शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘आमदार आदर्श गाव’ योजना अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:40 IST

गेल्या दोन वर्षांत विकासकामांसाठी विधानसभेचे उरणचे आमदार मनोहर भोईर सोडून एकाही आमदाराने विकास निधीतून एक छदामही खर्च न केल्याने योजना अडचणीत सापडल्याचे दिसून येते.

- आविष्कार देसाईअलिबाग : जिल्ह्यातील विकास वेगाने होण्यासाठी राज्य सरकारने ‘आमदार आदर्श गाव’ योजना घोषित केली होती. गेल्या दोन वर्षांत विकासकामांसाठी विधानसभेचे उरणचे आमदार मनोहर भोईर सोडून एकाही आमदाराने विकास निधीतून एक छदामही खर्च न केल्याने योजना अडचणीत सापडल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्यात विधानसभेच्या सात आणि विधान परिषदेच्या चार आमदारांची संख्या आहे. यातील गंभीर बाब म्हणजे विधान परिषदेच्या चारपैकी शेकापचे आमदार बाळाराम पाटील सोडून उर्वरित आमदारांनी अद्यापही कोणत्या गावाचा या योजनेत समावेश करायचा आहे याचे साधे नावही सुचवलेले नसल्याने या योजनेला मूर्त स्वरूप प्राप्त होऊ शकलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारने आखलेल्या ग्राम विकासाच्या संकल्पनेलाच आमदारांकडून सुरुंग लागल्याचे त्या निमित्ताने अधोरेखित होते.केंद्र सरकारच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील गावांचा विकास करण्यासाठी ‘आमदार आदर्श गाव’ अशी संकल्पना पुढे आणली. २०१६-१७ या कालावधीत आणलेल्या या योजनेत आमदारांनी आपापल्या मतदार संघातील एका गावाचा या योजनेत समावेश करणे गरजेचे आहे. आमदारांना वर्षाला दोन कोटी रुपयांचा विकास निधी सरकारकडून प्राप्त होतो. त्याच निधीच्या माध्यमातून आमदारांनी त्या गावाचा विकास करून कायापालट करणे सरकारला अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील २८८ आमदारांनी २८८ गावे या योजनेत समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे किमान २८८ गावांचा विकास होऊन ती गावे सर्वांसमोर आदर्श ठरतील. ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येणार होती. मात्र, आमदारांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे आमदार आदर्श ग्राम योजनेतून होणारा गावांचा विकास रखडला आहे.सरकारने आमदार आदर्श ग्राम योजना अमलात आणली असली तरी, या योजनेला विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही. तसेच या योजनेतून करण्यात येणाºया विकासकामांसाठी नियमांमध्येही शिथिलता दिलेली नाही. आमदारांना दरवर्षी विकासकामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मिळतो. त्या निधीच्या माध्यमातूनच त्यांनी आमदार आदर्श ग्रामसाठी विकासकामे करायची अशी अट आहे. त्याचप्रमाणे आमदार राहत असलेल्या गावाचा, तसेच पत्नीच्या गावाचा म्हणजेच सासुरवाडीच्या गावाचा या योजनेत समावेश करायचा नाही अशी महत्त्वाची अट सरकारने योजनेसाठी घातली आहे. तीन वर्षांसाठी ही योजना राबवायची आहे. मुळातच योजना उशिरा घोषित करण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यासाठीच ही योजना राहणार आहे.मतदार संघातील विकासकामांसाठी येणाºया दोन कोटी रुपयांच्या निधीतून जास्तीत जास्त विकासकामे करून त्या गावांना न्याय कसा देता येईल यावरच आमदारांनी अधिक लक्ष केंद्रित केल्याचे ते करीत असलेल्या कामांवरून स्पष्ट होते.योजना मातीमोल?राज्य सरकारने प्रत्येक आमदारांना आराखडा तयार करण्यासाठी ५० हजार रुपये देऊ केलेले आहेत. असे असताना देखील आमदारांनी आमदार आदर्श गाव योजनेत स्वारस्य दाखवलेले नाही. योजना यशस्वी झाली नाही, तर दिलेले ५० हजार रुपये मातीमोल जाण्याची शक्यता आहे. उरणमधील शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी खालापूर तालुक्यातील वावर्ले गावामध्ये आपल्या आमदार निधीतून विकासकामे सुरू केली आहेत. हीच तेवढी या योजनेची जमेची बाजू म्हणता येईल.मतदार संघातील विकासकामांसाठी येणाºया दोन कोटी रुपयांच्या निधीतून जास्तीत जास्त विकासकामे करून त्या गावांना न्याय कसा देता येईल यावरच आमदारांनी अधिक लक्ष केंद्रित केल्याचे ते करीत असलेल्या कामांवरून स्पष्ट होते.आमदारांनी निवडलेल्या गावांची नावे- पनवेलचे भाजपाचे प्रशांत ठाकूर हे एकमेव आमदार आहेत. त्यांनी या योजनेच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील वाजे या गावाचा विकास करण्यासाठी नाव सुचवले आहे.- त्याचप्रमाणे कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांनी कर्जत तालुक्यातील वाकस या गावाचे नाव,- उरण येथील शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी खालापूर तालुक्यातील वावर्ले,- पेणमधील शेकापचे आमदार धैर्यशील पाटील यांनी सुधागड तालुक्यातील महागाव,- अलिबागमधील शेकापचे आमदार सुभाष ऊर्फ पंडित पाटील यांनी धोकवडे गाव,- महाड येथील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी महाड तालुक्यातील गोंडाळे- श्रीवर्धनमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधुत तटकरे यांनी नाव सुचवलेले नाही.योजनेचे गांभीर्य दिसत नाहीविधान परिषदेवर निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे, शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार अनिल तटकरे, माजी आमदार निरंजन डावखरे यांनी अद्यापही गावाचे नावही सुचवलेले नाही; परंतु शेकापचे बाळाराम पाटील यांनी पनवेल तालुक्यातील शिवकर या गावाचे नाव सुचवले आहे. थेट जनतेमधून निवडून गेले नसल्याने कदाचित त्यांनी या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसत नाही. यातून अजून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे हे आमदार जनतेमधून निवडूून गेले असते तर त्यांना गावांची नावे सुचवून त्यांना विकासाच्या छायेत आणता आले असते. त्यांनी त्यांच्या मतदार संघातील एखाद्या गावाचा विकास केला असता तर, त्यांच्यावर मतदारांकडून हल्ला झाला नसता; त्यांनी योजना गंभीरपणे घेतलेली नाही.इतर नोडल जिल्हा असलेल्या आमदारांनी निवडलेल्या गावांची नावेआ. सुनील राऊत(विक्रोळी, विधानसभा)यांनी अलिबाग तालुक्यातील परहुर गावाचे नाव आमदार आदर्श गावासाठी निवडले आहे.आ. संजय पोतनीस(कलिना विधानसभा)यांनी अलिबाग तालुका किहीमआ. अशोक पाटील(भांडुप पश्चिम विधानसभा)यांनी तळा तालुका-तळेगावआ. मंदा म्हात्रे(बेलापूर विधानसभा)यांनी खालापूर तालुका-बोरगाव,आ. प्रकाश सुर्वे(मागोठाणे विधानसभा)माणगाव तालुका-निजामपूरमाजी आमदारनिरंजन डावखरे(विधान परिषद)यांनी महाड तालुका-नातेआ. आर.एन.सिंह(विधान परिषद)यांनी कर्जत तालुका-भालिवडी गावाचेनाव सुचवले आहे.आ. अनिल परब(विधान परिषद सदस्य) उरण तालुक्यातील वशेणी

टॅग्स :Raigadरायगड