शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यात इंदरदेवनजिकच्या डोंगरात वणव्याचे रौद्ररूप, धनगरवाडीतील ४८ घरांची राखरांगोळी; वनसंपदेचीही मोठी हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:50 IST

वणव्यात वनसंपदेची मोठी नुकसान झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी टळली.

शशिकांत मोरे -

धाटाव - जसजसे तापमान वाढत आहेत तसतशा उन्हाच्या झळानि अंगाची लाहिलाही होत आहे.डोंगर भागात दिवसागणिक लागणाऱ्या वणव्यात जंगल,पशू,प्राणी अक्षरशः होरपळून जाताना दिसत आहे.आधीच कळसगिरी व अन्य जंगले आगीच्या भस्मस्थानी पडत आहेत.प्रशासन मुख्यतः वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे वास्तव असतानाच काल गुरुवारी सायंकाळी उशिरा धामणसई हद्दीतील इंदरदेव धनगरवाडी डोंगराला अचानक लागलेल्या रौद्ररूपी वणव्याचा येथील ग्रामस्थांना सामना करावा लागला.या अचानक लागलेल्या वणव्यात अनेक घरे जळून खाक रांगोळी झाली.वणव्याचा भडका थरकाप उडविणारा होता. अनेकांची संसार उघड्यावर आली. वणव्यात वनसंपदेची मोठी नुकसान झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी टळली.       दरम्यान वणव्याचा भडका थरकाप उडविणारा होता.त्यातच वाऱ्याचा जोश असल्याने घरे भस्मसात होण्याची भीतीदायक घटना घडली तर वणवा आगीचे वृत्त समजताच आग लागल्याचे समजताच धाटाव येथील अग्निशामक दलाची वाहने आणि रोह्यातील बचाव कार्यासाठी सक्रिय असलेले एस.व्ही.आर.एस बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर ठेवून ग्रामस्थाच्या सहकार्याने आग नियंत्रणात आणली.वणव्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी उन्हाच्या कडाक्यामुळे आग वेगाने पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.याठिकाणी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड,तहसीलदार किशोर देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली.    सायंकाळी लागलेल्या वणव्याचे आगीत रौद्ररूप झाले आणि वाऱ्याच्या जोशात भडकत गेलेल्या आगीने धनगरवाडीतील ४८ ग्रामस्थांची सांसारिक सामानाची अक्षरशः राखरांगोळी केली.सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी मात्र टळली.वणव्यात घरांची अक्षरशः होळी झाल्याने बाधित कुटुंबांचे लवकरच पुनर्वसन करण्यात यावे,अशी मागणी आता जोर धरत आहे.याठिकाणी आग विझविण्यासाठी तत्काळ मदतीसाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या सर्व अधिकारी,कर्मचारी वर्ग यासह एस.व्ही.आर.एस बचाव पथकाचे अथक आणि धनगरवाडीतील ग्रामस्थ वर्गाचे कौतुक करण्यात येत असून आता वाढत्या वणव्यावर नियंत्रण,वणवा लावणाऱ्यांना पकडून कारवाई करण्याची मोहीम वन विभाग आतातरी घेईल का? असा प्रश्न समोर येत आहे.

टॅग्स :RaigadरायगडfireआगFire Brigadeअग्निशमन दल