रंग लाल असू नये. नाहीतर गेहलोत यांना राग येईल. राजस्थानचे बडतर्फ मंत्री राजेंद्र गुडा यांनी २४ जुलै रोजी विधानसभेत कथित ‘लाल डायरी’चा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सभागृहात गदारोळ होऊन त्यांना निलंबित करण्यात आले होते.’’ शाह यांच्या भाषणाच्या सुरुवातीला काही लोक घोषणाबाजी करताना दिसले. याकडे लक्ष वेधत गृहमंत्री म्हणाले, “घोषणा देणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, घोषणाबाजी करण्याऐवजी चंद्रयान पुढे ढकलले असते तर आज घोषणाबाजी करण्याची गरजच पडली नसती. सहकार मंत्रालयाची स्थापना केली असती, शेतकऱ्यांचे कल्याण झाले असते व आज घोषणाबाजी करण्याची गरज पडली नसती.’’

टॅग्स :Amit Shahअमित शाह