शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अल्पसंख्याक, बहुजनांच्या मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो: खासदार सुनील तटकरे

By राजेश भोस्तेकर | Updated: June 14, 2024 18:12 IST

तरीही विरोधकांचा झाला भ्रमनिरास

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : रायगड लोकसभा निवडणूक चुरशीची होईल असे वातावरण निर्माण झाले होते. महायुती पक्षात एकोपा राहणार नाही असाही भ्रम निर्माण केला होता. तसेच संविधान बदलाचा प्रचार, अल्पसंख्यांक, बहुजन समाजाची सहानभुती यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाले होते. हे रोखण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो हे मान्य करतो. मात्र एवढे करूनही रायगडात विरोधकांचा भ्रम नीरस होऊन रायगडाच्या जनतेने आमच्या विकास कामावर विश्वास ठेवून लोकसभेत मोठ्या मताधिक्याने विजय देऊन पाठवला असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी मांडले आहे. 

रायगडचे नवनिर्वाचित खासदार यांची निवडून आल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद अलिबाग येथे शुक्रवारी १४ जून रोजी राष्ट्रवादी भवनात सुनील तटकरे यांनी घेतली. यावेळी आपल्या यशाबद्दल आणि लोकसभा मतदार संघातील विकासाबाबत आपले मत व्यक्त केले. आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक, तालुकाध्यक्ष जयंत भगत, हर्षल पाटील पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

विकासाच्या दृष्टीने आम्ही लोकसभा जिंकलो. अल्पसंख्याक, बहुजन समाजातील मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो. त्या काढल्या असत्या तर मताधिक्य वाढले असते. मात्र मिळालेल्या यशाने हुरळून जाणार नाही. आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकत्रित लढणार आहोत. जिल्ह्यातील सातही मतदार संघात महायुती विजयी होईल. रत्नागिरी जिल्ह्यात पाचही मतदार संघात महायुतीला फटका बसला आहे. त्याठिकाणी आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याची स्पष्टता खासदार सुनील तटकरे यांनी दिली. 

जिल्ह्यातील रखडलेले महामार्ग, सांबरकुंड, उमटे धरण, आर सी एफ कंपनी प्रकल्पग्रस्त प्रश्न, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय इमारत प्रश्न सोडविण्यासाठी पाहिले प्राधान्य असणार आहे. तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, दळणवळण, मच्छीमार प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

टॅग्स :alibaugअलिबागNCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरे