शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगाव धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:53 IST

पाटबंधारे विभागाची निष्क्रियता : २६ वर्षे शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित

- जयंत धुळप

अलिबाग : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी श्रीगाव येथे १९८५ साली धरण बांधण्यात आले. परिसरातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन या वेळी करण्यात आले होते. शेतीला पाणी देण्यासाठी कालवे आणि पाइपलाइनही टाकण्यात आली; परंतु पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक चुकीमुळे पाइपलाइनमध्ये पाणी सोडताच ती फुटली आणि प्रत्यक्षात शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्या पाइपलाइन दुरुस्तीचा प्रस्तावच आजतागायत झाला नाही. त्यामुळे श्रीगाव धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे समोर आल्यावर आता रायगड पाटबंधारे विभागाला खडबडून जाग आली आहे.

गेल्या २६ वर्षांत पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळे पाइपलाइनच्या दुरुस्तीचा विचारच झाला नाही आणि श्रीगाव धरणाच्या लाभक्षेत्रातील श्रीगाव आणि मेढेखार या गावांतील २५० हून अधिक शेतकरी तब्बल २६ वर्षे हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले. त्यांच्या शेतजमिनी नापीक राहिल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत, श्रीगावचे शेतकरी मनोज पाटील, मेढेखारचे शेतकरी कमलाकर पाटील आदीनी रायगड पाटबंधारे विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याअंती उघडकीस आले आहे.

श्रीगाव धरणातील पाणी शेतकºयांना मिळाल्यास श्रीगाव, मेढेखार आणि कातळपाडा या गावांतील १०० एकरांपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येऊ शकेल. या शेतीत दुबार पीक घेता येणार असून, भाताबरोबरच भाजीपाला व मत्स्यशेती होऊन शेतकºयांना आर्थिक लाभ होईल. तरी १९९२ मध्ये शेतीच्या पाण्यासाठी टाकलेली; परंतु आजतागायत बंदावस्थेत असलेली पाइपलाइन दुरुस्त करून पाणी देण्याची व्यवस्था करावी, असे लेखी पत्र श्रमिक मुक्ती दलाने ३ सप्टेंबर २०१८ रोजी रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंताधनंजय गोडसे यांना दिले आहे. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असेही या वेळी नमूद करण्यात आले आहे.

तब्बल २६ वर्षांनंतर पाटबंधारे विभागास जाग आली. श्रीगाव धरणाच्या पाण्याचा लाभ घेऊ शकणाºया शेतकºयांनी आपणाकडे पाण्याची मागणी अगोदरच नोंदविली आहे. त्या वेळी झालेल्या चर्चेनुसार अभियंता एस. एस. पाटील हे धरण परिसरात पाहणीसाठी येणार होते. मात्र, ते आले नाहीत वा या बाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.भातशेती नापीक करण्याचा प्रयत्नखारलँड विभागाने गेल्या ३० वर्षांत समुद्र सरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केलेली नाही. अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शेकडो एकर भातशेतीत समुद्राचे खारेपाणी घुसून ती पूर्णपणे नापीक झाली. ही भातशेती नष्ट करून शेतजमीन ओसाड ठरवण्यासाठीचा पहिला प्रयत्न होता.तर तालुक्यातील शेतकºयांना जे श्रीगाव धरणाचे पाणी शेतीकरिता द्यायचे ते न देता, शेतकºयांच्या जमिनी ओसाड करायच्या हा दुसरा प्रयत्न आहे. शेतजमिनी नापीक झाल्यावर त्यांना ओसाड घोषित करून त्या बड्या भांडवलदार व उद्योगांना कवडीमोल किमतीने शेतकºयांना विकायला लावण्यास भाग पाडणे.हे गेल्या अनेक वर्षांचे कटकारस्थान आहे. जिल्ह्यातील किती धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांना त्यांच्या हक्काचे शेतीकरिता पाणी मिळाले आहे, याची माहिती जिल्हाधिकाºयांकडे मागणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी