शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भाऊसाहेब राऊत विद्यालयाला २५ वर्षांनंतर तारांचे कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:38 PM

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या भाऊसाहेब राऊत विद्यालयाला सुमारे २५ वर्षे कुंपणाची भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत होती.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आदिजन विद्या प्रसारक मंडळाच्या भाऊसाहेब राऊत विद्यालयाला सुमारे २५ वर्षे कुंपणाची भिंत नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत होती. चिंचवली ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापनाच्या वादात ही संरक्षक भिंत रखडली असल्याचे समोर आले होते. अखेर पालक आणि ग्रामस्थांच्या तक्र ारीनंतर यावर तोडगा काढत शाळेला तारेचे कंपाउंड घातल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत हद्दीत भाऊसाहेब राऊत विद्यालय आहे. ही शाळा अनेक वर्षे संरक्षक भिंतीअभावी चर्चेत होती. १९८१ मध्ये या शाळेची स्थापना झाली आहे. शाळेच्या स्थापनेपासून २५ वर्षे शाळेला कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत नव्हती. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. येथे शिशू वर्गापासून बारावीपर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा व्यवस्थापनाकडून कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नव्हती.शाळेच्या समोर कर्जत-कल्याण राज्यमार्ग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरूच असते. शाळा सुटण्याच्या वेळी सर्व विद्यार्थी या राज्यमार्गावर येत असल्याने वेगाने कार, ट्रक ये-जा करत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा प्रशासनाने या शाळेला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या संदर्भात पालकांनी शाळा प्रशासनाकडे तक्र ारी केल्या होत्या, तसेच माध्यमांतून या संदर्भात बातम्या प्रसिद्ध केल्या होता.चिंचवली ग्रामपंचायतीने सहकार्य केल्याने शाळा व्यवस्थापनाला हे तारेचे कंपाउंड घालता आले. गेली अनेक वर्षे शाळेला संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. पालक आणि ग्रामस्थांच्या तक्र ारीनंतर शाळेला तारेचे कंपाउंड घालण्यात आले आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा बचाव होण्यास मदत होणार आहे.- किशोर गायकवाड, ग्रामस्थ, डिकसळशाळेला कंपाउंड नसल्याने मुलांच्या जीवाला धोका संभवत होता. अनेक वेळा आम्ही शाळेकडे संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी केली होती. अखेर शाळेने तारेचे कंपाउंड घातले आहे, त्यामुळे धोका टळला असल्याने शाळेचे आभार.- हरिश्चंद्र वाघमारे, पालक

टॅग्स :Raigadरायगड