शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 03:28 IST

संतोष कोळी : पिगोंडे ग्रामपंचायतीच्यावतीने शहीद जवानांना श्रद्धांजली

नागोठणे : आता फक्त निषेध करून भागणार नाही, आपण आता देशासाठी जागृत होण्याची वेळ आली आहे. सर्व तरु णांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती व्हावे, असे भावनिक आवाहन पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष कोळी यांनी केले. पिगोंडे ग्रामपंचायतीच्या वतीने वेलशेत, आंबेघरच्या बस पार्किंगच्या मैदानात पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी कोळी बोलत होते.

पुंडलिक ताडकर यांनी या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि चीन हे दोन देश वगळता जगभरातील सर्वच देश भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत. पाकिस्तानला जर धडा शिकवायचा असेल, तर सर्व नागरिकांनी चिनी वस्तूंवर आजपासून बहिष्कार घालावा, असे आवाहन केले. येथील आंबेघरचे दहा जवान देशाच्या रक्षणासाठी आजही भारताच्या सीमेवर राहून देशसेवा करीत आहेत, ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. परवाच्या हल्ल्यानंतर स्वत: त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते सर्वच सुखरूप आहेत व पाकिस्तानच्या नांग्या चेचणारच, असे त्यांनी अभिमानाने सांगितले असल्याचे बळीराम बडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर करावे, आम्ही आजही देशसेवेसाठी सीमेवर यायला आहोत, असे सांगितले. ग्रामसेवक राकेश टेमघरे यांनी यावेळी शहीद जवानांच्या सहाय्यता निधीसाठी आपला पाच दिवसांचा पगार देणार असल्याचे जाहीर केले. यानंतर दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांची काढण्यात आलेली रॅली वेलशेत आणि आंबेघर या दोन्ही गावांमध्ये फिरविण्यात आली.यावेळी उपसरपंच सखाराम घासे, ग्रा. पं. सदस्य नाना बडे, कांचन माळी, रंजना माळी आदींसह दोन्ही गावांतील शेकडो नागरिक उपस्थित होते.श्रीरामनगरमध्ये पाकिस्तानचा निषेधच्खोपोली : शहीद जवान अमर रहे, पाकिस्तानला धडा शिकवा या व इतर घोषणांनी लौजी, श्रीरामनगर परिसर दणाणून गेला. काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले. त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली श्रीरामनगर येथील श्रीराम मंदिरात अर्पण केली.च्लौजी, उदयविहार व श्रीरामनगर परिसरात मेणबत्ती रॅली काढण्यात आली. श्रीराम मंदिरात आल्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील, विद्यमान नगरसेवक सुनील पाटील, नगरसेवक अमोल जाधव आदींनी विचार मांडताना केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलावीत, दहशतवादी संघटनांचा बीमोड करावा आदी मागण्या केल्या.च्कर्जत : तालुक्यातील कशेळे येथील व्यापारी फेडरेशन आणि ग्रुप ग्रामपंचायत कशेळे यांच्या वतीने पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.च्कशेळे गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली सभेला उपस्थित होते, तसेच कशेळे गाव आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. व्यापाºयांच्या वतीने उदय पाटील यांनी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून तरु णांनी या पुढे १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे न पाळता शहीद दिन पाळावा अशी सूचना के ली.च्हल्ल्याचे राजकीय भांडवल न करता आपण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे ठाम उभे राहून या हल्ल्याविरोधात जी काही कार्यवाहीचा निर्णय घेतील त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी कशेळे ग्रामपंचायतीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पोखरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.नेरळमध्ये कॅण्डल मार्चनेरळ : पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रविवारी रात्री कॅण्डल मार्च काढण्यात आला. नेरळ गावातील नागरिक आणि सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने तरु ण सहभागी झाले होते. कॅण्डल मार्चनंतर नेरळ रेल्वे स्टेशनबाहेर श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रविवार १७ फेब्रुवारी रोजी नेरळकर या नावाखाली कॅण्डल मार्च काढला. कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील जकात नाका येथून निघालेला कॅण्डल मार्च माथेरान रस्त्याने नेरळ रेल्वे स्टेशन येथे पोहचला. या कॅण्डल मार्चमध्ये नेरळमधील सर्व सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्ष आणि सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. कॅ ण्डल मार्चला सुरु वात होण्याआधी मोहाचीवाडी येथून महिला आणि विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढून आपला सहभाग नोंदविला.आम्ही नेरळकर यांनी आयोजित केलेला कॅण्डल मार्च हुतात्मा भाई कोतवाल चौकात पोहचल्यानंतर तेथे शोकसभा घेण्यात आली. त्यावेळी तेथे नेरळच्या सरपंच जान्हवी साळुंखे, माजी सरपंच सावळाराम जाधव आदींची भाषणे झाली. सर्व वक्त्यांनी पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत शहीद जवानांसाठी एक निधी संकलित करून पाठवावा असा निर्णय घेतला. यावेळी नेरळ परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, कर्जत पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड