शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

'तुम्ही राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करा'; कमलनाथ यांना हायकमांडचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 08:41 IST

कमलनाथ यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या कमलनाथ यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता दिल्लीतील खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपालही उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले. 

काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने कमलनाथ यांना मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कधीही राजीनामा देऊ शकतात, असे सांगितले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०२३मध्ये, भाजपाने १६३ जागांसह पूर्ण बहुमत मिळवले, तर काँग्रेस ६६ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

१७ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात एकूण २३० विधानसभेच्या जागांसाठी मतदान झाले आणि छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या तीन राज्यांसह रविवारी निकाल जाहीर करण्यात आला. काँग्रेसच्या पराभवानंतर रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले होते की, आम्हाला मध्य प्रदेशच्या मतदारांचा जनादेश मान्य आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावू. कमलनाथ यांनीही भाजपाच्या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि भाजपा राज्यातील जनतेप्रती असलेली जबाबदारी पार पाडेल अशी आशा कमलनाथ यांनी व्यक्त केली.

कमलनाथ यांनी मंगळवारी भोपाळमधील मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूक निकालांवर आढावा बैठक घेतली. त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, उमेदवार आणि आमदारांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असून लवकरच सर्व उमेदवार मला सविस्तर अहवाल देतील. या पराभवातून धडा घेत, उणिवा दूर करत आजपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करत आहोत. कोणताही पराभव धैर्याला हरवू शकत नाही, असं कमलनाथ यांनी सर्व विजयी आणि पराभूत झालेल्या आमदारांना सांगितले. 

त्यांना पक्षातून काढून टाका-

सुरेंद्र सिंह उर्फ ​​शेरा भैय्याने ठणकावून सांगितले की, नुकसान करणाऱ्यांना पहिली संधी मिळताच हटवले पाहिजे. कोणी कितीही प्रिय असो. पक्षाचा पराभव कोणी केला असेल किंवा ज्या पदाधिकाऱ्याच्या बूथमधून आम्ही पराभूत झालो, त्यांना तत्काळ पक्षातून काढून टाकावे, असे ते म्हणाले. शेरा यांनी हे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले की, मला काही बोलायचे नाही, पण पक्षाने यावर तातडीने पावले उचलावीत, अशी माझी विनंती आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसElectionनिवडणूक