शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

टँकरचे पाणी विहिरीत ओतून आदिवासींना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:26 IST

नंदकुमार भावसार यांचे सहकार्य : मोरेवाडी-ताडवाडी ग्रामस्थांसाठी सतत १३ वर्षे उपक्रम

कर्जत : तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ताडवाडी-मोरेवाडी या गावातील आदिवासी लोकांना नंदकुमार भावसार हे फार्महाउसचे मालक गेली १३ वर्षे उन्हाळ्यात पिण्याचे पाणी पुरवीत आहेत. आपल्या फार्महाउससाठी बांधलेली विहीर उन्हाळ्यात तळ गाठते. त्या वेळी टँकरचे पाणी ओतून फार्महाउसबरोबर दोन्ही वाडीतील लोकांना देखील पाणी पुरवित आहेत.

पाथरज ग्रामपंचायत हद्दीत ताडवाडी आणि मोरेवाडी, पाथरज या गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई जाणवते. त्यातील पाथरज गाव हे डोंगरपाडा पाझर तलावाजवळ असल्याने त्यांची नळपाणी योजना तयार झाली आणि पाथराज गावातील महिलांना पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबली आहे. त्यातच काही वर्षांपूर्वी डोंगरपाडा पाझर तलाव फुटल्याने परिसरातील तब्बल २५ गावे-वाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. भीमाशंकर रस्त्यावर असलेल्या जागेत भीमाशंकर हिल्स नावाचे फार्म हाउस उभारणाऱ्या नंदकुमार भावसार यांनी आपल्या स्वत:साठी एक टँकर खरेदी केला. तो टँकर ताडवाडी येथून वंजारवाडी येथे पेज नदीवर जाऊन पाणी आणून विहिरीत ओतून लोकांची पाणी समस्या काही प्रमाणात सोडवायचे. भावसार यांच्या जमिनीत असलेल्या ३५ फूट खोलीच्या विहिरीतील पाणी मार्च महिन्यात तळ गाठते. त्या वेळी ते आपल्या मालकीच्या टँकरमधून दररोज दोन फेºया मारून पाणी आणून विहिरीत ओतण्याचे काम केले जाते. त्याचा परिणाम विहिरीत पिण्याचे पाणी सर्वांना उपलब्ध होते. त्यांचा हा उपक्रम गेली १३ वर्षे सुरू असून सर्व देखरेख पाथरज ग्रामपंचायत तंटामुक्त समितीवर सहा वर्षे अध्यक्ष म्हणून काम करणारे मोहन शिंगटे करत आहेत.

उन्हाळ्यात महसूल विभाग खासगी पाणी साठे हे परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिग्रहण करीत असतात. भावसार यांनी आपल्या फार्म हाउसमध्ये असलेल्या विहिरीतील पाणी घेण्यासाठी ताडवाडी-मोरेवाडीमधील आदिवासी लोकांना येण्यासाठी कुंपण खुले ठेवले आहे. विहिरीजवळ पोहचण्यासाठी लाकडी शिडीदेखील बनविली आहे.त्याचा फायदा ५०० मीटर अंतरावर असलेल्या मोरेवाडी ग्रामस्थांना आणि ७०० मीटर अंतरावर असलेल्या ताडवाडी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विहिरीतून काढण्यासाठी होत असतो.

फार्महाउसमधील विहिरीत उन्हाळ्यात आटणारे पाणी आणि त्या विहिरीत दररोज दोन टँकर पाणी ओतणारे नंदकुमार भावसार यांच्या दातृत्वाबद्दल कौतुक आदिवासी भागात होत आहे. त्यांचा हा उपक्रम गेली १३ वर्षे सुरू असून कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी पाणीटंचाई काळात दररोज दोनपेक्षा अधिक टँकर विहिरीत ओतून आदिवासी लोकांना पाणी पुरवावे, अशी सूचना भावसार यांना लेखी पत्र पाठवून केली आहे.

टॅग्स :Waterपाणी