शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
3
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
4
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
5
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
6
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
7
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
8
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
9
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
10
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
11
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
12
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
13
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
14
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
15
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
16
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
17
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
18
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
19
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
20
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

'तुम्ही राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करा'; कमलनाथ यांना हायकमांडचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 08:41 IST

कमलनाथ यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या कमलनाथ यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता दिल्लीतील खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपालही उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले. 

काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने कमलनाथ यांना मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कधीही राजीनामा देऊ शकतात, असे सांगितले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०२३मध्ये, भाजपाने १६३ जागांसह पूर्ण बहुमत मिळवले, तर काँग्रेस ६६ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

१७ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात एकूण २३० विधानसभेच्या जागांसाठी मतदान झाले आणि छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या तीन राज्यांसह रविवारी निकाल जाहीर करण्यात आला. काँग्रेसच्या पराभवानंतर रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले होते की, आम्हाला मध्य प्रदेशच्या मतदारांचा जनादेश मान्य आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावू. कमलनाथ यांनीही भाजपाच्या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि भाजपा राज्यातील जनतेप्रती असलेली जबाबदारी पार पाडेल अशी आशा कमलनाथ यांनी व्यक्त केली.

कमलनाथ यांनी मंगळवारी भोपाळमधील मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूक निकालांवर आढावा बैठक घेतली. त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, उमेदवार आणि आमदारांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असून लवकरच सर्व उमेदवार मला सविस्तर अहवाल देतील. या पराभवातून धडा घेत, उणिवा दूर करत आजपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करत आहोत. कोणताही पराभव धैर्याला हरवू शकत नाही, असं कमलनाथ यांनी सर्व विजयी आणि पराभूत झालेल्या आमदारांना सांगितले. 

त्यांना पक्षातून काढून टाका-

सुरेंद्र सिंह उर्फ ​​शेरा भैय्याने ठणकावून सांगितले की, नुकसान करणाऱ्यांना पहिली संधी मिळताच हटवले पाहिजे. कोणी कितीही प्रिय असो. पक्षाचा पराभव कोणी केला असेल किंवा ज्या पदाधिकाऱ्याच्या बूथमधून आम्ही पराभूत झालो, त्यांना तत्काळ पक्षातून काढून टाकावे, असे ते म्हणाले. शेरा यांनी हे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले की, मला काही बोलायचे नाही, पण पक्षाने यावर तातडीने पावले उचलावीत, अशी माझी विनंती आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसElectionनिवडणूक