शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

रोह्यात इंदरदेवनजिकच्या डोंगरात वणव्याचे रौद्ररूप, धनगरवाडीतील ४८ घरांची राखरांगोळी; वनसंपदेचीही मोठी हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:50 IST

वणव्यात वनसंपदेची मोठी नुकसान झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी टळली.

शशिकांत मोरे -

धाटाव - जसजसे तापमान वाढत आहेत तसतशा उन्हाच्या झळानि अंगाची लाहिलाही होत आहे.डोंगर भागात दिवसागणिक लागणाऱ्या वणव्यात जंगल,पशू,प्राणी अक्षरशः होरपळून जाताना दिसत आहे.आधीच कळसगिरी व अन्य जंगले आगीच्या भस्मस्थानी पडत आहेत.प्रशासन मुख्यतः वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे वास्तव असतानाच काल गुरुवारी सायंकाळी उशिरा धामणसई हद्दीतील इंदरदेव धनगरवाडी डोंगराला अचानक लागलेल्या रौद्ररूपी वणव्याचा येथील ग्रामस्थांना सामना करावा लागला.या अचानक लागलेल्या वणव्यात अनेक घरे जळून खाक रांगोळी झाली.वणव्याचा भडका थरकाप उडविणारा होता. अनेकांची संसार उघड्यावर आली. वणव्यात वनसंपदेची मोठी नुकसान झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी टळली.       दरम्यान वणव्याचा भडका थरकाप उडविणारा होता.त्यातच वाऱ्याचा जोश असल्याने घरे भस्मसात होण्याची भीतीदायक घटना घडली तर वणवा आगीचे वृत्त समजताच आग लागल्याचे समजताच धाटाव येथील अग्निशामक दलाची वाहने आणि रोह्यातील बचाव कार्यासाठी सक्रिय असलेले एस.व्ही.आर.एस बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर ठेवून ग्रामस्थाच्या सहकार्याने आग नियंत्रणात आणली.वणव्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी उन्हाच्या कडाक्यामुळे आग वेगाने पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.याठिकाणी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड,तहसीलदार किशोर देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली.    सायंकाळी लागलेल्या वणव्याचे आगीत रौद्ररूप झाले आणि वाऱ्याच्या जोशात भडकत गेलेल्या आगीने धनगरवाडीतील ४८ ग्रामस्थांची सांसारिक सामानाची अक्षरशः राखरांगोळी केली.सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी मात्र टळली.वणव्यात घरांची अक्षरशः होळी झाल्याने बाधित कुटुंबांचे लवकरच पुनर्वसन करण्यात यावे,अशी मागणी आता जोर धरत आहे.याठिकाणी आग विझविण्यासाठी तत्काळ मदतीसाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या सर्व अधिकारी,कर्मचारी वर्ग यासह एस.व्ही.आर.एस बचाव पथकाचे अथक आणि धनगरवाडीतील ग्रामस्थ वर्गाचे कौतुक करण्यात येत असून आता वाढत्या वणव्यावर नियंत्रण,वणवा लावणाऱ्यांना पकडून कारवाई करण्याची मोहीम वन विभाग आतातरी घेईल का? असा प्रश्न समोर येत आहे.

टॅग्स :RaigadरायगडfireआगFire Brigadeअग्निशमन दल