शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

रायगडमध्ये पाणीटंचाई; नागरिकांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:05 IST

नऊ तालुक्यातील ३० गावे, १३० वाड्यांना झळ

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता वाढल्याने नऊ तालुक्यातील ३० गावे आणि १३० वाड्यांना टंचाईची झळ बसत आहे. तब्बल ३५ हजार ६०३ नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने २० टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामध्ये एका सरकारी आणि १९ खासगी टँकरचा समावेश आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा पेण तालुक्याला बसला आहे. येथील ११ गावे आणि ५३ वाड्यातील २१ हजार ४८० नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.पाणीबाणीची परिस्थिती खऱ्या अर्थाने वाड्या वस्त्यांवर अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. शहरांमध्ये आणि शहरालगत असणाºया गावांना त्याचा विशेष तडाखा बसत नसला तरी वाडी वस्तीवर राहणाºया कुटुंबांची तहान भागवण्यासाठी महिला आणि तरुण मुलींना पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन पायपीट करावी लागत आहे. उन्हाचा प्रचंड तडाखा वाढलेला आहे. अशा कडक उन्हात त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणे हे तेथील सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याचे अधोरेखित करते. वाड्या वस्त्यांवर अद्यापही पाण्याची पाइपलाइन पोचलेली नाही. त्यामुळे डोंगर कपारी असणाºया डोहातील पाणी त्यांना उदरनिर्वाहासाठी भरावे लागत आहे. हे पाणी अशुद्ध असले तरी कोरडे पडलेले घसे ओले करण्यासाठी त्यांना तेथील पाणी पिण्यावाचून पर्याय राहिलेला नसल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडतो, मात्र पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. जिल्ह्यात मोठी धरणे निर्माण करण्यात सरकार आणि प्रशासनाला अपयश आलेले आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या धरणांची योग्य ती डागडुजी करण्यात न आल्यानेही पाण्याची समस्या निर्माण होत आहे. उन्हाचा तडाखाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी जलसाठ्यातील पाणी आटत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्येक गावातील आणि वाड्यातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार आहे.पाणीपुरवठ्याच्या योजना सुरू करूनही शेवटच्या घटकापर्यंत पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वाड्या वस्त्यांवरील महिलांचीही पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. काही भागांमध्ये रात्र-रात्र पाण्यासाठी जागावे लागत आहे, तर काही ठिकाणी नागरिकांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टंचाईच्या आराखड्यावर नजर टाकल्यास शहरी भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे सध्यातरी दिसत नाही.उरण तालुक्यातील दोन वाड्यांवरील ३९७ नागरिकांना पाण्याची समस्या भासत आहे. यासाठी प्रशासनाने एका टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.पनवेल तालुक्यातील दोन वाड्यांवरील एक हजार ४८० लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी एका टँकरची व्यवस्था केली आहे.कर्जत तालुक्यातील तीन गावे आणि १६ वाड्यांतील एक हजार २३५ नागरिकांसाठी तीन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पेण तालुक्यातील ११ गावे आणि ५३ वाड्यांवरील २१ हजार ४८० नागरिकांची पाण्याची पायपीट थांबावी यासाठी सहा टँकरची व्यवस्था केली आहे.महाड तालुक्यातील ७ गावे आणि १७ वाड्यांमधील सहा हजार २१८ लोकसंख्येसाठी दोन टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे.मुरुड तालुक्यातील एका गावातील एक हजार २८१ नागरिकांसाठी एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तळा तालुक्यातील एका वाडीवरील २९८ नागरिकांची तहान भागवण्यासाठी एका टँकरची सुविधा पुरवण्यात आली आहे.रोहे तालुक्यामध्ये एका वाडीवरील ६४ लोकसंख्येसाठी एका टँकरने तहान भागवण्यात येत आहे.पोलादपूर तालुक्यामधील आठ गावे आणि ३४ वाड्यांतील चार हजार १५० नागरिकांसाठी चार टँकरची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई