शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'तुम्ही राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करा'; कमलनाथ यांना हायकमांडचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 08:41 IST

कमलनाथ यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या कमलनाथ यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता दिल्लीतील खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपालही उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले. 

काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने कमलनाथ यांना मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कधीही राजीनामा देऊ शकतात, असे सांगितले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०२३मध्ये, भाजपाने १६३ जागांसह पूर्ण बहुमत मिळवले, तर काँग्रेस ६६ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

१७ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात एकूण २३० विधानसभेच्या जागांसाठी मतदान झाले आणि छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या तीन राज्यांसह रविवारी निकाल जाहीर करण्यात आला. काँग्रेसच्या पराभवानंतर रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले होते की, आम्हाला मध्य प्रदेशच्या मतदारांचा जनादेश मान्य आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावू. कमलनाथ यांनीही भाजपाच्या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि भाजपा राज्यातील जनतेप्रती असलेली जबाबदारी पार पाडेल अशी आशा कमलनाथ यांनी व्यक्त केली.

कमलनाथ यांनी मंगळवारी भोपाळमधील मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूक निकालांवर आढावा बैठक घेतली. त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, उमेदवार आणि आमदारांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असून लवकरच सर्व उमेदवार मला सविस्तर अहवाल देतील. या पराभवातून धडा घेत, उणिवा दूर करत आजपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करत आहोत. कोणताही पराभव धैर्याला हरवू शकत नाही, असं कमलनाथ यांनी सर्व विजयी आणि पराभूत झालेल्या आमदारांना सांगितले. 

त्यांना पक्षातून काढून टाका-

सुरेंद्र सिंह उर्फ ​​शेरा भैय्याने ठणकावून सांगितले की, नुकसान करणाऱ्यांना पहिली संधी मिळताच हटवले पाहिजे. कोणी कितीही प्रिय असो. पक्षाचा पराभव कोणी केला असेल किंवा ज्या पदाधिकाऱ्याच्या बूथमधून आम्ही पराभूत झालो, त्यांना तत्काळ पक्षातून काढून टाकावे, असे ते म्हणाले. शेरा यांनी हे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले की, मला काही बोलायचे नाही, पण पक्षाने यावर तातडीने पावले उचलावीत, अशी माझी विनंती आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसElectionनिवडणूक