शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

तरुणांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 03:28 IST

संतोष कोळी : पिगोंडे ग्रामपंचायतीच्यावतीने शहीद जवानांना श्रद्धांजली

नागोठणे : आता फक्त निषेध करून भागणार नाही, आपण आता देशासाठी जागृत होण्याची वेळ आली आहे. सर्व तरु णांनी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती व्हावे, असे भावनिक आवाहन पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष कोळी यांनी केले. पिगोंडे ग्रामपंचायतीच्या वतीने वेलशेत, आंबेघरच्या बस पार्किंगच्या मैदानात पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी कोळी बोलत होते.

पुंडलिक ताडकर यांनी या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि चीन हे दोन देश वगळता जगभरातील सर्वच देश भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत. पाकिस्तानला जर धडा शिकवायचा असेल, तर सर्व नागरिकांनी चिनी वस्तूंवर आजपासून बहिष्कार घालावा, असे आवाहन केले. येथील आंबेघरचे दहा जवान देशाच्या रक्षणासाठी आजही भारताच्या सीमेवर राहून देशसेवा करीत आहेत, ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. परवाच्या हल्ल्यानंतर स्वत: त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते सर्वच सुखरूप आहेत व पाकिस्तानच्या नांग्या चेचणारच, असे त्यांनी अभिमानाने सांगितले असल्याचे बळीराम बडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर करावे, आम्ही आजही देशसेवेसाठी सीमेवर यायला आहोत, असे सांगितले. ग्रामसेवक राकेश टेमघरे यांनी यावेळी शहीद जवानांच्या सहाय्यता निधीसाठी आपला पाच दिवसांचा पगार देणार असल्याचे जाहीर केले. यानंतर दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांची काढण्यात आलेली रॅली वेलशेत आणि आंबेघर या दोन्ही गावांमध्ये फिरविण्यात आली.यावेळी उपसरपंच सखाराम घासे, ग्रा. पं. सदस्य नाना बडे, कांचन माळी, रंजना माळी आदींसह दोन्ही गावांतील शेकडो नागरिक उपस्थित होते.श्रीरामनगरमध्ये पाकिस्तानचा निषेधच्खोपोली : शहीद जवान अमर रहे, पाकिस्तानला धडा शिकवा या व इतर घोषणांनी लौजी, श्रीरामनगर परिसर दणाणून गेला. काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले. त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली श्रीरामनगर येथील श्रीराम मंदिरात अर्पण केली.च्लौजी, उदयविहार व श्रीरामनगर परिसरात मेणबत्ती रॅली काढण्यात आली. श्रीराम मंदिरात आल्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील, विद्यमान नगरसेवक सुनील पाटील, नगरसेवक अमोल जाधव आदींनी विचार मांडताना केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलावीत, दहशतवादी संघटनांचा बीमोड करावा आदी मागण्या केल्या.च्कर्जत : तालुक्यातील कशेळे येथील व्यापारी फेडरेशन आणि ग्रुप ग्रामपंचायत कशेळे यांच्या वतीने पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.च्कशेळे गावातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली सभेला उपस्थित होते, तसेच कशेळे गाव आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. व्यापाºयांच्या वतीने उदय पाटील यांनी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून तरु णांनी या पुढे १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे न पाळता शहीद दिन पाळावा अशी सूचना के ली.च्हल्ल्याचे राजकीय भांडवल न करता आपण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे ठाम उभे राहून या हल्ल्याविरोधात जी काही कार्यवाहीचा निर्णय घेतील त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी कशेळे ग्रामपंचायतीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पोखरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.नेरळमध्ये कॅण्डल मार्चनेरळ : पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रविवारी रात्री कॅण्डल मार्च काढण्यात आला. नेरळ गावातील नागरिक आणि सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या संख्येने तरु ण सहभागी झाले होते. कॅण्डल मार्चनंतर नेरळ रेल्वे स्टेशनबाहेर श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रविवार १७ फेब्रुवारी रोजी नेरळकर या नावाखाली कॅण्डल मार्च काढला. कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील जकात नाका येथून निघालेला कॅण्डल मार्च माथेरान रस्त्याने नेरळ रेल्वे स्टेशन येथे पोहचला. या कॅण्डल मार्चमध्ये नेरळमधील सर्व सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्ष आणि सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. कॅ ण्डल मार्चला सुरु वात होण्याआधी मोहाचीवाडी येथून महिला आणि विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढून आपला सहभाग नोंदविला.आम्ही नेरळकर यांनी आयोजित केलेला कॅण्डल मार्च हुतात्मा भाई कोतवाल चौकात पोहचल्यानंतर तेथे शोकसभा घेण्यात आली. त्यावेळी तेथे नेरळच्या सरपंच जान्हवी साळुंखे, माजी सरपंच सावळाराम जाधव आदींची भाषणे झाली. सर्व वक्त्यांनी पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत शहीद जवानांसाठी एक निधी संकलित करून पाठवावा असा निर्णय घेतला. यावेळी नेरळ परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, कर्जत पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड