शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

वांजळे येथील ‘मदगड’ नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:12 PM

श्रीवर्धन तालुक्यातील ऐतिहासिक वनदुर्ग : रहिवाशांकडून दुरवस्था झालेल्या गडाची उपेक्षा थांबवण्याची मागणी

- गणेश प्रभाळ 

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे येथील ऐतिहासिक वनदुर्ग मदगड किल्ल्याची मोठी दुरवस्था झाली असून, हा गड पुरातत्त्व विभागाकडून आजतागायत दुर्लक्षितच राहिला आहे. या गडाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे मोजक्याच येणाऱ्या पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येथील ऐतिहासिक अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर असून या गडाची होणारी उपेक्षा थांबावी, यासाठी या गडाकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

तालुक्यामध्ये वेगवेगळी ठिकाणे आपल्या वेगळेपणासाठी आणि सुंदरतेसाठी लोकप्रिय झाली आहेत, त्यातील एक आहे मदगड हा किल्ला छत्रपतींच्या अमलाखाली असल्याची शक्यता बोलण्यात येते. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर गड सिद्दींच्या ताब्यात गेला; पण मराठ्यांनी जून १७३३ मध्ये मदगड परत स्वराज्यात आणला. बोर्ली वांजळे मार्गावर ५ किमी अंतरावर मदगड आहे. सन १७३५ च्या पत्राप्रमाणे मराठे व सिद्दी यांच्यामधील लढाईच्या प्रसंगात मदगडची संरक्षण व्यवस्था पेशव्यांनी वाढवली होती, आता गडावर घनदाट झाडी झुडपे वाढली आहेत. ही सगळी वनौषधी आहेत. झाडाझुडपांमुळे गडावरील अवशेष दिसून येत नाहीत. पाण्याची टाकी, घरांची जोती व त्यांची चिरे आढळतात. मदगडावरून श्रीवर्धन, दिघी, दिवेआगर, हिम्मतगड हे पाहू शकतो. हा किल्ला १७ व्या शतकात सिद्दीच्या ताब्यात असताना श्रीमंत रमाबाई पेशवे इ. स. १७७२ मध्ये देवदर्शनासाठी आल्या असताना मदगडवरून तोफांची सलामी दिली गेली, तसेच हत्तीवरून नजराणा पाठविला होता, असा संदर्भ आढळतो.

मदगडाच्या पायथ्याशी वांजळे गाव आहे. वांजळे गावापर्यंत पक्का गाडी रस्ता आहे. हा संपूर्ण प्रदेश डोंगरदºयांनी व्याप्त असल्याने चारही बाजूंनी हिरवळ या ठिकाणाच्या सौंदर्यात भर पाडतात. यामुळे प्रवास आनंदमय होतो. गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. जंगली प्राण्यांच्या भीतीमुळे दुर्गमित्रांनी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. गडावरील दाट झाडी व हिंस्र प्राण्याचे भय यामुळे अवशेषांची शोधयात्रा करणे कमालीचे कठीण आहे. मदगडावर फारसे दुर्गमित्र जात नसल्याने गडाविषयी व अवशेषांविषयी अभ्यासनीय माहिती उपलब्ध नाही. गडाबाबतचे ऐतिहासिक मोजकेच संदर्भ व हरवलेले दुर्गावशेष यांचे संकलन करून मदगडाच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्याची गरज असून याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे.मदगडचे शिवकालीन संदर्भ नाहीतच्चौदाव्या शतकातील मदगड हा एकमेव किल्ला श्रीवर्धन तालुक्यात येतो. दिवेआगरहून बोर्लीच्या मागच्या मदगडच्या डोंगरावरून वांजळे मार्गे पायवाटेने म्हसळ्याकडे रस्ता जातो. त्याच्या अलीकडे उजवीकडे फुटणारी पायवाट मदगडाकडे नेते. आता इथे फारसे काही शिल्लक नसले तरी सभोवतालचा मोठा परिसर इथून दिसतो. बोर्लीपंचतनला जाऊन गाडीमार्गाने वांजळे येथून मदगड माथ्यावर तासाभरात पोहोचता येते. मदगडची उंची २९२ मी. आहे. माथ्यावरून दिवेआगरचा समुद्रकिनारा दिसतो. मदगडला मतगड असे संबोधतात. मदगडचे शिवकालीन संदर्भ नाहीत; पण बाणकोटच्या खाडीपासून म्हसळे खाडीपर्यंत पसरलेल्या सागरी किनाºयापर्यंत व त्यालगतच्या प्रांतातील एकमेव गड असल्याने टेहळणीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. 

गड-किल्ल्यांची अवस्था सध्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गड-किल्ले वाचवण्यासाठी विविध संघटनेतर्फे दुर्गसंवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बोर्लीपंचतन येथील आम्ही युवक यामध्ये सहभागी होत गेली सात वर्षे मदगड येथे श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवत आहोत. गडाविषयी व अवशेषांविषयी अभ्यासनीय माहिती उपलब्ध नसल्याने संशोधनाची गरज आहे.- नंदकिशोर भाटकर,दुर्गप्रेमी, बोर्लीपंचतन