शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड तालुक्यातील आंबोली कालव्याचे काम रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 00:10 IST

Murud News : मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर अबलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल तीन वर्षांपासून बंद पडल्याने, धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भातपिकावरच अवलंबून राहाणे क्रमप्राप्त झाले आहे.

मुरुड : राज्यभर शासन जलयुक्त शिवार योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करत असून अधिकाधिक जमीन ओलिताखाली आणून बळीराजाचे मनोधैर्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर अबलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल तीन वर्षांपासून बंद पडल्याने, धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भातपिकावरच अवलंबून राहाणे क्रमप्राप्त झाले आहे.अंबोली धरण लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून, २०१५ पासून बंद ठेवण्यात आल्याने, अल्पभूधारक शेतकऱ्यांना   प्रतीक्षा करावी लागत आहे. खारअंबोली धरणाची पाणी साठवणूक क्षमता प्रचंड आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास सुमारे ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून, शेतकऱ्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळणार आहे.अंबोली धरणाचा शुभारंभ सन २००९ मध्ये पूर्ण झाले, त्यासाठी शासनाचे सुमारे २९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांना दुबार पीक घेऊन ते पाणी पिण्यासाठी देण्याचे हे प्रयोजन होते. हे धरण मुरुडसह लगतच्या १२ गावांची जीवन वाहिनी ठरली असून, मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. संपूर्ण मुरुड शहरालाही हेच धरण पाणी पाजत आहे.आंबोली धरण उजव्यातीर कालव्याचे काम ७.१० किमीपैकी ६.१० किमी अपूर्ण असून, डाव्या तीर कालव्याचे २.६४ किमीपैकी १.६४ किमी काम अपूर्ण आहे. अल्पभूधारक शेतकरी धरणाचे पाणी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना जोडधंदा मिळेल. त्यातून रोजगार मिळावा, अशी त्यांची धारणा आहे.नवीन शासन धोरणानुसार कालवे उघडे न ठेवता बंदिस्त असावेत. त्यानुसार, एस्टिमेट तयार करणे, त्यास प्रशासकीय मंजुरी घेणे या बाबी आहेत. गेल्या अनेक वर्षे आंबोली धरणातील कालव्यांची कामे रखडली असल्याने, येथील स्थानिक शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येत नाही. फक्त भातपीक घेऊन समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या व अन्य तत्सम पीक न घेतल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही. ते पूर्वीप्रमाणे आहेत, त्याच स्थितीत आहेत. कालव्यांचे काम प्रदीर्घ काळ रखडल्यामुळे येथील स्थानिक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

राज्य शासनाकडून निधी प्राप्त करू- महेंद्र दळवी आमदार महेंद्र दळवी यांनी, आंबोली धरणातील कालव्यांची कामे रखडली, ही वस्तुस्थिती असून, मी या प्रश्नी स्वतः विशेष लक्ष घालणार असून, शासन पातळीवर कालव्यांची कामे कशी जलद गतीने करता येतील, यासाठी प्रयत्न करणार आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाचे बरीचशी रक्कम खर्च होत आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्यावर विविध प्रश्नांसाठी निधी प्राप्त होणार आहे. थोडा वेळ जरी लागत असला, तरी आंबोली धरणाच्या कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी प्राप्त करून घेऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

आंबोली धरणाच्या पाण्याचा उपयोग हा सध्या पिण्यासाठीच होत आहे. एकूण पाण्यापैकी १५ टक्के पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. बाकी सर्व पाणी धरणातच साचले जाते. डावा तीर कालवा तेलवडेपर्यंत जावा व उजवा तीर कालवा खोकरीपर्यंत गेल्यास शेतकऱ्यांना मुबलक पाणीपुरवठा होऊन दुबार पीक घेता येणार आहे.  तरी कालव्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी मागणी केली आहे.- मनोज कमाने, शेतकरी 

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी