शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

महामार्गावर वाहतूककोंडी, महामार्गावर वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:03 IST

कोकणात ३० हजार वाहने रवाना । अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर बंदी

पनवेल/ नवी मुंबई : गणेशोत्सवामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे मुंबई-गोवा व मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी वाहतूककोंडी झाली होती. गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली असून, २४ तास बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन दिवसांमध्ये या मार्गावरून उत्सवासाठी ३० हजार खासगी व एसटी बसेससह इतर वाहने गेल्याची नोंद झाली आहे.

पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेमध्ये व निर्विघ्नपणे पार पाडता यावा, यासाठी महापालिकेसह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उत्सवासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे व कोकणातील तीनही जिल्ह्यांमध्ये लाखो भाविक जात आहेत. एसटी महामंडळाने जादा बसेस उपलब्ध केल्या असून, खासगी बसेसही मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र व कोकणात जाणार आहेत. वाहनांची संख्या नेहमीपेक्षा पाचपट वाढणार असल्यामुळे मुंबई-गोवा व मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. अवजड वाहनांना २ सप्टेंबरपर्यंत गोवा महामार्गावर जाण्यास मज्जाव केला आहे. कळंबोली, पळस्पे फाटासह गोवा महामार्गाकडे जाणाºया सर्व नाक्यावर २४ तास कर्मचारी तैनात केले आहेत. ३० व ३१ सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये गोवा महामार्गावरून कोकणाकडे तब्बल ३० हजार एसटी व खासगी बसेस व कार गणपतीसाठी गेले आहेत. नियमित कोकणाकडे रोज अडीच हजार वाहने जात असतात. अचानक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे महामार्गावर कळंबोली व पळस्पे जवळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. पावसाचे पाणीही रोडवर साचल्याने वाहतूककोंडीमध्ये भर पडली होती. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना धावपळ करावी लागत होती.

दोन्ही महामार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोमवारी पहाटेपर्यंत गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गावाकडे जाणार आहेत. यामुळे पोलिसांनी वाशी, सानपाडा, नेरुळ, सीबीडी, खारघर, कळंबोली, पळस्पे परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी सातत्याने रोडवर राहतील, अशी व्यवस्था केली आहे. यासाठी काही ठिकाणी निवारा शेडही तयार केले आहेत. या व्यतिरिक्त शहरातील बंदोबस्तामध्येही वाढ करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १९२ पेक्षा जास्त सार्वजनिक ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. पनवेल व उरण परिसरामध्येही १०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणपती असणार आहेत. ३० हजारांपेक्षा जास्त घरांमध्ये गणरायाचे आगमन होणार आहे. पोलिसांनी आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. विसर्जन तलावांवरही सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात केला आहे. गणेशोत्सव मंडळांना व नागरिकांनाही सुरक्षेसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.महामार्गावर वाहनांच्या रांगावाशी ते सीबीडीदरम्यान महामार्गावर फारशी वाहतूककोंडी झाली नाही; परंतु पनवेल परिसरामध्ये कळंबोली, पळस्पे व इतर ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. रोड खराब असल्यामुळे व अचानक झालेल्या पावसाने पाणी साचल्यामुळे पनवेल परिसरामध्ये वाहतूककोंडीमध्ये वाढ झाली होती. पळस्पेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी रोडवर आल्यामुळेही वाहतुकीवर परिणाम झाला होता.सायन-पनवेल व मुंबई-गोवा महामार्गावर २४ तास बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मार्गावर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. अवजड वाहनांना गोवा महामार्गावर बंदी करण्यात आली असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.- सुनील लोखंडे, वाहतूक पोलीस उपआयुक्तगणेशोत्सवासाठीची जय्यत तयारीमुंबई-गोवा व मुंबई-पुणे महामार्गावर २४ तास पोलीस बंदोबस्तमुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदीवाशी, सानपाडा, नेरुळ, सीबीडी, कळंबोली, खारघर, पळस्पेमध्ये विशेष बंदोबस्तवाहतूक पोलिसांनी सर्वाधिक मनुष्यबळ महामार्गावर तैनातशहरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुरक्षेसाठी सूचनासार्वजनिक गणेशोत्सव परिसरावरही कॅमेऱ्यांची नजरसाध्या वेशातील पोलिसांची गस्तही वाढविलीघातपाती होऊ नये यासाठी विशेष खबरदारीची सुरुवातमहाड तालुक्यातील केंबुर्ली गावाजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दुपारी तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. अपघातानंतर महामार्ग जवळपास दीड तास ठप्प झाल्याने पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रवासात प्रचंड हाल झाले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसRaigadरायगड