शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
5
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
6
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
7
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
8
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
9
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
10
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
11
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
12
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
13
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
14
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
15
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
16
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
17
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
18
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
19
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
20
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक

'गीतेसाहेब, कागदाचा कारखाना कुठे आहे?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:32 IST

२०१४ च्या निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात कागदाचा कारखाना आणणार असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना बांबूची लागवड करण्याचा सल्ला खा. अनंत गीते यांनी दिला.

खेड : २०१४च्या निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात कागदाचा कारखाना आणणार असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना बांबूची लागवड करण्याचा सल्ला खा. अनंत गीते यांनी दिला. मात्र, पाच वर्षे झाली तरी तो कागदाचा कारखाना काही आला नाही, त्यामुळे यांच्या बोलण्यात येऊन बांबूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गीतेसाहेब, कुठे आहे तुमचा कागदाचा कारखाना, असा प्रश्न महाआघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी खा. गीते यांना केला. ते शुक्रवारी खेड तालुक्यातील चाटाव येथे बोलत होते.पाच वर्षांपूर्वी सत्तेत बदल झाल्यावर जे आधीच्या राज्यकर्त्यांनी केले नाही ती कामे करून दाखवण्याचे आश्वासन यांनी दिले. मात्र, आघाडी सरकारच्या काळात गोरगरिबांना शिधापत्रिकेवर स्वस्त दरात मिळणारे धान्य या सरकारने बंद केले, १५ लाख खात्यात टाकण्याचे सांगितले गेले. दरवर्षी दोन कोटी रोजगाराची आश्वासने युवकांना दिली. मात्र, याउलट नोटाबंदीने असलेले व्यवसाय बुडवले. भजी तळणे, ही रोजगाराची नवी व्याख्या या सरकारने दिली. हे सरकार कुचकामी निघाले. यांनी सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे, असे तटकरे म्हणाले. ३० वर्षे या मतदारसंघाने गीतेंना संधी दिली. मात्र, दहा वर्षे ते केंद्रात मंत्री असूनही त्यांनी रोजगाराची निर्मिती केली नाही, असा आरोप त्यांनी केला. निवडून आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील टोल रद्द करण्याचे तसेच रेल्वेच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले.

मोबाइल नेटवर्कची समस्या वाढली आहे. रेल्वेच्या समस्या वाढत आहेत, त्यांना योग्य ठिकाणी थांबे मिळावेत, अशी मागणी आ. संजय कदम यांनी केली. तर उज्ज्वला गॅस योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याची टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. एक लाख ५८ हजार लोकांपर्यंत गीतेंनी ही योजना पोहोचवली, असे त्यांच्या कार्यअहवालात दिले आहे;
पण यांच्या सरकारने गॅसची किंमत ९०० रुपयांवर नेऊन ठेवली आहे. आता ते तुमच्या दारी येतील तेव्हा त्यांना हे प्रश्न विचारा, असे आवाहन त्यांनी केले आहे. महिलांवर अत्याचार वाढलेत. लहान मुलींवरही अत्याचार झालेत आणि मोदी बेटी बचावचा नारा देतात आणि त्यांचे आमदार बेटी भगाव बोलतात. या पापात शिवसेना वाटेकरी आहे, असे वाघ म्हणाल्या. ‘धनुष्य महत्त्वाचा नाही तर मनुष्य महत्त्वाचा आहे’, असा नारा त्यांनी दिला.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेsunil tatkareसुनील तटकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019