शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अल्पसंख्याक, बहुजनांच्या मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो: खासदार सुनील तटकरे

By राजेश भोस्तेकर | Updated: June 14, 2024 18:12 IST

तरीही विरोधकांचा झाला भ्रमनिरास

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : रायगड लोकसभा निवडणूक चुरशीची होईल असे वातावरण निर्माण झाले होते. महायुती पक्षात एकोपा राहणार नाही असाही भ्रम निर्माण केला होता. तसेच संविधान बदलाचा प्रचार, अल्पसंख्यांक, बहुजन समाजाची सहानभुती यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाले होते. हे रोखण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो हे मान्य करतो. मात्र एवढे करूनही रायगडात विरोधकांचा भ्रम नीरस होऊन रायगडाच्या जनतेने आमच्या विकास कामावर विश्वास ठेवून लोकसभेत मोठ्या मताधिक्याने विजय देऊन पाठवला असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी मांडले आहे. 

रायगडचे नवनिर्वाचित खासदार यांची निवडून आल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद अलिबाग येथे शुक्रवारी १४ जून रोजी राष्ट्रवादी भवनात सुनील तटकरे यांनी घेतली. यावेळी आपल्या यशाबद्दल आणि लोकसभा मतदार संघातील विकासाबाबत आपले मत व्यक्त केले. आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक, तालुकाध्यक्ष जयंत भगत, हर्षल पाटील पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

विकासाच्या दृष्टीने आम्ही लोकसभा जिंकलो. अल्पसंख्याक, बहुजन समाजातील मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो. त्या काढल्या असत्या तर मताधिक्य वाढले असते. मात्र मिळालेल्या यशाने हुरळून जाणार नाही. आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकत्रित लढणार आहोत. जिल्ह्यातील सातही मतदार संघात महायुती विजयी होईल. रत्नागिरी जिल्ह्यात पाचही मतदार संघात महायुतीला फटका बसला आहे. त्याठिकाणी आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याची स्पष्टता खासदार सुनील तटकरे यांनी दिली. 

जिल्ह्यातील रखडलेले महामार्ग, सांबरकुंड, उमटे धरण, आर सी एफ कंपनी प्रकल्पग्रस्त प्रश्न, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय इमारत प्रश्न सोडविण्यासाठी पाहिले प्राधान्य असणार आहे. तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, दळणवळण, मच्छीमार प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

टॅग्स :alibaugअलिबागNCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरे