शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 18:38 IST

तापलेल्या वाळूत जवानांनी भाजले पापड-चपाती, अंडीही उकडली.

Summer in Rajasthan : यंदा अतिशय तीव्र उन्हाळा जाणवतोय. उत्तर भारतात तर सूर्य अक्षरशः आग ओकतोय. सर्वत्र इतकी प्रचंड उष्णता आहे की, जीवाची काहिली होत आहे. सरासरी तापमान 45-46 वरच पोहचले आहे. एकीकडे आपल्यासारख्या सामान्यांना हे तापमान सहन होत नाहीये, तर दुसरीकडे पाकिस्तानी सीमेवर आपले वीर जवान 53-55 अंश तापमानात कर्तव्य बजावत आहेत. सध्या राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तापमान 55 अंशांवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीतदेखील देशाच्या रक्षणासाठी चोवीस तास सीमेवर उभे आहेत.

राजस्थानमध्ये सध्या प्रचंड उष्णता आहे, संपूर्ण राज्य उष्णतेच्या लाटेने होरपळतोय. भारत-पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरील तापमानाने 55 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. अलीकडेच सीमेवरील जवानांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात भारतीय जवान तापलेल्या वाळूत पापड भाजताना, अंडी उकडताना आणि गाडीच्या बोनेटवर पोळी भाजताना दिसत आहेत. अश भीषण गरमीत सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवानांच्या हिंमतीपुढे सूर्यदेखील फिका पडल्याचे पाहायला मिळतेय. 55 अंश तापमानातदेखील जवान आपले काम चोख बजावत आहेत. 

या भीषण उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जवान पूर्णवेळ डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर रुमाल, डोळ्यावर गॉगल आणि सोबत लिंबू, कांद्यासह पाण्याची बाटली ठेवत आहेत. विशेष म्हणजे, अशा कडक उन्हात बीएसएफच्या महिला जवानदेखील देशासाठी आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. 

शहरातील तापमान 50 च्या जवळसीमेवरील तापमान 55 च्या पुढे गेले आहे, तर राजस्तानमधील अनेक शहरातील तापमान 48-50 अंशांच्या जवळ पोहोचले आहे. राजस्थानच्या जैसलमेरमधील तापमान 48-50 डिग्री सेल्सियस, बरीटर 48, जॅलोर 47, जोधपूर 48, गंगानगर 47, कोटा 46,  भिलवाडा 45, फतेहपूरमध्ये 45 आणि जयपूरमधील तापमान 47 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. उष्णता इतकी आहे की, ती 10 मिनिटे उन्हात थांबलो तरी, शरीर गरमीने वितळून जाईल, अशी परिस्थिती आहे. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलIndiaभारतPakistanपाकिस्तानRajasthanराजस्थानIndian Armyभारतीय जवान