शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

तापमान वाढल्याने पर्यटकांची रायगड किल्ल्याकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 02:29 IST

राज्यात तापमानाचा चढलेला पारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे चाकरमानी आपल्या गावाकडे येण्यास उत्सुक नाहीत

दासगाव - राज्यात तापमानाचा चढलेला पारा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे चाकरमानी आपल्या गावाकडे येण्यास उत्सुक नाहीत, तर तापमान ४२ अंशांच्या वर गेल्याने अंगाची लाहीलाही होत असल्याने पर्यटकदेखील किल्ले रायगडाकडे फारसे फिरकत नसल्याने याचा परिणाम रायगडावरीलपर्यटनावर झाला आहे. यामुळे या वर्षी रायगडावर पर्यटकांचा शुकशुकाट आहे.यावर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाने कहर केला आहे. कधी नव्हे ते या परिसरातील तापमान ४२ अंशांहून अधिक गेले आहे. केवळ २० टक्के पर्यटकच रायगडकडे येत असून पर्यटकांनीही गडाकडे पाठ फिरवली आहे. तीव्र उन्हामुळे रायगड फिरताना अंगातून येणाऱ्या घामाच्या धारा पर्यटकांना नकोशा झाल्याचे दिसत आहे. शिवाय, गडावर पर्यटन करताना काही मर्यादाही येत असल्याने पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना पसंती देतात. या हंगामात रायगड रोपवेने दररोज १ ते २ हजार पर्यटकांची ये-जा होत असते; परंतु ही संख्या घटून २०० ते ५०० च्या दरम्यान आली आहे. शाळांना सुट्टी पडली असून, अनेकदा सलग सुट्टीही आल्या होत्या; परंतु तरीही रायगडावर फारशी गर्दी दिसली नाही. यामुळे गडावरील गाईड, परिसरातील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग्स, दही-ताक विक्रे ते, टोप्या विक्रे ते, रोपवे, अशा सुमारे ७० व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे.रायगडावर येणारे पर्यटक मुलाबाळांसह येत असल्याने ते राहण्यासाठी आगाऊ आरक्षण करत असतात; परंतु यावर्षी मे महिन्यात एकही आरक्षण झाले नसल्याचे पाचाड येथील हॉटेल व्यावसायिक अनंत देशमुख यांनी सांगितले. तर यावर्षी पर्यटकांची संख्या मंदावली असून यामुळे व्यवसायही कमी झाल्याचे गणेश ढवळे या विक्रे त्याने सांगितले. रायगडावर पाण्याची सोय अपुरी आहे तर पायथ्याशी असलेल्या रायगड पायथा, पाचाड, हिरकणीवाडी, रोपवे येथे मात्र पाणीटंचाई जाणवते, त्यातच रायगडावर निवासाची सध्या कोणतीही सोय नाही. यामुळे अनेक जण पायथ्याशी राहणे पसंत करतात. पाणीटंचाईमुळे व्यावसायिकांनाच पाणी विकत घ्यावे लागत आहे. याचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. स्थानिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले असताना पर्यटकांची तहान कशी भागवायची हा प्रश्न आहे.महाड आणि संपूर्ण कोकण परिसरात ऐन सुट्टीच्या काळात चाकरमानी गावात येण्याचे प्रमाण मोठे असते. मात्र, यंदा ऐन सुट्टीच्या मे महिन्यात मात्र एस.टी.ला गर्दी दिसून येत नसल्याचे आगारप्रमुख कुलकर्णी यांनी सांगितले.गाड्यांना गर्दीच नाहीपर्यटन हंगामाच्या काळात नेहमी महाड आगार गजबजलेले असायचे. मात्र, सध्या गाड्यांना फारशी गर्दी नसल्याने स्थानकावरील व्यावसायिकही हतबल झाले आहेत. यंदा पर्यटकांची संख्या रोडावल्याने फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Raigadरायगडtourismपर्यटन