शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

अलिबागमध्ये आचारसंहितेच्या धसक्याने विकासकामांच्या कोनशिला झाकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:45 PM

मतदारांना तक्रार करण्याचे निवडणूक विभागाचे आवाहन

- आविष्कार देसाई अलिबाग : निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीमध्ये मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही निर्णय, घोषणा यावर निर्बंध आले आहेत. याच आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांश विकासकामांच्या पाट्या, फलक, कोनशिला कापडाने झाकण्यात आल्या आहेत. आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास आता मतदारांनी थेट तक्रार करण्याचे आवाहनही निवडणूक विभागाने केले आहे.देशभरात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या चार टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे पुढील तब्बल एक महिनाभर प्रचाराचा चांगलाच धुरळा उडणार असल्याने ऐन उन्हाळ््यात पारा चांगलाच चढलेला असणार आहे.निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष, प्रशासनाने नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे. आचारसंहितेचे कसे पालन करायचे आहे याबाबत स्पष्ट आदेश निवडणूक विभागाने जारी केले आहेत. मतदारांना प्रलोभने दाखवणे, त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या घटना, घोषणा अथवा निर्णय घेता येणार नाहीत. त्याचप्रमाणे स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे, सरकारी वाहनांचा वापर, अनुदानाचे वाटप, सरकारी जाहिराती प्रसिद्ध करणे, नवीन कामांचे उद्घाटन यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या सभा, बैठकांवर निवडणूक विभागाचे बारीक लक्ष राहणार आहे. आचारसंहितेचा भंग करण्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. राजकीय पक्षांनी आतापर्यंत विकासकामे केलेली आहेत. विकासकामे, योजना यांची माहिती होण्यासाठी त्या ठिकाणी कोनशिला, फलक लावण्यात आलेले आहेत. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपºयात अशा विकासकामांच्या पाट्या, कोनशिला फलक मोठ्या संख्येने उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो असे गृहीत धरून बहुतांश पाट्या, फलक कोनशिला कापडाने झाकण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अलिबागमधील विकासकामांच्या पाट्यांचा समावेश आहे.प्रत्येक राजकीय पक्षाने, उमेदवाराने आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे आहे. आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा घटना रोखण्यासाठी मतदारांनीही सक्रिय होण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मतदार आपल्या मोबाइल फोनद्वारे ‘सी-व्हीजल अ‍ॅप’च्या साहायाने निवडणूक आयोगाकडे तक्रार करू शकतो. प्रत्येक तक्रारदारास त्याच्या तक्रारीवर काय कारवाई केली याची माहिती १०० मिनिटात देणे निवडणूक आयोगावर बंधनकारक आहे. तक्रारदारांच्या इच्छेनुसार तक्रारीची माहिती स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९alibaugअलिबाग