शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अवेळी पावसाने पांढरा कांदा धोक्यात; काढलेला कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड

By राजेश भोस्तेकर | Updated: March 7, 2023 10:49 IST

शेतातून काढलेला पांढरा कांदा शेतात सुकविण्यासाठी ठेवलेला असल्याने सुरू झालेल्या पावसाने धोक्यात आला आहे.

लोकमत न्युज नेटवर्क

अलिबाग : अलिबागचा गुणकारी आणि औषधी असलेल्या पांढरा कांद्याचे यंदा चांगले उत्पन्न आले असताना होळीला सुरू झालेल्या अवेळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. शेतातून काढलेला पांढरा कांदा शेतात सुकविण्यासाठी ठेवलेला असल्याने सुरू झालेल्या पावसाने धोक्यात आला आहे. पावसामुळे वाचण्यासाठी शेतकऱ्याची कांदा प्लास्टिकने झाकून ठेवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यास काढलेला तसेच शेतात असलेला कांदा पीक वाया जाण्याचे संकट शेतकऱ्या समोर उभे ठाकले आहे. 

रायगड जिल्ह्यात सोमवारी ६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास होळीला अवेळी पावसाचे आगमन झाले. मंगळवारी धुळीवंदन दिवशी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. अलिबाग तालुक्यातील नेहूली, कार्ले, वाडगाव, वेश्र्वी, खंडाळे, धोलपाडा, रुळे या भागात पांढरा कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पांढरा कांदा बाजारात विक्रीस आला आहे. तर अद्याप काही कांदा शेतात आहे. शेतकऱ्यांनी काढलेला कांदा हा शेतात सुकविण्यासाठी ठेवलेला आहे. सुकल्या नंतर त्याच्या माळा तयार करून तो विक्रीस पाठविला जात असतो.

जिल्ह्यात सोमवारपासून अवेळी पावसाने सुरुवात केल्याने कांदा उत्पादक यांची शेतात सुकविण्यासाठी काढून ठेवलेला भिजण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कांदा पावसापासून वाचावा यासाठी शेतकरी त्यावर प्लास्टिक टाकण्यात दंग झाले आहेत. शेतात उभा असलेला कांदाही पावसाने धोक्यात आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

चार दिवसांपूर्वी शेतातून कांदा काढला आहे. तो सुकविण्यासाठी ठेवला आहे. मात्र पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने तो झाकून ठेवत आहोत. कोकणातील शेतकऱ्याचे नुकसान झाले तर शासन लक्ष देत नाही. मात्र घाट माथ्यावर त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतात. आम्हालाही नुकसान भरपाई मिळावी ही शासनाकडे विनंती.

- दयानंद पाटील, कांदा उत्पादक

टॅग्स :Rainपाऊसonionकांदा