शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

अवकाळीची झळ सर्वसामान्यांच्या घरापर्यंत; भाजीपाल्याचे भाव कडाडले

By निखिल म्हात्रे | Updated: December 6, 2023 14:51 IST

रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे

अलिबाग - आठवडाभरापासून राज्यातील विविध भागांत पडलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली आहे. या पावसाचा कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असून भाजीपाल्यासह फळांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी रायगड जिल्ह्यात होणाऱ्या फळ आणि भाजीपाल्याच्या आवकवरही परिणाम होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. भाज्यांची अवाक घटल्याने भाजी मंडईमध्ये फळ आणि पालेभाजीचा भाव वधारला आहे.

रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला भाजीपाला पाण्यात भिजून गेला आहे. तर हवामान खात्याने पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांकडून तयार असलेला माल बाजारात आणण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे सध्या बाजारात आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत.पण पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने भविष्यात भाजीपाल्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती फळांच्या बाबतीतही आहे. फळांच्या बागा ही पाण्याखाली गेल्या आहेत. अलिबाग, पेण, माणगाव आणि कर्जत तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील बाजारात भाजीपाला येत असतो. मात्र अवकाळी पाऊस मोठया प्रमाणात झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.कोकणातील हापूस आंब्याला मोहोर येत आहे. तर, काही झाडांना मोहोर पकडला होता. मात्र, अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंब्याला आलेला मोहोर गळून पडला आहे. त्याचा परिणाम फेब्रुवारी, मार्चमध्ये येणाऱ्या आंब्यावर होणार आहे. पाऊस नसताना शेतकऱ्याने मेहनत करून पाणी आणून बागा जगवल्या आहेत; मात्र आता बागा तयार झालेल्या असताना अवकाळी पावसाने हजेरी लावून मेहनतीवर पाणी सोडले. यामुळे मुंबईला येणाऱ्या भाजीपाला तसेच फळांच्या किमतींवर येत्या काळात परिणाम पाहायला मिळेल.- निलेश उतेकर, फळ बागायतदार.

टॅग्स :Raigadरायगडvegetableभाज्या