शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

देहरंग धरण आटले : पनवेलकरांच्या घशाला पडली कोरड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 1:33 AM

पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. देहरंग धरण आटले असून, पाण्यासाठी एमजेपीसह इतर आस्थापनांवर अवलंबून राहावे लागत आहे.

- वैभव गायकरपनवेल - पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. देहरंग धरण आटले असून, पाण्यासाठी एमजेपीसह इतर आस्थापनांवर अवलंबून राहावे लागत आहे. शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी रोज २१० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे; पण प्रत्यक्षात ५२ एमएलडी पाणीच उपलब्ध होत असून, टँकरसह बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.पनवेल शहरात दिवसेंदिवस पाण्याची समस्या आणखीन बिकट होत चालली आहे. शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करूनही पालिकेच्या माध्यमातून मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने शहरात पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू आहेत. ग्रामीण भागात परिस्थिती आणखीनच बिकट आहे. खारघर, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल आदी ठिकाणी सिडको मार्फत पाणीपुरवठा केला जातो, तर तळोजा एमआयडीसीमध्ये एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहरात पालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून, एमजेपी, एमआयडीसी आदी ठिकाणांहून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी एमआयडीसी पाच व एमजेपी ११ एमएलडी अशा स्वरूपात पाणीपुरवठा करते, तर देहरंग धरणाने तळ गाठल्याने आठवड्यातून केवळ एकदाच महानगर पालिका घेते, अशी माहिती पाणीपुरवठा अधिकारी रामदास तायडे यांनी दिली. देहरंग धरणातील पाणीसाठा कोणत्याही क्षणी संपुष्टात येऊ शकतो. पाणीपुरवठा अतिशय कमी प्रमाणात होत असल्याने शहरातील नागरिकांना पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. शहरात २९ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. देहरंग धरणाने तळ गाठल्याने पालिकेला इतर प्राधिकरणांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. पालिकेचे मुख्यालय असलेल्या पनवेल शहराला सर्वात मोठा अपुऱ्या पाण्याचा फटका बसला आहे. शहरातील पाणीसमस्येमुळे नागरिकांचा उद्रेक होत आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने महानगरपालिकेच्या महासभेचे आयोजनही करता येत नाही.खारघर, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदेश्वर, तळोजा एमआयडीसी शहरातील ग्रामीण भागातही हीच अवस्था असल्याने नजीकच्या काही दिवसांत ही समस्या आणखी बिकट होणार आहे. पनवेल शहरालगत असलेल्या सिडकोच्या कारंजाडे नोडमधील रहिवाशांचीही हीच बोंब आहे. पनवेल पालिकेने ठरविलेल्या टँकर धोरणानुसार पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाºया टँकरवर पनवेल महानगरपालिकेचे नाव ठळकपणे लिहिलेले असावे. मात्र, याबाबत पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. धोरणानुसार ठरवलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम टँकरमाफिया आकारत आहेत.बुस्टरपंपद्वारे पाणीचोरीखारघर शहरातही सध्याच्या घडीला अपुºया पाणीपुरवठ्याची समस्या वाढत चालली आहे. शहरात पाण्याची परिस्थिती बिकट असताना बुस्टरपंपद्वारे पाणीचोरी केली जात असल्याचा आरोप नगरसेविका नेत्रा पाटील यांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. अशाप्रकारे बुस्टरपंपद्वारे पाणीचोरी केली जात असल्याने अनेक सोसायटीमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे.बोअरवेलकडे नागरिकांचा कलशहरातील पाणीटंचाई पाहता अनेक रहिवाशांनी सोसायटीमध्ये नव्याने बोअरवेल सुरू केल्या आहेत. पालिकेवर अवलंबून न राहता पाणीटंचाई लक्षात घेता स्वत: पाणी स्रोतांची उपलब्धता करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईpanvelपनवेल