शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Rajasthan Politics: राहुल गांधीच्या भावनिक आवाहानानंतर राजस्थान काँग्रेसमधील वाद मिटला? गेहलोत - पायलट यांच्यात समेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 09:53 IST

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.

गेल्या काही दिवसापासून राजस्थान काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान आता या दोन नेत्यांच्या मध्ये समेट घडल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सचिन पायलट आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील वाद मिटवण्यासाठी एक बैठक झाली. दरम्यान, हायकमांडने दोघांनाही भावनिक आवाहन केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद तीन फॉर्म्युल्यांद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला. पण अजुनही यांच्यातील वाद मिटला नसल्याचे बोलले जात आहे. 

Balu Dhanorkar: चंद्रपूर: काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन; दोन दिवसांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपलेले

काल रात्री झालेल्या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित होते. गांधी यांनी अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोन्ही नेत्यांना सांगितले की, तुमच्या दोघांचे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि अपेक्षा आम्ही सांभाळू. तुम्ही समान नेतृत्वाखाली एकत्र निवडणूक लढवा, राजस्थान जिंका. हिमाचल, कर्नाटकानंतर हे राज्य आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये आपण मजबूत आहोत. येथे तुम्ही एकत्रित नेतृत्वाखाली पक्षाला विजयी करा, असं आवाहन केलं.

राहुल गांधींच्या या भावनिक आवाहनावर अजून कोणतीही चर्चा झाली नसल्याचे बोलले जात आहे. पण, दोघांनी एकत्र काम करण्याचे आश्वासन दिले आणि सर्व काही राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोडले. त्यामुळेच बैठकीनंतर संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी राजस्थानमध्ये संयुक्त नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरण्याची आणि दोन्ही नेत्यांच्या हायकमांडचा निर्णय मान्य करण्याची घोषणा केली, मात्र दोन्ही नेते गप्प बसले.

आता हे मौन काँग्रेस हायकमांडला तात्पुरता दिलासा देणारा असला तरी दोघांमधील राजकीय सत्तेचे विभाजन अद्याप बाकी आहे. म्हणूनच हा समेट सध्या तात्पुरता आहे, जोपर्यंत हायकमांडचा फॉर्म्युला निघत नाही आणि दोघेही ते मान्य करत नाहीत, तोपर्यंत हा राजकीय फोटो तुमच्यापेक्षा काही नाही.

नेते शांत करण्यासाठी पदांची परंपरा नाही : गेहलोत

पक्ष नेतृत्व मजबूत असून, ते कधीही एखादा नेता किंवा कार्यकर्त्याचे मन वळविण्यासाठी त्याला एखादे पद देऊ करणार नाही, तशी परंपरा पक्षात नाही, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी येथे म्हटले. राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष तीव्र झाला असताना गेहलोत यांनी हे विधान केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्यापूर्वी त्यांनी हे वक्तव्य केले. 

गेहलोत म्हणाले की, एखादा नेत्याला (पद) त्याच्या म्हणण्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींनी पद देऊ केल्याचे मी कधीही ऐकले नाही. ही परंपरा  काँग्रेसमध्ये नाही. पक्ष नेतृत्व व काँग्रेस प्रचंड मजबूत असून, कोणाच्या मनधरणीसाठी पदाचा प्रस्ताव ठेवला जाईल किंवा एखादा  नेता किंवा कार्यकर्त्याने असे म्हणावे की, मी हे पद नाही, ते पद घेईन, अशी स्थिती आलेली नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतRahul Gandhiराहुल गांधी