शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रायगडमध्ये पाणीटंचाई; नागरिकांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:05 IST

नऊ तालुक्यातील ३० गावे, १३० वाड्यांना झळ

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषणता वाढल्याने नऊ तालुक्यातील ३० गावे आणि १३० वाड्यांना टंचाईची झळ बसत आहे. तब्बल ३५ हजार ६०३ नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाने २० टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामध्ये एका सरकारी आणि १९ खासगी टँकरचा समावेश आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा पेण तालुक्याला बसला आहे. येथील ११ गावे आणि ५३ वाड्यातील २१ हजार ४८० नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.पाणीबाणीची परिस्थिती खऱ्या अर्थाने वाड्या वस्त्यांवर अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. शहरांमध्ये आणि शहरालगत असणाºया गावांना त्याचा विशेष तडाखा बसत नसला तरी वाडी वस्तीवर राहणाºया कुटुंबांची तहान भागवण्यासाठी महिला आणि तरुण मुलींना पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन पायपीट करावी लागत आहे. उन्हाचा प्रचंड तडाखा वाढलेला आहे. अशा कडक उन्हात त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणे हे तेथील सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याचे अधोरेखित करते. वाड्या वस्त्यांवर अद्यापही पाण्याची पाइपलाइन पोचलेली नाही. त्यामुळे डोंगर कपारी असणाºया डोहातील पाणी त्यांना उदरनिर्वाहासाठी भरावे लागत आहे. हे पाणी अशुद्ध असले तरी कोरडे पडलेले घसे ओले करण्यासाठी त्यांना तेथील पाणी पिण्यावाचून पर्याय राहिलेला नसल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पाऊस पडतो, मात्र पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. जिल्ह्यात मोठी धरणे निर्माण करण्यात सरकार आणि प्रशासनाला अपयश आलेले आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असलेल्या धरणांची योग्य ती डागडुजी करण्यात न आल्यानेही पाण्याची समस्या निर्माण होत आहे. उन्हाचा तडाखाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी जलसाठ्यातील पाणी आटत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्येक गावातील आणि वाड्यातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार आहे.पाणीपुरवठ्याच्या योजना सुरू करूनही शेवटच्या घटकापर्यंत पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वाड्या वस्त्यांवरील महिलांचीही पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. काही भागांमध्ये रात्र-रात्र पाण्यासाठी जागावे लागत आहे, तर काही ठिकाणी नागरिकांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टंचाईच्या आराखड्यावर नजर टाकल्यास शहरी भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे सध्यातरी दिसत नाही.उरण तालुक्यातील दोन वाड्यांवरील ३९७ नागरिकांना पाण्याची समस्या भासत आहे. यासाठी प्रशासनाने एका टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.पनवेल तालुक्यातील दोन वाड्यांवरील एक हजार ४८० लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी एका टँकरची व्यवस्था केली आहे.कर्जत तालुक्यातील तीन गावे आणि १६ वाड्यांतील एक हजार २३५ नागरिकांसाठी तीन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पेण तालुक्यातील ११ गावे आणि ५३ वाड्यांवरील २१ हजार ४८० नागरिकांची पाण्याची पायपीट थांबावी यासाठी सहा टँकरची व्यवस्था केली आहे.महाड तालुक्यातील ७ गावे आणि १७ वाड्यांमधील सहा हजार २१८ लोकसंख्येसाठी दोन टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे.मुरुड तालुक्यातील एका गावातील एक हजार २८१ नागरिकांसाठी एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तळा तालुक्यातील एका वाडीवरील २९८ नागरिकांची तहान भागवण्यासाठी एका टँकरची सुविधा पुरवण्यात आली आहे.रोहे तालुक्यामध्ये एका वाडीवरील ६४ लोकसंख्येसाठी एका टँकरने तहान भागवण्यात येत आहे.पोलादपूर तालुक्यामधील आठ गावे आणि ३४ वाड्यांतील चार हजार १५० नागरिकांसाठी चार टँकरची व्यवस्था केली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई