शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

गाढी नदीवरील धोकादायक देवद पुलावरून वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:29 AM

वाहनांना बंदी असूनदेखील दुचाकीची वाहतूक सुरू असल्याने अपघात झाल्यास कोणाला जबाबदार धरणार? असा सवाल उपस्थित झालेला आहे.

- मयूर तांबडेपनवेल : गाढी नदीवर असलेला देवद गाव ते नवीन पनवेल हा पूल धोकादायक असूनही या पुलावरून वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. वाहनांना बंदी असूनदेखील दुचाकीची वाहतूक सुरू असल्याने अपघात झाल्यास कोणाला जबाबदार धरणार? असा सवाल उपस्थित झालेला आहे. सद्यस्थितीत धोकादायक झालेला हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नवी मुंबई महापालिकेद्वारे मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गाढी नदीवर छोटासा पूल बांधण्यात आलेला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून याच पुलावरून चारचाकी व दुचाकी वाहनांतून प्रवास केला जात आहे. गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या गृहसंकुलांमुळे मोठ्या प्रमाणात येथील रहिवासी संख्या वाढली आहे. येथे गाड्या वाढल्या, वर्दळही वाढली आहे. या पुलावरून अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांची रहदारी सुरू आहे. देवद गाव ते नवीन पनवेल यांना जोडणाऱ्या गाढी नदीवरील पुलास तीन कोटी रु पयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी २२ नोव्हेंबर रोजी मंजूर केला आहे. यामुळे हजारो नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. देवद परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गावांची शहरे होऊन अनेक वर्षे उलटली, तरी देवद गावात जाणारा मार्ग अरुंदच आहे. हा पूल धोकादायक झाल्याने नवी मुंबई महापालिकेकडून फलक व बांध घालून बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, याला न जुमानता मोठ्या प्रमाणावर दुचाकी या पुलावरून ये-जा करत आहेत. गाढी नदीला पाणी कमी झाल्यामुळे देवद गावात जाण्यासाठी नदीतून रस्ता बनविण्यात आलेला आहे, असे असले तरीदेखील दुचाकी या धोकादायक पुलावरून ये-जा करत आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बांधण्यात आलेल्या या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नवीन पूल बांधण्याची मागणी केली होती. आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार विवेक पाटील यांनीही यासाठी पाठपुरावा केला होता. अरुंद व धोकादायक पुलामुळे देवद परिसरातील नागरिकांना प्रवासात मोठा अडथळा होता. या देवद पुलासाठी तीन कोटी मंजूर झालेले आहेत, त्यामुळे लवकरच या कामाला सुरु वात होईल. देवदवासीयांची एवढ्या वर्षांपासून सुरू असलेली फरफट दूर होईल.

टॅग्स :riverनदीroad safetyरस्ते सुरक्षाpanvelपनवेल