शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावांतील प्रचाराला ‘पाणीटंचाई’च्या झळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 02:11 IST

उमेदवार हैराण : आचारसंहितेचे कारण देऊन वेळ निभावून देण्याचा प्रयत्न

जयंत धुळप 

अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय तापमान वाढले आहे. उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते उष्म्याबरोबरच पाणीटंचाईमुळे प्रचाराला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळेही हैराण आहेत. उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचारासाठी ज्या वेळी गावांमध्ये पोहोचतात, तेव्हा ग्रामस्थ विशेषत: महिलावर्ग, आधी पिण्याचे पाणी द्या, मग मते मागा असे सुनावत आहेत, अशा वेळी आचारसंहिता असल्याने काही करता येत नसल्याचे उत्तर देऊन वेळ मारून नेण्यात येत असल्याचे अनुभवास आले आहे.

रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, जिल्ह्यातील १९ गावे आणि ९१ वाड्यांवरील जलदुर्भिक्ष दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. कृती आराखड्याप्रमाणे हे पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. जनसामान्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या येऊ नये, यासाठी गावांची पाहणी करून टँकर्स किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याबाबत समितीची पुनर्रचना करण्याचे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ठरले होते. त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांची एक समिती जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी नियुक्त केली आहे.पेण तालुक्यात सर्वाधिक टंचार्ईग्रस्तच्टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या १९ गावे आणि ९१ वाड्यांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाईग्रस्त ११ गावे आणि ६२ वाड्या पेण तालुक्यात आहेत. या ११ गावांमध्ये वढाव, लाखोले, कान्होबा, मोठेभाल, विठ्ठलवाडी, शिक्र ी, ओढांगी, मसद बुद्रुक, मसदखुर्द, बोर्वे, बोर्झे यांचा समावेश असून पेण तालुक्यातील ६२ वाड्यांना टँकर्स अधिग्रहित करून पाणी देण्यात येत आहे.पोलादपूर तालुक्यात टंचार्ईग्रस्त गावे/वाड्याच्पोलादपूर तालुक्यात सात गावे आणि ११ वाड्या तीव्र पाणीटंचाईग्रस्त आहेत. पोलादपूरमधील सात गावांमध्ये चांभरगणी बुद्रुक, कालवली मोहल्ला, तुटवली, निवे, चांभरगणी खुर्द, कुडपण खुर्द, ताम्हाणे यांचा समावेश आहे, तर ११ टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये कालवली बौद्धवाडी, कालवली पवारवाडी, कालवली विठ्ठलवाडी, कालवली भोसलेवाडी, कालवली पाटीलवाडी, तुटवली धनगरवाडी, क्षेत्रपालळ धनगरवाडी, धनगरवाडी, क्षेत्रपालळ आमलेवाडी, किनेश्वरवाडी, ओबळी धनगरवाडी यांचा समावेश आहे.कर्जतमध्ये १७ वाड्या,तळा तालुक्यात १ वाडी तर मुरुडमध्ये १ गाव टंचाईग्रस्तच्कर्जत तालुक्यातील जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटारवाडी, चाफेवाडी, पादिरवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, धाबेवाडी आदी १७ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. तळा तालुक्यातील कुंभळेकोंड वाडी आणि मुरु ड तालुक्यातील एका गावाला टँकर्सद्वारे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडWaterपाणीElectionनिवडणूक