शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

'गीतेसाहेब, कागदाचा कारखाना कुठे आहे?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:32 IST

२०१४ च्या निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात कागदाचा कारखाना आणणार असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना बांबूची लागवड करण्याचा सल्ला खा. अनंत गीते यांनी दिला.

खेड : २०१४च्या निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात कागदाचा कारखाना आणणार असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना बांबूची लागवड करण्याचा सल्ला खा. अनंत गीते यांनी दिला. मात्र, पाच वर्षे झाली तरी तो कागदाचा कारखाना काही आला नाही, त्यामुळे यांच्या बोलण्यात येऊन बांबूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गीतेसाहेब, कुठे आहे तुमचा कागदाचा कारखाना, असा प्रश्न महाआघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी खा. गीते यांना केला. ते शुक्रवारी खेड तालुक्यातील चाटाव येथे बोलत होते.पाच वर्षांपूर्वी सत्तेत बदल झाल्यावर जे आधीच्या राज्यकर्त्यांनी केले नाही ती कामे करून दाखवण्याचे आश्वासन यांनी दिले. मात्र, आघाडी सरकारच्या काळात गोरगरिबांना शिधापत्रिकेवर स्वस्त दरात मिळणारे धान्य या सरकारने बंद केले, १५ लाख खात्यात टाकण्याचे सांगितले गेले. दरवर्षी दोन कोटी रोजगाराची आश्वासने युवकांना दिली. मात्र, याउलट नोटाबंदीने असलेले व्यवसाय बुडवले. भजी तळणे, ही रोजगाराची नवी व्याख्या या सरकारने दिली. हे सरकार कुचकामी निघाले. यांनी सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे, असे तटकरे म्हणाले. ३० वर्षे या मतदारसंघाने गीतेंना संधी दिली. मात्र, दहा वर्षे ते केंद्रात मंत्री असूनही त्यांनी रोजगाराची निर्मिती केली नाही, असा आरोप त्यांनी केला. निवडून आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील टोल रद्द करण्याचे तसेच रेल्वेच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले.

मोबाइल नेटवर्कची समस्या वाढली आहे. रेल्वेच्या समस्या वाढत आहेत, त्यांना योग्य ठिकाणी थांबे मिळावेत, अशी मागणी आ. संजय कदम यांनी केली. तर उज्ज्वला गॅस योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याची टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. एक लाख ५८ हजार लोकांपर्यंत गीतेंनी ही योजना पोहोचवली, असे त्यांच्या कार्यअहवालात दिले आहे;
पण यांच्या सरकारने गॅसची किंमत ९०० रुपयांवर नेऊन ठेवली आहे. आता ते तुमच्या दारी येतील तेव्हा त्यांना हे प्रश्न विचारा, असे आवाहन त्यांनी केले आहे. महिलांवर अत्याचार वाढलेत. लहान मुलींवरही अत्याचार झालेत आणि मोदी बेटी बचावचा नारा देतात आणि त्यांचे आमदार बेटी भगाव बोलतात. या पापात शिवसेना वाटेकरी आहे, असे वाघ म्हणाल्या. ‘धनुष्य महत्त्वाचा नाही तर मनुष्य महत्त्वाचा आहे’, असा नारा त्यांनी दिला.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेsunil tatkareसुनील तटकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019