शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

राजस्थानमधील निवडणूक प्रचारात अचानक ‘मुख्यमंत्रिपद’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 06:36 IST

आधी वडिलांचा, आता मुलाचा हाेताेय अवमान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : गुर्जर समाजाचा एक नेता राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, सत्ता मिळाल्यानंतर मात्र त्यांचा अवमान करत दूर केले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. राजेश पायलट यांचा काँग्रेसने अवमान केलाच, आता तेच सचिन पायलट यांच्यासोबत केले जात आहे, असेही मोदी म्हणाले.  

मोदी म्हणाले, काँग्रेसकडून गुर्जर समाजाचा वारंवार अवमान केला जात आहे. त्याला इतिहासही साक्षीदार आहे. १९९७ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजेश पायलट यांनी सीताराम केसरी यांच्याविरोधात उमेदवारी दाखल केली होती. त्यावरून त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईही झाली होती. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले, राजेश पायलट यांच्याबाबत त्यावेळी जे झाले, तेच आता सचिन पायलट यांच्यासोबतही केले जात आहे. परंतु, काँग्रेसकडून ही बाब फेटाळली जात असली, तरी त्यांनी पायलट परिवाराचा अवमान केला की नाही हे सांगावे, असे आव्हानही मोदी यांनी यावेळी दिले.

तुष्टीकरणामुळे जनता त्रस्त : शाह

सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या धोरणामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. निवडणुकीनंतर राज्यात भाजपची सरकार सत्तेत येईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. राज्यात मागील ५ वर्षांमध्ये महिला आणि दलितांवर प्रचंड अन्याय झाले. यावर कारवाई करण्यात काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. काँग्रेसने प्रचाराच्या वेळी सात गॅरंटी दिल्या, मात्र त्यांना पुन्हा सत्तेत येण्याची तरी गॅरंटी आहे का, अशी टीकाही शाह यांनी केली.

हा तर गुर्जर समाजाला भडकाविण्याचा कट

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसचे नेते राजेश पायलट आणि त्यांचे पुत्र सचिन पायलट यांच्याबाबत केलेले विधान हे राजस्थानमधील गुर्जर समाजाला भडकाविण्याचे कारस्थान असल्याची टीका मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. कॉंग्रेस प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

गेहलोत म्हणाले की, राजस्थानमध्ये सत्तेत येण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी ते वारंवार लालडायरीचा उल्लेख करत आहे. भाजपचे ते एकप्रकारचे षडयंत्र आहे. त्यांची हिंमत असेल, तर निवृत्त न्यायधीशांकडून चौकशी करावी. सत्य लोकांपुढे येईलच. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून राजस्थानमध्ये ५० छापे टाकण्यात आले. परंतु अद्याप एकही नेता वा अधिकाऱ्याला अटक झाली नाही. छापेमारीतून काय सिद्ध झाले?  छत्तीसगडमध्येही निवडणुकीच्या चार दिवसांपूर्वी महादेव ॲप प्रकरण त्यांनी उपस्थित केले, परंतु काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे भाजपने कितीही खोटे प्रयत्न केले, तरी राज्यात पुन्हा कॉंग्रेसच पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास गेहलोत यांनी व्यक्त केला.

‘यंदा परंपरा मोडणार, काॅंग्रेस सत्तेत येणार’ 

अशोक गेहलोत सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि पुन्हा सत्तेत आल्यास दिलेल्या सात गॅरंटीमुळे राजस्थानमधील वातावरण हे कॉंग्रेसच्या बाजूने आहे. त्यामुळे यंदा सत्तापालट होण्याची परंपरा मोडून कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. खरगे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, की वीर आणि सरदारांची भूमी असलेल्या राजस्थानमध्ये कॉंग्रेसने विविध कल्याणकारी योजना राबवत लोकांचा विश्वास जिंकला आहे. 

 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री