शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

तापमान वाढल्याने पर्यटकांची रायगड किल्ल्याकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 02:29 IST

राज्यात तापमानाचा चढलेला पारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे चाकरमानी आपल्या गावाकडे येण्यास उत्सुक नाहीत

दासगाव - राज्यात तापमानाचा चढलेला पारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे चाकरमानी आपल्या गावाकडे येण्यास उत्सुक नाहीत, तर तापमान ४२ अंशांच्या वर गेल्याने अंगाची लाहीलाही होत असल्याने पर्यटकदेखील किल्ले रायगडाकडे फारसे फिरकत नसल्याने याचा परिणाम रायगडावरीलपर्यटनावर झाला आहे. यामुळे या वर्षी रायगडावर पर्यटकांचा शुकशुकाट आहे.यावर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाने कहर केला आहे. कधी नव्हे ते या परिसरातील तापमान ४२ अंशांहून अधिक गेले आहे. केवळ २० टक्के पर्यटकच रायगडकडे येत असून पर्यटकांनीही गडाकडे पाठ फिरवली आहे. तीव्र उन्हामुळे रायगड फिरताना अंगातून येणाऱ्या घामाच्या धारा पर्यटकांना नकोशा झाल्याचे दिसत आहे. शिवाय, गडावर पर्यटन करताना काही मर्यादाही येत असल्याने पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना पसंती देतात. या हंगामात रायगड रोपवेने दररोज १ ते २ हजार पर्यटकांची ये-जा होत असते; परंतु ही संख्या घटून २०० ते ५०० च्या दरम्यान आली आहे. शाळांना सुट्टी पडली असून, अनेकदा सलग सुट्टीही आल्या होत्या; परंतु तरीही रायगडावर फारशी गर्दी दिसली नाही. यामुळे गडावरील गाईड, परिसरातील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग्स, दही-ताक विक्रे ते, टोप्या विक्रे ते, रोपवे, अशा सुमारे ७० व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे.रायगडावर येणारे पर्यटक मुलाबाळांसह येत असल्याने ते राहण्यासाठी आगाऊ आरक्षण करत असतात; परंतु यावर्षी मे महिन्यात एकही आरक्षण झाले नसल्याचे पाचाड येथील हॉटेल व्यावसायिक अनंत देशमुख यांनी सांगितले. तर यावर्षी पर्यटकांची संख्या मंदावली असून यामुळे व्यवसायही कमी झाल्याचे गणेश ढवळे या विक्रे त्याने सांगितले. रायगडावर पाण्याची सोय अपुरी आहे तर पायथ्याशी असलेल्या रायगड पायथा, पाचाड, हिरकणीवाडी, रोपवे येथे मात्र पाणीटंचाई जाणवते, त्यातच रायगडावर निवासाची सध्या कोणतीही सोय नाही. यामुळे अनेक जण पायथ्याशी राहणे पसंत करतात. पाणीटंचाईमुळे व्यावसायिकांनाच पाणी विकत घ्यावे लागत आहे. याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. स्थानिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले असताना पर्यटकांची तहान कशी भागवायची हा प्रश्न आहे.महाड आणि संपूर्ण कोकण परिसरात ऐन सुट्टीच्या काळात चाकरमानी गावात येण्याचे प्रमाण मोठे असते. मात्र, यंदा ऐन सुट्टीच्या मे महिन्यात मात्र एस.टी.ला गर्दी दिसून येत नसल्याचे आगारप्रमुख कुलकर्णी यांनी सांगितले.गाड्यांना गर्दीच नाहीपर्यटन हंगामाच्या काळात नेहमी महाड आगार गजबजलेले असायचे. मात्र, सध्या गाड्यांना फारशी गर्दी नसल्याने स्थानकावरील व्यावसायिकही हतबल झाले आहेत. यंदा पर्यटकांची संख्या रोडावल्याने फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटन