शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मिठागर येथे पाणीप्रश्न बिकट; सरपंचाचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:55 IST

आगरदांडा : गेली १० वर्षे मिठागर, खामदे गावाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अनेक वेळा तक्रार करूनही याकडे कोणीही ...

आगरदांडा : गेली १० वर्षे मिठागर, खामदे गावाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अनेक वेळा तक्रार करूनही याकडे कोणीही लक्ष देत नाही, यामुळे मुरुड तहसीलदार कार्यालयात येत्या २७ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सावली ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच मंदा ठाकूर पाणीप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी चौथ्यांदा आमरण उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे रीतसर निवेदन मुरुड तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.

२००९-२०१० साली ग्रुप ग्रामपंचायत सावलीमध्ये भारत निर्माण अंतर्गत मिठागर, सावली व खामदे येथे नळ पाणीपुरवठा योजना व २०११-२०१२ मध्ये मिठागर येथे आणखी राष्ट्रीय पेय जल योजना राबविण्यात आली. पहिल्या योजनेसाठी ७५ लाख व दुसऱ्या योजनेसाठी ५० लाख निधी मंजूर करून एकूण १ कोटी २५ लाख या योजनांवर खर्च झालेले आहेत,परंतु या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाइप वापरण्यात आले. त्यामुळे अद्यापपर्यंत नऊ वर्षे पूर्ण होऊन सुद्धा गावामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा ग्रामस्थांना पिण्याकरिता मिळालेला नाही. तथापि या प्रकरणांत भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत मुरुड तहसीलदार कार्यालयाजवळ १८ एप्रिल२०१७, ५ एप्रिल २०१८, १ मे २०१९ असे तीन वेळा उपोषण केले होते. यावेळी शासनमार्फत तीन लेखी आश्वासने दिली होती. त्याची जवळजवळ चार वर्षे होऊन सुद्धा शासन दरबारी अद्यापपर्यंत कोणतीही पूर्तता अथवा त्याबाबत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही.

याबाबत शासनाला स्मरणपत्र देखील दिले होते, परंतु शासनाकडून मिठागर, खामदे, सावली नळ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात कोणतीही दखल घेतलेली नाही. तसेच पाणीपुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीबाबत शासनाचे उदासीन धोरण असल्याचे प्रभारी सरपंच मंदा ठाकूर यांनी ग्रामस्थ महिलांच्या वेळोवेळी निदर्शनास आणले आहे. शासनाने आमच्या उपोषणाची व सत्याग्रहाच्या मार्गाची चेष्टा मांडली आहे. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाहीतर येत्या २७ मे २०१९ रोजी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरूकरणार हे उपोषण शेवटचे असणार असा इशारा प्रभारी सरपंच मंदा ठाकूर यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.

ज्या वेळी मंदा ठाकूर उपोषणास बसल्या होत्या त्यावेळी कार्यरत असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी २८ डिसेंबर २०१८ रोजीच्या पत्रान्वये महाड येथील उपअभियंता जे.एन.पाटील,यांना येथे झालेल्या कामात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.परंतु या प्रकरणाची चौकशीच झाली नाही.त्यामुळे भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्याने मंदा ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता प्रशांत म्हात्रे यांनी पत्र देऊन १५ दिवसात मिठागर गावाला पाण्याचे आश्वासन दिले होते,परंतु पूर्तता न झाल्याने पुन्हा ठाकूर यांना उपोषणास बसावे लागत असल्याचे निवेदनात नमूद के ले आहे.किंजळोली बुद्रुक बौद्धवाडी पाण्यापासून वंचितमहाड : खासगी मालकीच्या जागेत असलेली सार्वजनिक बोअरवेल जागा मालकाने बंद केल्याने किंजळोली बुद्रुक बौद्धवाडीला पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. ही बोअरवेल त्वरित खुली करावी, अन्यथा २३ मेपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा या बौद्धवाडीतील रहिवाशांनी दिला आहे.च्किंजळोली बुद्रुक बौद्धवाडीत गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. या वाडीमध्ये एक सार्वजनिक बोअरवेल आहे. या बोअरवेलमध्ये पाण्याची उपलब्धता देखील आहे. मात्र ही बोअरवेल खासगी जागेत असल्याने जागा मालकाने या बोअरवेलमधून पाणी घेण्यास हरकत घेत, ही बोअरवेल बंद केली आहे. त्यामुळे या वाडीतील पंधरा कुटुंबांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

च्पाण्यावाचून या वाडीतील रहिवाशांचे आणि आबालवृद्धांचे अतोनात हाल होत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही, ग्रामपंचायतीने त्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. ही बोअरवेल त्वरित खुली करून देण्यात यावी, या जागा मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, २३ मेपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.