शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग, १७ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 17:06 IST

राजस्थान भाजपचे प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्या उपस्थित या सर्व नेते पक्षात सामील झाले. 

जयपूर : राजस्थानमध्ये सर्वांनाच आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून जोरात सुरू झाली आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. येथील विविध पक्षांच्या अशा जळपास १७ नेत्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थान भाजपचे प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्या उपस्थित या सर्व नेते पक्षात सामील झाले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, सर्वांनी पक्षात बिनशर्त प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी सर्वांनीच संकल्प केला आहे. राजधानी जयपूर येथील भाजपच्या मुख्यालयात या सर्व १७ नेत्यांना पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी आयपीएस जसवंत संपतराम, लल्लुराम बैरवा, केआर मेघवाल, डॉ. शिवचरण कुशवाह, रवींद्र सिंह बोहरा, पवन दुग्गल, विवेक सिंह बोहरा, राणी दुग्गल, माजी आयएएस डॉ. एसपी सिंह आणि मनोज शर्मा, ममता कंवर, डीडी कुमावत, धनसिंग रावत, दिनेश रंगा आणि गीता वर्मा यांचा समावेश आहे.

अरुण सिंह यांचा दावा- भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेलराजस्थान भाजपचा परिवार आणखी वाढला आहे, असे राज्याचे प्रभारी अरुण सिंह म्हणाले. तसेच, राजस्थानमध्ये भाजपची लाट आहे. भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असा दावा अरुण सिंह यांनी केला. याशिवाय, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सत्य बोलल्याबद्दल आपल्या मंत्र्याला बडतर्फ केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, राजस्थानमध्ये हाहाकार माजल्याची स्थिती आहे. सगळीकडे अनागोंदी कारभार आहे. त्यामुळे इतके कमी काँग्रेसचे आमदार येतील की ते फॉर्च्युनरमध्ये बसून जातील, असेही अरुण सिंह म्हणाले.

तिवारी आणि महारिया यांचीही झालीय 'घरवापसी'विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षापूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुभाष महारिया भाजपमध्ये परतले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन सुभाष महारिया यांनी पक्ष सोडला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच, त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण पराभूत झाले. दुसरीकडे, गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री घनश्याम तिवारी यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत ​​आपला नवा पक्ष स्थापन केला होता. पण त्या पक्षाला यश आले नाही. त्यानंतर तिवारी काँग्रेसमध्ये गेले. पण नंतर ते भाजपमध्ये आले. आता पक्षाने घनश्याम तिवारी यांना राजस्थानमधून खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा