शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राजस्थानमधील निवडणूक प्रचारात अचानक ‘मुख्यमंत्रिपद’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 06:36 IST

आधी वडिलांचा, आता मुलाचा हाेताेय अवमान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : गुर्जर समाजाचा एक नेता राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, सत्ता मिळाल्यानंतर मात्र त्यांचा अवमान करत दूर केले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. राजेश पायलट यांचा काँग्रेसने अवमान केलाच, आता तेच सचिन पायलट यांच्यासोबत केले जात आहे, असेही मोदी म्हणाले.  

मोदी म्हणाले, काँग्रेसकडून गुर्जर समाजाचा वारंवार अवमान केला जात आहे. त्याला इतिहासही साक्षीदार आहे. १९९७ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजेश पायलट यांनी सीताराम केसरी यांच्याविरोधात उमेदवारी दाखल केली होती. त्यावरून त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईही झाली होती. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले, राजेश पायलट यांच्याबाबत त्यावेळी जे झाले, तेच आता सचिन पायलट यांच्यासोबतही केले जात आहे. परंतु, काँग्रेसकडून ही बाब फेटाळली जात असली, तरी त्यांनी पायलट परिवाराचा अवमान केला की नाही हे सांगावे, असे आव्हानही मोदी यांनी यावेळी दिले.

तुष्टीकरणामुळे जनता त्रस्त : शाह

सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या धोरणामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. निवडणुकीनंतर राज्यात भाजपची सरकार सत्तेत येईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. राज्यात मागील ५ वर्षांमध्ये महिला आणि दलितांवर प्रचंड अन्याय झाले. यावर कारवाई करण्यात काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. काँग्रेसने प्रचाराच्या वेळी सात गॅरंटी दिल्या, मात्र त्यांना पुन्हा सत्तेत येण्याची तरी गॅरंटी आहे का, अशी टीकाही शाह यांनी केली.

हा तर गुर्जर समाजाला भडकाविण्याचा कट

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसचे नेते राजेश पायलट आणि त्यांचे पुत्र सचिन पायलट यांच्याबाबत केलेले विधान हे राजस्थानमधील गुर्जर समाजाला भडकाविण्याचे कारस्थान असल्याची टीका मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. कॉंग्रेस प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

गेहलोत म्हणाले की, राजस्थानमध्ये सत्तेत येण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी ते वारंवार लालडायरीचा उल्लेख करत आहे. भाजपचे ते एकप्रकारचे षडयंत्र आहे. त्यांची हिंमत असेल, तर निवृत्त न्यायधीशांकडून चौकशी करावी. सत्य लोकांपुढे येईलच. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून राजस्थानमध्ये ५० छापे टाकण्यात आले. परंतु अद्याप एकही नेता वा अधिकाऱ्याला अटक झाली नाही. छापेमारीतून काय सिद्ध झाले?  छत्तीसगडमध्येही निवडणुकीच्या चार दिवसांपूर्वी महादेव ॲप प्रकरण त्यांनी उपस्थित केले, परंतु काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे भाजपने कितीही खोटे प्रयत्न केले, तरी राज्यात पुन्हा कॉंग्रेसच पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास गेहलोत यांनी व्यक्त केला.

‘यंदा परंपरा मोडणार, काॅंग्रेस सत्तेत येणार’ 

अशोक गेहलोत सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि पुन्हा सत्तेत आल्यास दिलेल्या सात गॅरंटीमुळे राजस्थानमधील वातावरण हे कॉंग्रेसच्या बाजूने आहे. त्यामुळे यंदा सत्तापालट होण्याची परंपरा मोडून कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. खरगे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, की वीर आणि सरदारांची भूमी असलेल्या राजस्थानमध्ये कॉंग्रेसने विविध कल्याणकारी योजना राबवत लोकांचा विश्वास जिंकला आहे. 

 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री