शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

नवीन क्र ांती घडवण्यासाठी तरुणांनी पुढे यावे-धुमाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:25 AM

समाजात महिलेने मानमर्यादा राखून राहिले पाहिजे, ज्या घरात आई सुसंस्कृत असेल त्यांच्याच घरात शिवाजी जन्माला येतात. अध्यात्मातील शक्ती माणसाला तारत असते

धाटाव : समाजात महिलेने मानमर्यादा राखून राहिले पाहिजे, ज्या घरात आई सुसंस्कृत असेल त्यांच्याच घरात शिवाजी जन्माला येतात. अध्यात्मातील शक्ती माणसाला तारत असते, त्यासाठी सत्कर्म करा, शिक्षण घ्या, मोठमोठ्यांचे चरित्र वाचा, आपल्या मुला-मुलींना सुद्धा वाचायला द्या यातूनच आपला विकास होईल. नेतृत्वाची जाण असणारा माणूस तयार व्हायला हवे, व्यसनापासून दूर राहायला हवे, नवीन क्र ांती घडली पाहिजे यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे, विचारांचे वैभव मिळवा, असे प्रतिपादन अ‍ॅड. हनुमंत धुमाळ यांनी केले.रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात नुकत्याच रोहा-अष्टमी मराठा विकास मंडळाच्या वतीने आयोजित मराठा समाज मेळाव्यात ते बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालून धुमाळ यांनी २८८ आमदारांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त आमदार मराठा असताना मराठा समाजाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याची खंत व्यक्त केली. विश्वास नांगरे पाटलांसारख्या कणखर अधिकाºयांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून मेहनत घ्या,मोठमोठ्या पदांवर काम करा, मुलांना चांगले शिक्षण द्या, ज्यांना आधार नाही त्यांना खरोखर आधार द्या, सरकारला वाकवायचे असेल तर आपली प्रगती करा, असे ते म्हणाले.या कार्यक्रमाला रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे, नगरसेविका सुजाता चाळके, समीक्षा बामणे, सारिका पायगुडे आदी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्र माचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन किशोर तावडे यांनी केले.