शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तापमान वाढल्याने पर्यटकांची रायगड किल्ल्याकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 02:29 IST

राज्यात तापमानाचा चढलेला पारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे चाकरमानी आपल्या गावाकडे येण्यास उत्सुक नाहीत

दासगाव - राज्यात तापमानाचा चढलेला पारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे चाकरमानी आपल्या गावाकडे येण्यास उत्सुक नाहीत, तर तापमान ४२ अंशांच्या वर गेल्याने अंगाची लाहीलाही होत असल्याने पर्यटकदेखील किल्ले रायगडाकडे फारसे फिरकत नसल्याने याचा परिणाम रायगडावरीलपर्यटनावर झाला आहे. यामुळे या वर्षी रायगडावर पर्यटकांचा शुकशुकाट आहे.यावर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाने कहर केला आहे. कधी नव्हे ते या परिसरातील तापमान ४२ अंशांहून अधिक गेले आहे. केवळ २० टक्के पर्यटकच रायगडकडे येत असून पर्यटकांनीही गडाकडे पाठ फिरवली आहे. तीव्र उन्हामुळे रायगड फिरताना अंगातून येणाऱ्या घामाच्या धारा पर्यटकांना नकोशा झाल्याचे दिसत आहे. शिवाय, गडावर पर्यटन करताना काही मर्यादाही येत असल्याने पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना पसंती देतात. या हंगामात रायगड रोपवेने दररोज १ ते २ हजार पर्यटकांची ये-जा होत असते; परंतु ही संख्या घटून २०० ते ५०० च्या दरम्यान आली आहे. शाळांना सुट्टी पडली असून, अनेकदा सलग सुट्टीही आल्या होत्या; परंतु तरीही रायगडावर फारशी गर्दी दिसली नाही. यामुळे गडावरील गाईड, परिसरातील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग्स, दही-ताक विक्रे ते, टोप्या विक्रे ते, रोपवे, अशा सुमारे ७० व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे.रायगडावर येणारे पर्यटक मुलाबाळांसह येत असल्याने ते राहण्यासाठी आगाऊ आरक्षण करत असतात; परंतु यावर्षी मे महिन्यात एकही आरक्षण झाले नसल्याचे पाचाड येथील हॉटेल व्यावसायिक अनंत देशमुख यांनी सांगितले. तर यावर्षी पर्यटकांची संख्या मंदावली असून यामुळे व्यवसायही कमी झाल्याचे गणेश ढवळे या विक्रे त्याने सांगितले. रायगडावर पाण्याची सोय अपुरी आहे तर पायथ्याशी असलेल्या रायगड पायथा, पाचाड, हिरकणीवाडी, रोपवे येथे मात्र पाणीटंचाई जाणवते, त्यातच रायगडावर निवासाची सध्या कोणतीही सोय नाही. यामुळे अनेक जण पायथ्याशी राहणे पसंत करतात. पाणीटंचाईमुळे व्यावसायिकांनाच पाणी विकत घ्यावे लागत आहे. याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. स्थानिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले असताना पर्यटकांची तहान कशी भागवायची हा प्रश्न आहे.महाड आणि संपूर्ण कोकण परिसरात ऐन सुट्टीच्या काळात चाकरमानी गावात येण्याचे प्रमाण मोठे असते. मात्र, यंदा ऐन सुट्टीच्या मे महिन्यात मात्र एस.टी.ला गर्दी दिसून येत नसल्याचे आगारप्रमुख कुलकर्णी यांनी सांगितले.गाड्यांना गर्दीच नाहीपर्यटन हंगामाच्या काळात नेहमी महाड आगार गजबजलेले असायचे. मात्र, सध्या गाड्यांना फारशी गर्दी नसल्याने स्थानकावरील व्यावसायिकही हतबल झाले आहेत. यंदा पर्यटकांची संख्या रोडावल्याने फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटन