शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 06:11 IST

सध्या राज्यात पाण्याचा दुष्काळ सर्वत्र जाणवत असून, हजारो गावांना टँकरमार्फत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. कोकण परिसरातसुद्धा पाण्यासाठी वणवण करणारी गावे अद्याप ऐन उन्हाळ्यात दुष्काळग्रस्त जीवन जगत आहेत.

अरुण जंगम/कांता हाबळे  म्हसळा : सध्या राज्यात पाण्याचा दुष्काळ सर्वत्र जाणवत असून, हजारो गावांना टँकरमार्फत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. कोकण परिसरातसुद्धा पाण्यासाठी वणवण करणारी गावे अद्याप ऐन उन्हाळ्यात दुष्काळग्रस्त जीवन जगत आहेत. रायगड जिल्ह्यातील नांदवी परिसरातील मढेगाव हे गाव अपवाद म्हणावे लागेल. म्हसळा-गोरेगाव रस्त्यावर असलेले हे आदर्श तंटामुक्त गावातील गावकरी आज पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहे. गावाला उपलब्ध झालेली ६० लाख रुपयांची नळपाणी योजना काही कारणास्तव गेल्या तीन वर्षांपासून बंद झाल्याने या गावावर दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. गावातील नागरिक गावाच्या आजूबाजूला खड्डे खोदून पाण्याच्या अपेक्षेत आहेत; परंतु पाण्याचा थेंबही अद्याप या खोदकाम केलेल्या खड्ड्यात लागलेला नसून गावकरी या दुष्काळामुळे हैराण झाले आहेत. 

गावाजवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाºया विहिरीसुद्धा आटल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मढेगाव गावाला पाण्याची टंचाई जाणवत असून महिलांना दोन ते अडीच किमी अंतरावरून पाण्यासाठी पायी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे अतिशय भीषण टंचाईग्रस्त अवस्था झालेल्या या गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी जोर धरू लागली आहे.

गावात ६० लाख रुपयांच्या पाण्याची योजना गेले तीन वर्षे झाली; परंतु ही योजना लोकांपर्यंत फक्त आशेचे किरण बनून राहिली आहे. गावातीलच भ्रष्ट लोकांमुळे या योजनेचे १२ वाजले. पाणी कमिटीचे अध्यक्ष मात्र मजेत आहेत आणि गावातील लोक जवळच असलेल्या पावसाळी वाहणाऱ्या नदीकिनारी खड्डे खोदून पाणी शोधत आहेत; पण पाणी काही सापडेना. तरी या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे व वेळेत या गावासाठी ठोस उपाययोजना राबवावी. - साजन पवार, स्थानिक नागरिक

बोंंडेशेत भागात बोअरवेल, विहिरी कोरड्या महिलांना चढाव चढून आणावे लागते पाणीकर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील बोंंडेशेत व परिसरातील आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. विहिरी कोरड्या पडल्या असून बोअरवेलला देखील पाणी कमी येत असल्याने तासन्तास पाण्यासाठी ताटकळत बसावे लागत आहेत. तसेच ७०० मीटर चढाव चढून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत असल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कर्जत तालुक्यासह अनेक भागांत पाणीटंचाईचा सामना महिलांना करावा लागत आहे. तालुक्यातील बोंंडेशेत वाडीमध्ये विहिरी कोरड्या पडल्या असून बोअरवेलला देखील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे महिलांना रात्री उशिरापर्यंत लाइनमध्ये राहून बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. तसेच ते पाणी देखील ५०० ते ७०० मीटरचा चढाव चढून आणावे लागत आहे. याचा महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र लोकप्रतिनिधींनी आणि शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

दोन वर्षांपूर्वी येथील आदिवासी बांधवांनी लोकवर्गणी काढून नदीपर्यंत पाइपलाइन टाकली आहे. टाकी देखील बांधण्यात आली आहे; परंतु पैसे कमी पडल्याने हे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे वाडीपर्र्यंत पाणी येऊ शकले नाही. तरी शासनाने आमच्या कडे लक्ष देऊन पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आदिवासी बांधव करत आहेत.

बोंंडेशेत वाडीत विहीर आटली असून बोअरवेलला देखील कमी पाणी येत असल्याने महिलांना तासन्तास उभे राहून७०० मीटरचा चढाव चढून पाणी आणावे लागत आहे. तरी शासनाने आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी अशी आमची मागणी आहे. - कमळू थोराड, ग्रामस्थ, बोंंडेशेत

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRaigadरायगड