शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

राजस्थानात यंदा ०.९ टक्के जादा मतदान; २० वर्षाचा ट्रेंड कायम राहणार की मोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 10:28 IST

आता ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. तेव्हा राजस्थानात हा ट्रेंड कायम राहतो की गहलोत सरकार ही परंपरा मोडणार हे पाहणे गरजेचे आहे.

जयपूर - राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या १९९ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. यंदाच्या निवडणुकीत राज्यात एकूण ७४.९६ टक्के मतदान झाले. २०१८ च्या निवडणुकीत राजस्थानात ७४.०६ टक्के मतदान झाले होते. म्हणजे या निवडणुकीत ०.९ टक्के जादा मतदान झाले. अशावेळी राज्यात मतदानाच्या ट्रेंडविषयी चर्चा सुरू झाली आहे. 

राजस्थानात दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. मागील २० वर्षाचा मतदानाचा ट्रेंड पाहिला तर जेव्हा जेव्हा मतदान टक्केवारी घटली आहे त्याचा थेट फायदा काँग्रेसला झाला आहे आणि मतदान टक्केवारी वाढली त्याचा फायदा भाजपाला होतो. यावेळच्या निवडणुकीत १८६३ उमेदवार मैदानात उतरले होते. आता ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. तेव्हा राजस्थानात हा ट्रेंड कायम राहतो की गहलोत सरकार ही परंपरा मोडणार हे पाहणे गरजेचे आहे.

१९९ जागांसाठी झाले मतदानराजस्थानात एकूण २०० जागा आहेत. परंतु मतदान १९९ जागांसाठी झाले. राज्यात २०१३ आणि २०१८ मध्येही १९९ जागांसाठी मतदान झाले होते. यावर्षी निवडणुकीच्या दरम्यान श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर जागेवरील काँग्रेस उमेदवार गुरमीत सिंह कूनर यांचे निधन झाले. अशावेळी निवडणूक आयोगानं येथील मतदान स्थगित केले. कूनर यांनी ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता या जागेवर पोटनिवडणूक घेतली जाईल. गुरमीत सिंह विद्यमान काँग्रेस आमदारही होते. त्यांनी २०१८ च्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवली होती आणि राज्य सरकारमध्ये मंत्री झाले होते. 

यंदा राजस्थानात सर्वात जास्त जैसलमेर इथं ८२.३२ टक्के मतदान झाले. त्यानंतर प्रतापगड ८२.०७ टक्के, बांसवाडा ८१.३६ टक्के, हनुमानगड ८१.३० टक्के मतदान झाले. राज्यात सर्वात कमी मतदान पाली इथं ६५.१२ टक्के इतके झाले. त्यानंतर सिरोहीत ६६.६२ टक्के, करौली ६८.३८ टक्के, जालोरमध्ये ६९.५६ टक्के आणि सवाई माधोपूर ६९.९१ टक्के मतदान झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, राज्य वर्धन सिंह राठोड, बाबा बालकनाथ, नरेंद्र कुमार, भागीरथ चौधरी, किरोडी लाल मीणा, देवजी पटेल, दीया कुमारी, गौरभ वल्लभ यासारखे नेते मैदानात उतरले आहेत. 

राज्यातला मतदान ट्रेंड काय सांगतो?राजस्थानातील मतदान ट्रेंड पाहिला तर विधानसभा निवडणुकीत मतदान कमी झाले तर काँग्रेस सरकार बनले आहे. १९९८ च्या निवडणुकीत ६३.३९ टक्के मतदान झाले होते तेव्हा राज्यात काँग्रेस सरकार बनले. गहलोत पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर २००३ च्या निवडणुकीत ६७.१८ टक्के मतदान झाले तेव्हा भाजपा सरकार बनले. त्यावेळी ३.७९ टक्के मतदान वाढले होते. वसुंधरा राजे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या होत्या. २००८ मध्ये ६६.२५ टक्के मतदान झाले तेव्हा काँग्रेस सरकार बनले. काँग्रेसनं तेव्हा ९६ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाने ७८ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी ०.९३ टक्के मतदान घटले होते. गहलोत दुसऱ्यांदा राज्यात मुख्यमंत्री झाले. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस