शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

सासू टोमणे मारत असल्याने तिने वास्तुशांतीच्या जेवणात कालवलं विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 20:40 IST

प्रज्ञाचे पहिले लग्न झाले होते. ते शिंदे कुटूंबामुळे मोडले व सोडचिठ्ठी घ्यावी लागली होती.

खालापूर: महड येथील वास्तुशांती कार्यक्रमाच्या अन्नातून विषबाधा प्रकरणी पोलीसानी  प्रज्ञा( उर्फ ज्योती) सुरेश सुरवशे(वय30) या महिलेला पोलिसांनी अटक केली.  कौटूंबीक वादातून  माने व शिंदे  व  सुरवशे यांचे संपूर्ण कूटूंब संपविण्याच्या द्वेषापोटी हे कृत्य केल्याची कबुली तिने दिल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी 18जून रोजी महड येथे सुभाष माने यांच्या घरी वास्तुशांती कार्यक्रमात अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 80 जणांना उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. दुर्देवाने ऊपचारापूर्वीच  कल्याणी प्रकाश शिंगुडे (वय-7 वर्ष) ऋषिकेश  शिंदे (वय-12 वर्ष ) व  प्रगती  शिंदे (वय 13 वर्ष)     तीन मुलांचा मृत्यू झाला. तर गुरूवारी ऊपचार सुरू असताना विजय शिंदे (11) व गोपीनाथ नकुरे(वय54) आणखी दोघांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी पहिल्या दिवसापासून या घटनेला गांभीर्याने घेत तपास सुरू केला होता. रायगड पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगडचे जमील शेख, खालापूरचे पोलीस निरिक्षक विश्वजीत कांईगडे, महिला पोलीस निरीक्षक अंबिका अंधारे, सपोनी शेलार यांनी तपास मोहीम राबवित सुरवातीला तीन संशयिताना ताब्यात घेतले होते. तब्बल चार दिवसाच्या चौकशीनंतर सुभाष माने यांची नातेवाईक प्रज्ञा  हिनेच डाळीत विष टाकल्याची कबुली दिली. सुभाष माने, सुरवशे तसेच मयत मुलातील शिंदे कुटूंब एकमेकांचे नातेवाईक आहेत. प्रज्ञाची सासू सिंधू सुरवशे तसेच सुभाष माने यांची पत्नी सरिता प्रज्ञाला नेहमी तू काळी आहेस, जेवण बनवता येत नाही म्हणून टोमणे मारून अपमान करत असे. तसेच तिच्या नणंद असलेल्या मयत (मुलांच्या आई)उज्वला व अलका यांदेखील त्रास देत असल्यामुळे हे कुटूंब संपविण्यासाठी डाळीत विष टाकल्याची कबुली प्रज्ञाने दिली. पोलिसांनी प्रज्ञावर मनुष्यवध तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक भासे, ठाकूर, सहा.फौजदार पवार, पोलीस नाईक प्रशांत म्हाञे, गबाळे, शेडगे,कोकाटे, कोकरे , महिला पोलीस नाईक खैर, पोलीस शिपाई समीर पवार, तांदळे यांनी महत्वाची  भूमिका बजावल्याचे पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी पञकार परिषदेत सांगितले.

ज्यांच्यावर राग होता ते सुभाष माने,सासू सिंधू सुरवशे, नणंद उज्वला कदम व अलका शिंदे या लवकर जेवल्यामुळे प्रज्ञाला त्यांना मारण्याची संधी मिळाली नाही. परंतु शिंदे कुटूंबातील मुलं जेवायला आल्यावर तिने वरणाच्या बादलीत फोरेट विषारी द्रव्य टाकले. त्यामुळे या मुलांना अन्नातून विषबाधा झाली.  प्रज्ञाचे पहिले लग्न झाले होते. ते शिंदे कुटूंबामुळे मोडले व सोडचिठ्ठी घ्यावी लागली होती. त्यामुळे पुन्हा आपला संसार मोडेल, या भीतीपोटी तिने सासू सिंधु, सुभाष माने व त्याची पत्नी सरिता तसेच नणंद शिंदे व कदम कुटूंब संपविण्याचा अघोरी निर्णय घेतला व त्यातून विषबाधा प्रकरण घडले. 

टॅग्स :WomenमहिलाCrimeगुन्हाPoliceपोलिस