शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

उल्हासनदी संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:34 IST

उल्हासनदी बचाव मोहीम; पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू

- कांता हाबळे नेरळ : नेरळ, कर्जत परिसरातील तरुणांनी उल्हासनदी बचाव ही मोहीम हाती घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या दीड महिन्यापासून याबाबत नियोजन सुरू असून, काही भागातील तरु णांनी पुढाकार घेऊन अनेक ठिकाणी नदीपात्रात वाहत आलेली आणि साठलेली जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले आहे, त्यामुळे काही भागात नदीपात्र स्वच्छ झाल्याचे दिसत आहेत. तरु णांनी सुरू केलेल्या या नदीपात्र संवर्धनामुळे तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.कर्जत, नेरळ भागातून वाहणाऱ्या उल्हासनदीचा उगम लोणावळा भागातील राजमाची परिसरात होत असून, येथील डोंगराळ भागातून वाहणारे पाणी येथून उल्हासनदीला येऊन मिळते. पुढे या नदीचे पात्र मोठे मोठे होत आहे. या उल्हासनदीत परिसरातील काही भागात सुरू असलेले नवीन बांधकामे तसेच शहरातील मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने ही नदी जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे. ही जलपर्णी गेल्या दोन महिन्यांपासून उल्हास नदीपात्रात वाहत येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे; परंतु याकडे ना प्रशासनाचे लक्ष, ना लोकप्रतिनिधींचे. दोन महिन्यांपासून अनेक भागातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना अवलंबून आहेत; परंतु अनेक पाणी योजनांना फिल्टर प्लँट नसल्याने हे दूषित पाणी घराघरांत जात असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.लोकसभा निवडणुकीचा माहोल असल्याने अनेक आदिवासी भागात, शहरी भागात नेत्यांकडून आश्वासनांची खैरात सुरू आहे. ही आश्वासने फक्त निवडणुकीपुरतीच असतात. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून उल्हासनदीच्या काठावर असलेल्या गावांना दूषित पाणी प्यावे लागत आहे, याकडे कुणाचे लक्ष नाही. यासाठी नेरळ परिसरातील तरु णांनी पुढाकार घेतला असून, उल्हासनदी वाचविण्यासाठी नियोजन केले आहे, त्यानुसार काही भागात नदीपात्र स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. वेळ मिळेल तसे तरु ण नदी स्वच्छ करण्याचे काम करत आहेत. तसे नियोजनही त्यांनी केले आहे.दूषित पात्र स्वच्छ करण्याचे आवाहननेरळ, कर्जत परिसरातील तरु णांनी अनेक भागात जाऊन साठलेल्या जलपर्णी असलेल्या भागाची पाहणी केली व त्यानुसार ही जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. लोकांना स्वच्छ पाणी मिळावे, या हेतूने या मोहिमेस सुरु वात करण्यात आली असून ज्या ज्या गावाजवळ असलेल्या नदीपात्रात जलपर्णी, प्लॅस्टिक नदीपात्रात साचले असल्यास तरु णांनी पुढाकार घेऊन दूषित पात्र स्वच्छ करावे, असे आवाहनही उल्हासनदी बचाव मोहीम ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.गेल्या दोन महिन्यांपासून कर्जत, नेरळ परिसरातील उल्हास नदीपात्रात जलपर्णी वाहत येत असल्याने परिसरातील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यावर नियोजन करण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला असून, नदी स्वच्छ करण्यासाठी नियोजन सुरू केले असून त्यानुसार काम सुरू आहे. दहिवली व काही भागात नदीपात्र स्वच्छ करण्यात आले असून पुढे ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. यासाठी परिसरातील अनेक तरु णांनी या मोहिमेत सहभागी व्हावे.- केशव तरे, ग्रामस्थ, कोदिवले

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण