शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

जिल्हा परिषदेच्या १८ शाळा बंद, सुधागड तालुक्यातील आणखी पाच शाळा बंद होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 03:59 IST

सुधागडात जिल्हा परिषदेच्या एकूण १५४ शाळा आहेत. त्यापैकी २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत १८ शाळा बंद झाल्या असून २०१९ मध्ये ४ ते ५ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

- विनोद भोईरपाली - सुधागडात जिल्हा परिषदेच्या एकूण १५४ शाळा आहेत. त्यापैकी २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत १८ शाळा बंद झाल्या असून २०१९ मध्ये ४ ते ५ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे परिसरातील पालकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे.बंद पडलेल्या शाळा तोरंकेवाडी, मढाळी, कासारवाडी, कळंबोशी, कळंब धनगरवाडी, खेमवाडी, केवणी धनगरवाडा, बलाप, रासळवाडी, कोंडगाव, गोंडाळे, हरनेरी, विडसई, मुळशी, वेळकरपाडा, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा नेणवली या शाळांचा समावेश आहे. यातील ९ ते १० शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तालुक्यातील खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्याने आपल्या मुलाला, मुलीला दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने पालक खासगी शाळेत पाठवले जात आहेत. त्याचबरोबर शिक्षकांची मुले खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याने खेड्यातील पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तसेच आदिवासीचे स्थलांतर होणे थांबले नाही व खेडोपाड्यातील नागरिकांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे खेड्यातून शहराकडे जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गावातील शाळेत शासनाच्या नियमानुसार पटसंख्या कमी असल्याने या १८ शाळा बंद पडल्या.डोंगराळ भागात असणाऱ्या शाळा बंद झाल्याने परिरिथती चांगली नसल्याने बाहेर जाऊ न शकणाºया मुलांना शिक्षणाविना रहावे लागत आहे. तसेच दूरवरून पायपीटकरून शाळेत येण्यास लहान मुले कंटाळतात.शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या २०असली पाहिजे त्यापेक्षा कमी असल्यास शाळा बंद करा यामुळे पट कमी असलेल्या शाळा बंद झाल्या आहेत.- अनिल कुलकर्णी, गट शिक्षण अधिकारी सुधागड पाली,शाळा बंद झाल्याने तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी ३४ किलोमीटर ये-जा करावी लागत आहे. त्यावर शासनाने नांदगाव पंचक्र ोशीतील बंद झालेल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना केंद्र शाळेत व्यवस्था करावी व येण्या-जाण्यासाठी गाडीभाडे द्यावे.- निखील बेलोसे, पालकजिल्हा परिषदेच्या शाळा बंद झाल्याने मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून तालुक्यातील मुख्य ठिकाण पाली येथे यावे लागले.- नूतन उतेकर, पालकपालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होऊन शाळा ओस पडत आहेत.खेड्यात शिक्षणव्यवस्थेचे तीनतेराशासन शिक्षणावर विविध योजना आखत असले तरी आजवर खेडोपाड्यात शिक्षणव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले दिसत आहे.शिक्षण व्यवस्था राखण्यासाठी मोठ्याप्रमाणात शासन खर्च करत आहे.परंतु खासगीकरणामुळे आदिवासी गोरगरीब पालकांना आपल्या मुलांना शाळा बंद झाल्याने सुविधा नसल्याने नाइलाजाने खासगी शाळेत पाठवावे लागत आहे व तेथील शाळेत भरमसाठ आकारलेली फी भरावी लागत आहे. मग शासन निधी आमच्या काय कामाचा असा प्रश्न पालकांना सतावत आहे.सुशिक्षितांना रोजगार मिळाल्यास व आदिवासींचे स्थलांतर थांबल्यास खेडोपाड्यातील शाळांची पटसंख्या वाढू शकते. त्याचबरोबर वेळापत्रकाशिवाय विद्यार्थ्यांच्या विविध गुणांकडे लक्ष दिल्यास खासगी शाळेमध्ये प्रवेश घेण्याची संख्या कमी होऊ शकते.- निहारिका शिर्के , महिला अध्यक्ष, सुधागड मराठा समाजसर्व शिक्षण अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी शिकावे याकरिता शासनाने अनेक सोयीसुविधा दिल्या असून या सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात जि.प. शाळा अयशस्वी ठरल्याने खासगी शाळेचे फावले आहे. यात बदल घडल्यास जि.प.शाळेचा पट वाढू शकतो.- अमित गायकवाड, तालुकाध्यक्ष,भारिप बहुजन महासंघ सुधागड

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रRaigadरायगड