शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रासायनिक सांडपाणी नेमके कोणाचे?; कंपनी-प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:30 AM

सुदर्शन कंपनीच्या सुरक्षा भिंतीबाहेरील सांडपाण्याचा संभ्रम कायम

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड एमआयडीसीमधील सुदर्शन केमिकल या कंपनीच्या सुरक्षा भिंतीबाहेर गेल्या वर्षभरापासून पाणी साचत आहे. अनेक वेळा या पाण्याला पांढरा रंग येतो. मात्र, हे पाणी नेमके कुठून येते, याचा पत्ता आजतागायत एमआयडीसी किंवा प्रदूषण मंडळाला लागलेला नाही. कंपनी आणि शासकीय यंत्रणा एकमेकांवर बोट दाखवत असली तरी या पाण्यासंदर्भात संभ्रम निर्माण होऊन रासायनिक सांडपाणी नेमके कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होते आहे. वारंवार घडणाऱ्या या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण विभागाकडूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.महाड औद्योगिक वसाहतींतील नाले व गटारात सोडण्यात येणाºया कंपन्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. येथील काही कंपन्यांवर कारवाईही करण्यात आल्या आहेत. मात्र, आजही अनेक ठिकाणी थेट गटारांमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. येथील सुदर्शन केमिकल कंपनीच्या सुरक्षा भिंतीबाहेर सध्या पाणी साचले आहे. या पाण्याला फेसासारखा पांढरा रंग आला आहे. सुदर्शन केमिकल कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात जिप्सम साठवून ठेवण्यात आला आहे. याचठिकाणी असलेल्या सुरक्षा भिंतीजवळ हे पांढरे पाणी असल्याने प्रदूषण मंडळानेही याच कंपनीला दोषी ठरवत सांडपाणी उचलण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, हे पाणी आपले नसल्याचे कंपनी प्रशासनाने सांगितले आहे. गेले वर्षभर याबाबत तक्रारी सुरू आहेत. ऐन उन्हाळ्यातही फेसाळयुक्त रासायनिक सांडपाणी या ठिकाणी साचून होते. याच ठिकाणाहून एमआयडीसीची एक सांडपाणीवाहिनी जाते, तिची गळती दुरुस्त करण्यात आली होती. मात्र, हे पाणी स्वच्छ आणि पिण्याचे असल्याने त्याला पांढरा रंग येणे शक्य नसल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे. यामुळे गळतीच्या पाण्यात कंपनीच्या आवारातील जिप्समचे पांढरे पाणी जमिनीत मुरून बाहेर येत असावे, असा संशय व्यक्त केला जात असला तरी कंपनी मात्र इतरांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहे.२०१८ मध्ये याबाबत महाड एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केल्याचे सुदर्शन कंपनीचे व्यवस्थापक बी. एन. कदम यांनी सांगितले. या ठिकाणी साचत असलेले पाणी आपल्या कंपनीचे नसून सांडपाणी वाहिनीला गळती असल्याचे त्यांनी नमूद केले. महाड एमआयडीसीने मात्र सांडपाणी वाहिनीला गळती नसल्याचे स्पष्ट केले. या ठिकाणी कंपनीची पाइपलाइन नसल्याचे पांढºया रंगाचे पाणी एमआयडीसीचे असण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण उपअभियंता एस. एस. गीते यांनी दिले आहे.एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाचे बी. एल. वाघमारे यांनीही या ठिकाणी पाहणी करून हे पाणी आपले नसल्याचे सांगितले. यामुळे या ठिकाणी नक्की कोणाचे पाणी मुरते आहे? हा प्रश्नच निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक टी. एस. देशमुख यांनी या कंपनीविरोधात आणि कंपनीबाहेरील पाण्यासंदर्भात प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली आहे. जर प्रदूषण मंडळाने ठोस पावले उचलली नाही तर कारखान्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.महाड एमआयडीसीतील रासायनिक पाण्याबाबत प्राप्त तक्रारीनुसार येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. मात्र, हे पाणी सुदर्शन केमिकल कंपनीचे नसल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत आहे.- जयदीप कुंभार, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड