शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग, १७ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 17:06 IST

राजस्थान भाजपचे प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्या उपस्थित या सर्व नेते पक्षात सामील झाले. 

जयपूर : राजस्थानमध्ये सर्वांनाच आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून जोरात सुरू झाली आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. येथील विविध पक्षांच्या अशा जळपास १७ नेत्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थान भाजपचे प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्या उपस्थित या सर्व नेते पक्षात सामील झाले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, सर्वांनी पक्षात बिनशर्त प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी सर्वांनीच संकल्प केला आहे. राजधानी जयपूर येथील भाजपच्या मुख्यालयात या सर्व १७ नेत्यांना पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी आयपीएस जसवंत संपतराम, लल्लुराम बैरवा, केआर मेघवाल, डॉ. शिवचरण कुशवाह, रवींद्र सिंह बोहरा, पवन दुग्गल, विवेक सिंह बोहरा, राणी दुग्गल, माजी आयएएस डॉ. एसपी सिंह आणि मनोज शर्मा, ममता कंवर, डीडी कुमावत, धनसिंग रावत, दिनेश रंगा आणि गीता वर्मा यांचा समावेश आहे.

अरुण सिंह यांचा दावा- भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेलराजस्थान भाजपचा परिवार आणखी वाढला आहे, असे राज्याचे प्रभारी अरुण सिंह म्हणाले. तसेच, राजस्थानमध्ये भाजपची लाट आहे. भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असा दावा अरुण सिंह यांनी केला. याशिवाय, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सत्य बोलल्याबद्दल आपल्या मंत्र्याला बडतर्फ केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, राजस्थानमध्ये हाहाकार माजल्याची स्थिती आहे. सगळीकडे अनागोंदी कारभार आहे. त्यामुळे इतके कमी काँग्रेसचे आमदार येतील की ते फॉर्च्युनरमध्ये बसून जातील, असेही अरुण सिंह म्हणाले.

तिवारी आणि महारिया यांचीही झालीय 'घरवापसी'विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षापूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुभाष महारिया भाजपमध्ये परतले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन सुभाष महारिया यांनी पक्ष सोडला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच, त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण पराभूत झाले. दुसरीकडे, गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री घनश्याम तिवारी यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत ​​आपला नवा पक्ष स्थापन केला होता. पण त्या पक्षाला यश आले नाही. त्यानंतर तिवारी काँग्रेसमध्ये गेले. पण नंतर ते भाजपमध्ये आले. आता पक्षाने घनश्याम तिवारी यांना राजस्थानमधून खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा