शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

रायगडमध्ये पाणीटंचाई; नागरिकांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:05 IST

नऊ तालुक्यातील ३० गावे, १३० वाड्यांना झळ

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता वाढल्याने नऊ तालुक्यातील ३० गावे आणि १३० वाड्यांना टंचाईची झळ बसत आहे. तब्बल ३५ हजार ६०३ नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने २० टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामध्ये एका सरकारी आणि १९ खासगी टँकरचा समावेश आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा पेण तालुक्याला बसला आहे. येथील ११ गावे आणि ५३ वाड्यातील २१ हजार ४८० नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.पाणीबाणीची परिस्थिती खऱ्या अर्थाने वाड्या वस्त्यांवर अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. शहरांमध्ये आणि शहरालगत असणाºया गावांना त्याचा विशेष तडाखा बसत नसला तरी वाडी वस्तीवर राहणाºया कुटुंबांची तहान भागवण्यासाठी महिला आणि तरुण मुलींना पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन पायपीट करावी लागत आहे. उन्हाचा प्रचंड तडाखा वाढलेला आहे. अशा कडक उन्हात त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणे हे तेथील सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याचे अधोरेखित करते. वाड्या वस्त्यांवर अद्यापही पाण्याची पाइपलाइन पोचलेली नाही. त्यामुळे डोंगर कपारी असणाºया डोहातील पाणी त्यांना उदरनिर्वाहासाठी भरावे लागत आहे. हे पाणी अशुद्ध असले तरी कोरडे पडलेले घसे ओले करण्यासाठी त्यांना तेथील पाणी पिण्यावाचून पर्याय राहिलेला नसल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडतो, मात्र पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. जिल्ह्यात मोठी धरणे निर्माण करण्यात सरकार आणि प्रशासनाला अपयश आलेले आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या धरणांची योग्य ती डागडुजी करण्यात न आल्यानेही पाण्याची समस्या निर्माण होत आहे. उन्हाचा तडाखाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी जलसाठ्यातील पाणी आटत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्येक गावातील आणि वाड्यातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार आहे.पाणीपुरवठ्याच्या योजना सुरू करूनही शेवटच्या घटकापर्यंत पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वाड्या वस्त्यांवरील महिलांचीही पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. काही भागांमध्ये रात्र-रात्र पाण्यासाठी जागावे लागत आहे, तर काही ठिकाणी नागरिकांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टंचाईच्या आराखड्यावर नजर टाकल्यास शहरी भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे सध्यातरी दिसत नाही.उरण तालुक्यातील दोन वाड्यांवरील ३९७ नागरिकांना पाण्याची समस्या भासत आहे. यासाठी प्रशासनाने एका टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.पनवेल तालुक्यातील दोन वाड्यांवरील एक हजार ४८० लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी एका टँकरची व्यवस्था केली आहे.कर्जत तालुक्यातील तीन गावे आणि १६ वाड्यांतील एक हजार २३५ नागरिकांसाठी तीन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पेण तालुक्यातील ११ गावे आणि ५३ वाड्यांवरील २१ हजार ४८० नागरिकांची पाण्याची पायपीट थांबावी यासाठी सहा टँकरची व्यवस्था केली आहे.महाड तालुक्यातील ७ गावे आणि १७ वाड्यांमधील सहा हजार २१८ लोकसंख्येसाठी दोन टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे.मुरुड तालुक्यातील एका गावातील एक हजार २८१ नागरिकांसाठी एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तळा तालुक्यातील एका वाडीवरील २९८ नागरिकांची तहान भागवण्यासाठी एका टँकरची सुविधा पुरवण्यात आली आहे.रोहे तालुक्यामध्ये एका वाडीवरील ६४ लोकसंख्येसाठी एका टँकरने तहान भागवण्यात येत आहे.पोलादपूर तालुक्यामधील आठ गावे आणि ३४ वाड्यांतील चार हजार १५० नागरिकांसाठी चार टँकरची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई