शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

आयओटीएलमधील कामगारांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:11 AM

उरण तालुक्यात धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आयओटीएल कंपनीमध्ये व्ही. बी. इंजिनीअरिंग या खासगी ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी मागील १५ दिवसांपासून वेतनवाढीची मागणी मान्य न झाल्याने बुधवारपासून काम बंद आंदोलन केले.

उरण : उरण तालुक्यात धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आयओटीएल कंपनीमध्ये व्ही. बी. इंजिनीअरिंग या खासगी ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी मागील १५ दिवसांपासून वेतनवाढीची मागणी मान्य न झाल्याने बुधवारपासून काम बंद आंदोलन केले. काम बंदमुळे कंपनीच्या कामकाजावर मात्र विपरीत परिणाम झाला आहे.उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आयओटीएल ही रासायनिक कंपनी कार्यरत आहे. कंपनीत चालणाºया विविध कामांची कंत्राट व्ही. बी. इंजिनीअरिंग या ठेकेदार कंपनीला देण्यात आली आहेत. साधारणत: ३५ स्थानिक कामगार विविध विभागांत १८ वर्षांपासून काम करीत असले तरी आवश्यक सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना वेळेत वेतन मिळत नाही. कामगारांच्या पीएफच्या रकमाही वेळेत खात्यावर जमा केल्या जात नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ठेकेदार बदलण्याची मागणी कामगारांकडून होऊ लागली आहे. अशा या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. व्ही. बी. इंजिनीअरिंग कंपनीचे व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनीवाढीसंदर्भात दोन ते तीन वेळा बैठकाही झाल्या. मात्र, योग्य तोडगा न निघाल्याने कामगारांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे.व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कामगार संतप्त झाले असून, बुधवारपासून व्ही. बी. इंजिनीअरिंग या ठेकेदारी कंपनीविरोधात काम बंदचे हत्यार उपसल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी दिली. कामगारांना वार्षिक सहा हजारांपर्यंत वेतनवाढीची तयारी व्यवस्थापनाने दर्शविली आहे. मात्र, ही तुटपुंजी वेतनवाढ कामगारांना मान्य नाही. वेळीच कामगारांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास यापुढे कुटुंबीयांसह उपोषणाला बसावे लागेल, असा इशाराही घरत यांनी व्यवस्थापनाला या वेळी दिला.वेतनवाढ आणि इतर मागण्यांबाबत कामगार संघटना, व्यवस्थापन यांच्यात चर्चा सुरू आहेत. यामध्ये निश्चित तोडगा निघेल, असा विश्वास कंपनीचे मालक विलास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Raigadरायगड