शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

'तुम्ही राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करा'; कमलनाथ यांना हायकमांडचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 08:41 IST

कमलनाथ यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या कमलनाथ यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता दिल्लीतील खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपालही उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले. 

काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने कमलनाथ यांना मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कधीही राजीनामा देऊ शकतात, असे सांगितले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०२३मध्ये, भाजपाने १६३ जागांसह पूर्ण बहुमत मिळवले, तर काँग्रेस ६६ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

१७ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात एकूण २३० विधानसभेच्या जागांसाठी मतदान झाले आणि छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या तीन राज्यांसह रविवारी निकाल जाहीर करण्यात आला. काँग्रेसच्या पराभवानंतर रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले होते की, आम्हाला मध्य प्रदेशच्या मतदारांचा जनादेश मान्य आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावू. कमलनाथ यांनीही भाजपाच्या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि भाजपा राज्यातील जनतेप्रती असलेली जबाबदारी पार पाडेल अशी आशा कमलनाथ यांनी व्यक्त केली.

कमलनाथ यांनी मंगळवारी भोपाळमधील मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूक निकालांवर आढावा बैठक घेतली. त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, उमेदवार आणि आमदारांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असून लवकरच सर्व उमेदवार मला सविस्तर अहवाल देतील. या पराभवातून धडा घेत, उणिवा दूर करत आजपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करत आहोत. कोणताही पराभव धैर्याला हरवू शकत नाही, असं कमलनाथ यांनी सर्व विजयी आणि पराभूत झालेल्या आमदारांना सांगितले. 

त्यांना पक्षातून काढून टाका-

सुरेंद्र सिंह उर्फ ​​शेरा भैय्याने ठणकावून सांगितले की, नुकसान करणाऱ्यांना पहिली संधी मिळताच हटवले पाहिजे. कोणी कितीही प्रिय असो. पक्षाचा पराभव कोणी केला असेल किंवा ज्या पदाधिकाऱ्याच्या बूथमधून आम्ही पराभूत झालो, त्यांना तत्काळ पक्षातून काढून टाकावे, असे ते म्हणाले. शेरा यांनी हे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले की, मला काही बोलायचे नाही, पण पक्षाने यावर तातडीने पावले उचलावीत, अशी माझी विनंती आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसElectionनिवडणूक