शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पर्यटनासाठी किल्ल्यांना पसंती, प्रेक्षणीय स्थळे लवकरच जगाच्या नकाशावर : कोकणातील स्थानिकांना मिळणार रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 2:52 AM

महाराष्ट्राचा गड-किल्ल्यांचा इतिहास अनन्यसाधारण असाच आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिले आहे. त्यात दुर्गराज रायगडच्या विकासासाठी केंद्रीय स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देवून

विशेष प्रतिनिधी अलिबाग : महाराष्ट्राचा गड-किल्ल्यांचा इतिहास अनन्यसाधारण असाच आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्न पाहिले आहे. त्यात दुर्गराज रायगडच्या विकासासाठी केंद्रीय स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देवून ते स्वप्न वास्तवात उतरवण्यास देखील प्रारंभ केला आहे. जमिनीवरील, पर्वतावरील आणि समुद्रातील अशा तीन प्रकारच्या गडकोटांनी कोकण समृद्ध आहे. वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले हे गड-किल्ले आणि प्रेक्षणीय स्थळे लवकरच जगाच्या नकाशावर येणार आहेत. पर्यटन क्षेत्रात काम करणाºया ‘एआरबीएनबी’ या आंतरराष्टÑीय पर्यटन कंपनीने त्यासाठी पुढाकार घेवून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाच्या सहयोगाने हे वास्तवात येत आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वृद्धीबरोबरच स्थानिक बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.महाराष्टÑात ३५० हून अधिक गड-किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य अनेक राजवटींच्या सत्ता या किल्ल्यांनी अनुभवलेल्या आहेत. काही मोजके गड-किल्ले सोडले तर इतिहासाच्या या ठेव्यांकडे गेल्या काही वर्षात दुर्लक्ष झाले आहे. मात्र, महाराष्टÑ राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) इतिहासाचा हा ठेवा सर्वसामान्यांसाठी खुला व्हावा यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेवून नियोजन केले आहे. त्यासाठी एआरबीएनबी या पर्यटन क्षेत्रात कार्य करणाºया कंपनीसोबत एमटीडीसीने करार केला आहे. एआरबीएनबी कंपनीने जगभरातील विविध देशामधील ऐतिहासिक किल्ले तसेच महत्त्वाचा ठेवा असलेल्या वास्तू आपल्या माध्यमातून आॅनलाइन पध्दतीने पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. आता राज्यातही गड-सागरी किल्ले व ऐतिहासिक वास्तू असलेल्या भागातील पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.राज्यातील गड-किल्ले आणि सागरी किल्ले असलेल्या भागातील पर्यटन वाढीबरोबरच ‘बेड आणि ब्रेकफास्ट’ अर्थात निवास-न्याहारी या योजनेव्दारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. स्थानिक रहिवाशांना त्यासाठी एमटीडीसीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात गड व सागरी किल्ले असलेल्या भागातील नागरिकांना रोजगार देण्यात येणार आहे.पुढील टप्प्यात राज्यातील ऐतिहासिक वास्तू असलेली गावे शहरामध्ये अशाच पध्दतीने ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती एमटीडीसीच्या सूत्रांनी दिली आहे.कोकण विभागीय आयुक्तस्तरावरून नियोजन१एमटीडीसी व एआरबीएनबी कंपनी यांच्यात करार झाला आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या एका आढावा बैठकीत कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली आहे. त्या माध्यमातून जिल्ह्यातील गड व सागरी किल्ले तसेच ऐतिहासिक ठेव्यांची माहिती गोळा केली जाणार आहे. त्यातून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.२बेड आणि ब्रेकफास्टच्या माध्यमातून त्या त्या भागातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. पर्यटन क्षेत्रात आॅनलाइन सेवा देणारी एनआरबीएनबी ची कंपनी सन २००८ पासून कार्यरत आहे. अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को व कॅलिफोर्निया शहरातील पर्यटन स्थळांची माहिती आॅनलाइन पध्दतीने जगासाठी याच कंपनीने खुली करून दिली.३आतापर्यंत जगातील १९१ देशातील ३४ हजार शहरातील ऐतिहासिक ठेवा आॅनलाइन पध्दतीने उपलब्ध करुन दिला आहे. येत्या काळात देशातील गड-सागरी किल्ले व ऐतिहासिक वास्तू अशा १८ हजार वास्तूंचाठेवा जगासाठी खुला करून देण्यातयेणार आहे. त्यामुळेच देशाच्या पर्यटन वाढीस हातभार लागणार आहे.