शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

पावसाने भातपिकासह आंबाही संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 1:03 AM

५० हजार हेक्टरवरील शेतमालाचे नुकसान झाल्याची भीती : पालवी कोमजल्याने आंबा निर्यातीवर होणार परिणाम

आविष्कार देसाई।अलिबाग : रायगड जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे शेतीच्या नुकसानीचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जुलै-आॅगस्ट आणि आॅक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत पडलेल्या पावसामुळे आतापर्यंत तब्बल सुमारे ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त भातपिकाचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर आंब्याची पालवीही कोमजल्याने तब्बल १५ हजार टन निर्यात होणाऱ्या आंब्यालाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि आंबा बागायतदार असे दोघेही आर्थिक खाईत लोटले जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये धुमाकूळ घातला होता. जिल्ह्यातील ९५ हजार हेक्टरवर भाताचे पीक घेतले गेले आहे. मोठ्या संख्येने शेतकरी भाताचेच पीक घेत असल्याने भातपिकाचे चांगलेच उत्पादन येते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेलेही भात भिजल्यामुले हातातोंडाशी आलेला घासही गेला आहे. पावसाने शेतातील भाताचे पीक आडवे झाल्याने शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.जुलै-आॅगस्ट महिन्यामध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे १७ हजार हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले होते. तसेच आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पडलेल्या परतीच्या पावसामुळे २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा हा ३७ हजार हेक्टरवर पोहोचल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्षात आॅक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीतील परतीच्या पावसामुळे ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाल्याची भीती राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त के ली.अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा बागायतीचेही प्रचंड नुकसान होणार आहे. आंब्याला पालवी फुटतानाच पावसाने तडाखा दिल्याने पालवी कोमजली आहे. आपल्या विभागातून तब्बल १५ हजार टन आंब्याची निर्यात केली जाते. त्यामुळे येथील आंबा बागायतदारांना चांगल्या प्रमाणात परकीय चलन मिळते. मात्र, या वर्षी आंबा उशिरा येणार असल्याने त्याची चव उशिरा चाखायला मिळणार आहे. शिवाय, आंबा निर्यातीवरही विपरित परिणाम होऊन आंबा बागायतदारांसमोर आर्थिक संकट निर्माण होऊ शकते, असेही मोकल यांनी स्पष्ट केले.१७ हजार ५०० हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे झालेपरतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने संबंधित जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हा महसूल प्रशासनाने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्याला सुरुवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार ६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील २० हजार हेक्टरवरील भाताच्या पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यापैकी १७ हजार ५०० हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असल्याचा दावा निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.आंब्यालाही पावसाचा फटका बसणार - शेळकेजुलै-आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीने १७ हजार हेक्टरवरील भाताचे पिकाचे नुकसान झाले होते. त्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांतील परतीच्या पावसामुळे आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रावरील भाताचे पीक वाया गेले आहे. पाऊस ठिकठिकाणी सुरूच असल्याने नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आंब्यालाही पावसाचा फटका बसणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. 

 

टॅग्स :MangoआंबाRaigadरायगडRainपाऊस