शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

पाणीटंचाईग्रस्त झुगरेवाडीला बोअरवेलचे पाणी; पाणीप्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थ समाधानी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 11:52 PM

कर्जत तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून तालुक्यातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून तालुक्यातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले आहेत. तरी देखील शासनाचे पाण्याचे टँकर बहुसंख्य गावात पोहचत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक संस्था पुढे येत आहेत,त्यातून राजकारणविरहित सामाजिक काम करणाऱ्या सोशल मीडियावरील ग्रुपने पुढाकार घेऊन पाणीटंचाईग्रस्त झुगरेवाडीला बोअरवेल खोदून आणि वीज पंप टाकून पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करून दिली. दरम्यान, झुगरेवाडी ग्रामस्थ हे त्या बोअरवेलसाठी लावलेल्या वीज मीटरचे बिल वर्गणी काढून भरणार आहेत.झुगरेवाडी या ३०० हून अधिक घरे असलेल्या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. तेथील ग्रामस्थ हे गेली काही महिने पाणी विकत घेत असून रायगड जिल्हा हद्दीजवळ असल्याने रायगड जिल्ह्याचे प्रशासन त्या ठिकाणी पोहचत देखील नाही. परिणामी विहिरी आटलेल्या झुगरेवाडीमध्ये पिण्याचे पाणी द्या अशी मागणी नाथा झुगरे या ग्रामस्थाने सामाजिक कार्यकर्ते भरत भगत यांना सांगितली. यावर सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणाºया ग्रुपचे सदस्य भरत भगत यांनी ही बाब ग्रुपवर चर्चेस आणली. यावेळी सोशल मीडियावरील या गु्रपने देखील आदिवासी भागाला पाणी देण्यासाठी तत्काळ पुढाकार घेऊन जमिनीमध्ये पाणी कुठे आहे याचा शोध घेतला. भगत हे स्वत: पाणी शोधणाºया टीमबरोबर झुगरेवाडी गावाच्या आजूबाजूला फिरत होते. पाणी असलेल्या जमिनीचा शोध लागल्यानंतर ग्रुप अ‍ॅडमिन यांनी जागा मालक गणपत झुगरे यांना बोअरवेल खोदण्यासाठी आपली काही जमीन देण्याची विनंती केली.झुगरेवाडी ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे त्या ओलमण ग्रामपंचायतीमधील तेलंगवाडीतील घराचे छप्पर हे गतवर्षी उडून गेले होते आणि ते छप्पर उभारून देण्याचे काम कर्जतच्या सोशल मीडियावरील गु्रपने केले होते. ही माहिती गणपत झुगरे यांना त्यांचे जावई बाळकृष्ण पादिर यांनी दिल्यानंतर ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीची ओळख झाल्याने गणपत झुगरे यांनी बोअरवेलसाठी जागा देण्याची तयारी दर्शविली.त्यामुळे जागा प्रश्न निकाली निघाल्यानंतर १३ मे रोजी ग्रुपचे पथक झुगरेवाडी गावात पोहचले. तेथे ११० फुटावर बोअरवेलला पाणी लागले, परंतु परिसरात कितीही पाणीटंचाई आली तरी त्या बोअरवेलचे पाणी आटू नये यासाठी भरत भगत यांनी ती बोअर तब्बल ३११ फूट खाली नेली. भरपूर पाणी लागलेल्या बोअरवेलसाठी वीज मीटर घेऊन आणि वीज पंप लावून पाणीपुरवठा सुरू करण्यातआला.यावेळी भरत भगत यांच्यासह किशोर शितोळे, मिलिंद विरले, संदीप म्हसकर, किशोर गायकवाड, किसन शिंदे, दादा पादिर, दिनेश कालेकर, परेश भगत आणि विलास शेळके तसेच गणेश पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. भरत भगत यांनी बोअरवेलची पूजाअर्चा केली तर किशोर शितोळे यांनी श्रीफळ वाढविल्यानंतर बोअरवेलचे पाणी सुरू करण्यातआले.दररोज पाणी विकत घेणाºया ग्रामस्थांच्या चेहेºयावर आनंद होता, तर १५ मे रोजी आपल्यासाठी खास खोदलेली बोअरवेल आणि त्यांचे पाणी भरताना अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आले.आमच्या गावातील महिला या चई येथे ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीवर जाऊन पाणी भरायच्या.आता त्यांचे कष्ट वाचणार आहेत.- पालीबाई झुगरे, ग्रामस्थ महिलाआम्हाला मदत करणाºया या ग्रुपबरोबर आमचे रक्ताचे नाते नाही की ते आमच्या जातीचे नाहीत, तरी देखील किमान ९० हजार रुपये एवढा मोठा खर्च वर्गणी काढून केला त्या लोकांचे विचार फार मोठे असले पाहिजेत.आता आम्हाला पाणी विकत घ्यावे लागणार नाही आणि दररोज घराजवळ पाणी मिळेल. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत.- नाथा झुगरे, ग्रामस्थ

टॅग्स :Waterपाणी