शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

'गीतेसाहेब, कागदाचा कारखाना कुठे आहे?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:32 IST

२०१४ च्या निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात कागदाचा कारखाना आणणार असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना बांबूची लागवड करण्याचा सल्ला खा. अनंत गीते यांनी दिला.

खेड : २०१४च्या निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात कागदाचा कारखाना आणणार असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना बांबूची लागवड करण्याचा सल्ला खा. अनंत गीते यांनी दिला. मात्र, पाच वर्षे झाली तरी तो कागदाचा कारखाना काही आला नाही, त्यामुळे यांच्या बोलण्यात येऊन बांबूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गीतेसाहेब, कुठे आहे तुमचा कागदाचा कारखाना, असा प्रश्न महाआघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी खा. गीते यांना केला. ते शुक्रवारी खेड तालुक्यातील चाटाव येथे बोलत होते.पाच वर्षांपूर्वी सत्तेत बदल झाल्यावर जे आधीच्या राज्यकर्त्यांनी केले नाही ती कामे करून दाखवण्याचे आश्वासन यांनी दिले. मात्र, आघाडी सरकारच्या काळात गोरगरिबांना शिधापत्रिकेवर स्वस्त दरात मिळणारे धान्य या सरकारने बंद केले, १५ लाख खात्यात टाकण्याचे सांगितले गेले. दरवर्षी दोन कोटी रोजगाराची आश्वासने युवकांना दिली. मात्र, याउलट नोटाबंदीने असलेले व्यवसाय बुडवले. भजी तळणे, ही रोजगाराची नवी व्याख्या या सरकारने दिली. हे सरकार कुचकामी निघाले. यांनी सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे, असे तटकरे म्हणाले. ३० वर्षे या मतदारसंघाने गीतेंना संधी दिली. मात्र, दहा वर्षे ते केंद्रात मंत्री असूनही त्यांनी रोजगाराची निर्मिती केली नाही, असा आरोप त्यांनी केला. निवडून आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील टोल रद्द करण्याचे तसेच रेल्वेच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले.

मोबाइल नेटवर्कची समस्या वाढली आहे. रेल्वेच्या समस्या वाढत आहेत, त्यांना योग्य ठिकाणी थांबे मिळावेत, अशी मागणी आ. संजय कदम यांनी केली. तर उज्ज्वला गॅस योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याची टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. एक लाख ५८ हजार लोकांपर्यंत गीतेंनी ही योजना पोहोचवली, असे त्यांच्या कार्यअहवालात दिले आहे;
पण यांच्या सरकारने गॅसची किंमत ९०० रुपयांवर नेऊन ठेवली आहे. आता ते तुमच्या दारी येतील तेव्हा त्यांना हे प्रश्न विचारा, असे आवाहन त्यांनी केले आहे. महिलांवर अत्याचार वाढलेत. लहान मुलींवरही अत्याचार झालेत आणि मोदी बेटी बचावचा नारा देतात आणि त्यांचे आमदार बेटी भगाव बोलतात. या पापात शिवसेना वाटेकरी आहे, असे वाघ म्हणाल्या. ‘धनुष्य महत्त्वाचा नाही तर मनुष्य महत्त्वाचा आहे’, असा नारा त्यांनी दिला.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेsunil tatkareसुनील तटकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019