शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा प्रवास खडतर; वंजारपाडा, देवपाडा रस्ता बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 22:57 IST

लोकप्रतिनिधींंसह, अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्ष

- कांता हाबळे नेरळ : वंजारपाडा-देवपाडा तसेच पुढे अनेक आदिवासीवाड्यांना जोडणारा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने वाहन चालवणे धोकादायक बनले असून अनेक अपघात या रस्त्यावर घडत आहेत. तसेच या रस्त्यावरील वंजारपाडा येथील घाटरस्त्यावर संरक्षक कठडे नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होतआहे.

नेरळ-देवपाडा हा सुमारे दहा कि.मी.चा रस्ता असून, या रस्त्यावरील वंजारपाडा ते देवपाडा भागात तसेच पुढील आदिवासीवाड्यांना जोडणाºया रस्त्यावरील डांबराचा थर निघून गेल्याने या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नाही, तसेच रस्त्यावरील खड्डेदेखील भरले नाहीत. त्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. त्याचा त्रास वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

याच रस्त्यावर वंजारपाडा गावालगत असणाºया घाटरस्त्यावर भारत एज्युकेशन सोसायटीचे माथेरान हॅली इंग्लिश मीडियम स्कूल आहे. यांची स्कूलबसही याच घाटरस्त्यातून ये-जा करत असते. येथे धोकादायक वळण असून रस्त्यावर खोल दरी असल्याने येथे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याला संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून अनेक वर्षांपासून होत आहे; परंतु याची दखल अद्याप ना लोकप्रतिनिधींनी घेतली ना अधिकाऱ्यांनी. निवडणुकीत आश्वासन देणारे मात्र आता गायब झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्यावर डांबरीकरण करावे आणि नागरिकांना, प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे.

नादुरुस्त रस्त्यामुळे एसटी सेवा बंद

देवपाडा, तसेच पुढील अनेक आदिवासी भागातील नागरिक नेरळ येथे येत असतात; परंतु या रस्त्यावर प्रवास करताना वाहनचालक, प्रवासी, रुग्ण, गरोदर महिला यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नादुरुस्त रस्त्यामुळे नेरळ-देवपाडा एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. या रस्त्यावरून स्कूलबस, अनेक मोठमोठी खासगी वाहने, दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या खराब रस्त्यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच वारे भागातून प्रवासी या मार्गाने येत असतात.

गेल्या अनेक वर्षांपासून वंजारपाडा ते देवपाडा रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले नाही, त्यामुळे रस्त्यावरील खडी वर अली आहे.हा रस्ता धोकादायक बनला असून, छोटे-मोठे अपघात घडत आहेत. येथून प्रवास करताना प्रवासी, वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच गरोदर महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन या रस्त्यावर लवकर डांबरीकरण करावे.- निवृत्ती झोमटे, ग्रामस्थ, देवपाडा

मागील वर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडे रस्त्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता; परंतु दहिवली ते वंजारपाडापर्यंतच रस्ता मंजूर झाला. या रस्त्याची पाहणी करण्यात आली असून, या वर्षी पुन्हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.- पी. एस. गोपणे,शाखा अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार