शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

श्रीगाव धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:53 PM

पाटबंधारे विभागाची निष्क्रियता : २६ वर्षे शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित

- जयंत धुळप

अलिबाग : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी श्रीगाव येथे १९८५ साली धरण बांधण्यात आले. परिसरातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन या वेळी करण्यात आले होते. शेतीला पाणी देण्यासाठी कालवे आणि पाइपलाइनही टाकण्यात आली; परंतु पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक चुकीमुळे पाइपलाइनमध्ये पाणी सोडताच ती फुटली आणि प्रत्यक्षात शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्या पाइपलाइन दुरुस्तीचा प्रस्तावच आजतागायत झाला नाही. त्यामुळे श्रीगाव धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे समोर आल्यावर आता रायगड पाटबंधारे विभागाला खडबडून जाग आली आहे.

गेल्या २६ वर्षांत पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळे पाइपलाइनच्या दुरुस्तीचा विचारच झाला नाही आणि श्रीगाव धरणाच्या लाभक्षेत्रातील श्रीगाव आणि मेढेखार या गावांतील २५० हून अधिक शेतकरी तब्बल २६ वर्षे हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले. त्यांच्या शेतजमिनी नापीक राहिल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत, श्रीगावचे शेतकरी मनोज पाटील, मेढेखारचे शेतकरी कमलाकर पाटील आदीनी रायगड पाटबंधारे विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याअंती उघडकीस आले आहे.

श्रीगाव धरणातील पाणी शेतकºयांना मिळाल्यास श्रीगाव, मेढेखार आणि कातळपाडा या गावांतील १०० एकरांपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येऊ शकेल. या शेतीत दुबार पीक घेता येणार असून, भाताबरोबरच भाजीपाला व मत्स्यशेती होऊन शेतकºयांना आर्थिक लाभ होईल. तरी १९९२ मध्ये शेतीच्या पाण्यासाठी टाकलेली; परंतु आजतागायत बंदावस्थेत असलेली पाइपलाइन दुरुस्त करून पाणी देण्याची व्यवस्था करावी, असे लेखी पत्र श्रमिक मुक्ती दलाने ३ सप्टेंबर २०१८ रोजी रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंताधनंजय गोडसे यांना दिले आहे. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असेही या वेळी नमूद करण्यात आले आहे.

तब्बल २६ वर्षांनंतर पाटबंधारे विभागास जाग आली. श्रीगाव धरणाच्या पाण्याचा लाभ घेऊ शकणाºया शेतकºयांनी आपणाकडे पाण्याची मागणी अगोदरच नोंदविली आहे. त्या वेळी झालेल्या चर्चेनुसार अभियंता एस. एस. पाटील हे धरण परिसरात पाहणीसाठी येणार होते. मात्र, ते आले नाहीत वा या बाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.भातशेती नापीक करण्याचा प्रयत्नखारलँड विभागाने गेल्या ३० वर्षांत समुद्र सरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केलेली नाही. अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शेकडो एकर भातशेतीत समुद्राचे खारेपाणी घुसून ती पूर्णपणे नापीक झाली. ही भातशेती नष्ट करून शेतजमीन ओसाड ठरवण्यासाठीचा पहिला प्रयत्न होता.तर तालुक्यातील शेतकºयांना जे श्रीगाव धरणाचे पाणी शेतीकरिता द्यायचे ते न देता, शेतकºयांच्या जमिनी ओसाड करायच्या हा दुसरा प्रयत्न आहे. शेतजमिनी नापीक झाल्यावर त्यांना ओसाड घोषित करून त्या बड्या भांडवलदार व उद्योगांना कवडीमोल किमतीने शेतकºयांना विकायला लावण्यास भाग पाडणे.हे गेल्या अनेक वर्षांचे कटकारस्थान आहे. जिल्ह्यातील किती धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांना त्यांच्या हक्काचे शेतीकरिता पाणी मिळाले आहे, याची माहिती जिल्हाधिकाºयांकडे मागणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी