शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

जमीनींच्या अहवालाचे काम संथगतीने

By admin | Updated: August 18, 2016 04:53 IST

तालुक्यातील हजारो हेक्टर जमीनी विविध कंपन्यांनी खरेदी केल्या आहेत. जमीन खरेदी प्रकरणामध्ये कुळवहीवाट कायद्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे काम तहसिलदार

- आविष्कार देसाई,  अलिबागतालुक्यातील हजारो हेक्टर जमीनी विविध कंपन्यांनी खरेदी केल्या आहेत. जमीन खरेदी प्रकरणामध्ये कुळवहीवाट कायद्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे काम तहसिलदार स्तरावून अतिशय संथगतीने सुरु आहे. त्यामुळे श्रमीक मुक्तीदलाने प्रशासनाच्या लालफीतशाहीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यामध्ये उद्योगांच्या नावावर जमीनी खरेदी करुन रिअल इस्टेटसाठी बाजार विक्री करणाऱ्यांच्या विरोधात जन आंदोलने उभी राहत आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे प्रशासन गांर्भियाने पाहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.स्पेशल इकॉनॉमीक झोन (सेझ) च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रायगड जिल्ह्यातील जमीनींवर डल्ला मारण्यात आला होता. सेझच्या माध्यमातून जमीनीचे व्यवहार तातडीने होत असल्याने विविध कंपन्यांनी आपापल्या प्रस्तावित प्रकल्पासाठी मोठ्या संख्येने जमीनी खरेदी केल्या होत्या. अलिबाग तालुक्यातील कुसूंबळे, काचरी, पिटकेरी, मेढेखार, सुकटणे यासह अन्य काही गावीतील जमीनींची मोठ्या प्रमाणात खरेदी पटीनी पॉवरसह अन्य कंपन्यांनी सुमारे २० वर्षापूर्वी केली होती.जमीनींची खरेदी करताना कुळवहीवाट आणि शेत जमीन कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यात आले आहे अथवा नाही. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना तहसिलदारांनी देण्याचे ठरले होते. याबाबतची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत ४ एप्रिल २०१६ रोजी पार पडली होती. बैठकीला श्रमीक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. मात्र अद्यापपर्यंत काय कार्यवाही केली आहे. याबाबत श्रमीक मुक्तीदलाला कळविले नसल्याचे जिल्हा प्रतिनीधी राजन भगत यांनी सांगितले.कुळवहीवाट कायद्यानुसार शेतजमीनीची विक्री, बक्षीस, भाडेपट्टा अशा विविध मार्गांनी शेतकरी नसलेल्यांना हस्तांतरण करण्यावर बंधने टाकण्यात आली आहेत.प्रकल्प न उभारलेल्या जमीनी आम्हाला परत द्याव्यात अशी मागणीही श्रमीक मुक्तीदलाचे कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी केली.उद्योजकांनी हमी द्यावी कलम ६३ नुसार जिल्हाधिकारी हस्तांतरणास परवानगी देऊ शकतात, परंतु शेतकरी नसलेल्यांचे वार्षिक उत्पन्न १२ हजार रुपयांपेक्षा कमी असावे लागते. याच कायद्याच्या कलम ६३ -१ अ नुसार औद्योगिक प्रकल्पाच्या वापरासाठी शेत जमीन विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी परवानगी देऊ शकतात. मात्र घेतलेल्या जमीनी त्याच उद्देशासाठी वापरणार असल्याची हमी उद्योजकांना द्यावी लागते असे श्रमीक मुक्तीदलाचे कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी सांगितले. अहवाल देण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याचे अलिबागचे तहसिलदार प्रकाश सकपाळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.10 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रकल्प न उभारल्यास तीच जमीन कायद्यानुसार शेतकरी परत मागू शकतो, अशी कायद्यामध्ये तरतूद असल्याचे श्रमीक मुक्तीदलाचे कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी लोकमतला सांगितले. 20 वर्षापूर्वी अलिबाग तालुक्यातील कुसूंबळे, काचरी, पिटकेरी, मेढेखार, सुकटणे यासह अन्य काही गावीतील जमीनींची मोठ्या प्रमाणात खरेदी पटीनी पॉवरसह अन्य कंपन्यांनी केली होती.10हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल, तर विकास आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. १० वर्षाच्या कालावधीमध्ये प्रकल्प न उभारल्यास तीच जमीन कायद्यानुसार शेतकरी परत मागू शकतो, अशी तरतूद कायद्यामध्ये आहे.