शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
3
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
4
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
5
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
6
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
7
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
8
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
9
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
10
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
11
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
12
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
13
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
14
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
15
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
16
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
18
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
19
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
20
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
Daily Top 2Weekly Top 5

‘देशात सध्या मनुस्मृतीचेच अघोषित राज्य’ - आनंदराज आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 04:05 IST

समाजातील विषमतेची दरी दूर व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले.

महाड : समाजातील विषमतेची दरी दूर व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले. मात्र आजही आपल्या देशात अघोषित मनुस्मृतीचेच राज्य असल्याची टीका करीत या राज्यकर्त्यांचे मनसुबे वेळीच धुळीस मिळवा, अन्यथा देशात पुन्हा गुलामगिरीचे राज्य येईल अशा शब्दांत बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी राज्यकर्त्यांवर आसूड ओढले.महाडमध्ये मनुस्मृती दहनाच्या ९१ व्या वर्धापन दिनी महाडच्या क्रांतीभूमीवर बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत आनंदराज आंबेडकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्याचे राज्यकर्ते घटनाविरोधी आहेत, त्यांनी जगात सर्वश्रेष्ठ समजली जाणारी आपली राज्यघटना बदलण्याची भाषा करू नये, असा इशाराही आंबेडकर यांनी यावेळी दिला.यावेळी संघराज रूपवते, विनोद मोरे, एच. आर. पवार, सी. डी. जाधव, अंकुश सकपाळ, गजानन तांबे यांचीही भाषणे झाली. डॉ. प्रमिला संपत, अलका शिंदे, सपना रामटेके यांंचीही भाषणे झाली. यावेळी क्रांतीस्तंभासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.यानिमित्ताने चवदार तळे, क्रांतीभूमी व राष्ट्रीय स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनेक मान्यवरांसह राज्यातील विविध भागातून आलेल्या हजारो महिलांनी अभिवादनकेले.

टॅग्स :Raigadरायगड