शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

जागृत कष्टकरी संघटनेचा कर्जत प्रांत कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 23:50 IST

राष्ट्रीय नागरिकत्व नोंद, नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याची मागणी

कर्जत : राष्ट्रीय नागरिकत्व नोंद आणि नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ रद्द करावा, या मागणीसाठी जागृत कष्टकरी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर ४ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात आला होता. कर्जतमधील पोलीस मैदानावरून निघालेला मोर्चा बाजारपेठेतून फिरून दहिवली येथील प्रांत कार्यालयावरपोहोचला, या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले.

देशभरातील रहिवासी गेल्या तीन महिन्यांपासून हा कायदा मानवविरोधी असून, माणसामाणसांमध्ये तेढ निर्माण करणार आहे, त्यामुळे जाती धर्माच्या नावाने दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे सहभागी जनतेने या कायद्याच्या विरोधात मंगळवारी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात कर्जत आणि खालापूर या दोन्ही तालुक्यातील आदिवासी, ठाकूर, कोळी कातकरी, बौद्ध, मराठा, ओबीसी, मुसलमान आदी या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. हा कायदा सर्वांना बाधित करणारा आहे, यामुळे भारतीयांनी एकजुटीने केंद्र सरकारच्या विरोधात लढाई तीव्र करणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय रहिवासी नोंद प्रत्येक नागरिकाला तो किंवा ती या देशाची नागरिक आहे ते सिद्ध करावे लागेल, ते करण्यासाठी त्याचे पूर्वज म्हणजे आई-वडील, आजी-आजोबा, भारतीय नागरिक होते हे सिद्ध करणारे पुरावे सादर करावे लागतील. परिणामत: बहुतांश जनतेला हे सिद्ध करणे शक्य होणार नाही म्हणून त्यांना घुसखोर म्हणून घोषित केले जाईल. फक्त मुस्लीमच नाही तर सर्व १३० कोटी लोकांना पूर्वजांचा नागरिकत्व सिद्ध करावे लागेल, नाहीतर मुस्लीम बांधवांना सोडून इतरांना हे सरकार नागरिकत्व सुधारणा कायदामधून वाचवणार आहे.

या वेळी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. या वेळी जागृत कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष केशव वाघमारे, कार्याध्यक्ष नॅन्सी गायकवाड, उपाध्यक्ष सुशीला भोई, सचिव अनिल सोनवणे, वसंत पवार, नामदेव निरगुडा, लक्ष्मण पवार, सदानंद शिंगवा, शांता वाघमारे, मंगळ पवार, सीता पवार, कमळ वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

संघटनेच्या पत्रातील मुद्दे

१. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे जे लोक यांमधून वगळले हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बुद्धिस्ट आणि पारसी आहेत. त्यांना सीएएमधून भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करू शकतील; पण जे मुसलमान आहेत त्यांना अर्ज करता येणार नाही, त्यांना मतदानाचा अधिकार नाही,

२. देशातील सर्व १३० कोटी नागरिकांना एनआरसी प्रक्रियेतून ढकलून त्यांना आपल्या वंशाच्या नागरिकत्वाचा पुरावा सादर करावा लावणे म्हणजे जनतेच्या मनात चिंता, अस्थिरता आणि राग, अशांतता आणि अराजकता माजविण्यास कारणीभूत ठरतील. यासाठी एनआरसी सारख्या कायद्यांना विरोध केला पाहिजे. याला जनतेने सडेतोड उत्तर आपल्या संघटित ताकतीने दिले पाहिजे, जनतेमध्ये भेदाभेद नसून हे राज्यकर्ते असा तेढ लोकांमध्ये निर्माण करत आहेत, असे पत्र संघटनेच्या वतीने प्रसिद्ध केले आहे.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र