शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
4
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
5
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
6
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
7
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
8
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
9
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
10
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
11
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
12
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
13
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
14
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
15
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
16
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
17
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
18
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
19
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
20
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'

रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 06:11 IST

सध्या राज्यात पाण्याचा दुष्काळ सर्वत्र जाणवत असून, हजारो गावांना टँकरमार्फत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. कोकण परिसरातसुद्धा पाण्यासाठी वणवण करणारी गावे अद्याप ऐन उन्हाळ्यात दुष्काळग्रस्त जीवन जगत आहेत.

अरुण जंगम/कांता हाबळे  म्हसळा : सध्या राज्यात पाण्याचा दुष्काळ सर्वत्र जाणवत असून, हजारो गावांना टँकरमार्फत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. कोकण परिसरातसुद्धा पाण्यासाठी वणवण करणारी गावे अद्याप ऐन उन्हाळ्यात दुष्काळग्रस्त जीवन जगत आहेत. रायगड जिल्ह्यातील नांदवी परिसरातील मढेगाव हे गाव अपवाद म्हणावे लागेल. म्हसळा-गोरेगाव रस्त्यावर असलेले हे आदर्श तंटामुक्त गावातील गावकरी आज पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहे. गावाला उपलब्ध झालेली ६० लाख रुपयांची नळपाणी योजना काही कारणास्तव गेल्या तीन वर्षांपासून बंद झाल्याने या गावावर दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. गावातील नागरिक गावाच्या आजूबाजूला खड्डे खोदून पाण्याच्या अपेक्षेत आहेत; परंतु पाण्याचा थेंबही अद्याप या खोदकाम केलेल्या खड्ड्यात लागलेला नसून गावकरी या दुष्काळामुळे हैराण झाले आहेत. 

गावाजवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाºया विहिरीसुद्धा आटल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मढेगाव गावाला पाण्याची टंचाई जाणवत असून महिलांना दोन ते अडीच किमी अंतरावरून पाण्यासाठी पायी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे अतिशय भीषण टंचाईग्रस्त अवस्था झालेल्या या गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी जोर धरू लागली आहे.

गावात ६० लाख रुपयांच्या पाण्याची योजना गेले तीन वर्षे झाली; परंतु ही योजना लोकांपर्यंत फक्त आशेचे किरण बनून राहिली आहे. गावातीलच भ्रष्ट लोकांमुळे या योजनेचे १२ वाजले. पाणी कमिटीचे अध्यक्ष मात्र मजेत आहेत आणि गावातील लोक जवळच असलेल्या पावसाळी वाहणाऱ्या नदीकिनारी खड्डे खोदून पाणी शोधत आहेत; पण पाणी काही सापडेना. तरी या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे व वेळेत या गावासाठी ठोस उपाययोजना राबवावी. - साजन पवार, स्थानिक नागरिक

बोंंडेशेत भागात बोअरवेल, विहिरी कोरड्या महिलांना चढाव चढून आणावे लागते पाणीकर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील बोंंडेशेत व परिसरातील आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. विहिरी कोरड्या पडल्या असून बोअरवेलला देखील पाणी कमी येत असल्याने तासन्तास पाण्यासाठी ताटकळत बसावे लागत आहेत. तसेच ७०० मीटर चढाव चढून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत असल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कर्जत तालुक्यासह अनेक भागांत पाणीटंचाईचा सामना महिलांना करावा लागत आहे. तालुक्यातील बोंंडेशेत वाडीमध्ये विहिरी कोरड्या पडल्या असून बोअरवेलला देखील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे महिलांना रात्री उशिरापर्यंत लाइनमध्ये राहून बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. तसेच ते पाणी देखील ५०० ते ७०० मीटरचा चढाव चढून आणावे लागत आहे. याचा महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र लोकप्रतिनिधींनी आणि शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

दोन वर्षांपूर्वी येथील आदिवासी बांधवांनी लोकवर्गणी काढून नदीपर्यंत पाइपलाइन टाकली आहे. टाकी देखील बांधण्यात आली आहे; परंतु पैसे कमी पडल्याने हे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे वाडीपर्र्यंत पाणी येऊ शकले नाही. तरी शासनाने आमच्या कडे लक्ष देऊन पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आदिवासी बांधव करत आहेत.

बोंंडेशेत वाडीत विहीर आटली असून बोअरवेलला देखील कमी पाणी येत असल्याने महिलांना तासन्तास उभे राहून७०० मीटरचा चढाव चढून पाणी आणावे लागत आहे. तरी शासनाने आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी अशी आमची मागणी आहे. - कमळू थोराड, ग्रामस्थ, बोंंडेशेत

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRaigadरायगड