शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

राजस्थानात यंदा ०.९ टक्के जादा मतदान; २० वर्षाचा ट्रेंड कायम राहणार की मोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 10:28 IST

आता ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. तेव्हा राजस्थानात हा ट्रेंड कायम राहतो की गहलोत सरकार ही परंपरा मोडणार हे पाहणे गरजेचे आहे.

जयपूर - राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या १९९ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. यंदाच्या निवडणुकीत राज्यात एकूण ७४.९६ टक्के मतदान झाले. २०१८ च्या निवडणुकीत राजस्थानात ७४.०६ टक्के मतदान झाले होते. म्हणजे या निवडणुकीत ०.९ टक्के जादा मतदान झाले. अशावेळी राज्यात मतदानाच्या ट्रेंडविषयी चर्चा सुरू झाली आहे. 

राजस्थानात दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. मागील २० वर्षाचा मतदानाचा ट्रेंड पाहिला तर जेव्हा जेव्हा मतदान टक्केवारी घटली आहे त्याचा थेट फायदा काँग्रेसला झाला आहे आणि मतदान टक्केवारी वाढली त्याचा फायदा भाजपाला होतो. यावेळच्या निवडणुकीत १८६३ उमेदवार मैदानात उतरले होते. आता ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. तेव्हा राजस्थानात हा ट्रेंड कायम राहतो की गहलोत सरकार ही परंपरा मोडणार हे पाहणे गरजेचे आहे.

१९९ जागांसाठी झाले मतदानराजस्थानात एकूण २०० जागा आहेत. परंतु मतदान १९९ जागांसाठी झाले. राज्यात २०१३ आणि २०१८ मध्येही १९९ जागांसाठी मतदान झाले होते. यावर्षी निवडणुकीच्या दरम्यान श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर जागेवरील काँग्रेस उमेदवार गुरमीत सिंह कूनर यांचे निधन झाले. अशावेळी निवडणूक आयोगानं येथील मतदान स्थगित केले. कूनर यांनी ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता या जागेवर पोटनिवडणूक घेतली जाईल. गुरमीत सिंह विद्यमान काँग्रेस आमदारही होते. त्यांनी २०१८ च्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवली होती आणि राज्य सरकारमध्ये मंत्री झाले होते. 

यंदा राजस्थानात सर्वात जास्त जैसलमेर इथं ८२.३२ टक्के मतदान झाले. त्यानंतर प्रतापगड ८२.०७ टक्के, बांसवाडा ८१.३६ टक्के, हनुमानगड ८१.३० टक्के मतदान झाले. राज्यात सर्वात कमी मतदान पाली इथं ६५.१२ टक्के इतके झाले. त्यानंतर सिरोहीत ६६.६२ टक्के, करौली ६८.३८ टक्के, जालोरमध्ये ६९.५६ टक्के आणि सवाई माधोपूर ६९.९१ टक्के मतदान झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, राज्य वर्धन सिंह राठोड, बाबा बालकनाथ, नरेंद्र कुमार, भागीरथ चौधरी, किरोडी लाल मीणा, देवजी पटेल, दीया कुमारी, गौरभ वल्लभ यासारखे नेते मैदानात उतरले आहेत. 

राज्यातला मतदान ट्रेंड काय सांगतो?राजस्थानातील मतदान ट्रेंड पाहिला तर विधानसभा निवडणुकीत मतदान कमी झाले तर काँग्रेस सरकार बनले आहे. १९९८ च्या निवडणुकीत ६३.३९ टक्के मतदान झाले होते तेव्हा राज्यात काँग्रेस सरकार बनले. गहलोत पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर २००३ च्या निवडणुकीत ६७.१८ टक्के मतदान झाले तेव्हा भाजपा सरकार बनले. त्यावेळी ३.७९ टक्के मतदान वाढले होते. वसुंधरा राजे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या होत्या. २००८ मध्ये ६६.२५ टक्के मतदान झाले तेव्हा काँग्रेस सरकार बनले. काँग्रेसनं तेव्हा ९६ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाने ७८ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी ०.९३ टक्के मतदान घटले होते. गहलोत दुसऱ्यांदा राज्यात मुख्यमंत्री झाले. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस