शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शहीद यशवंत घाडगे यांची आज जयंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 23:48 IST

व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते शहीद वीर यशवंतराव घाडगे यांचा दरवर्षी ९ जानेवारी रोजी स्मृतिदिन साजरा केला जातो. त्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.

माणगाव : येथे व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते शहीद वीर यशवंतराव घाडगे यांचा दरवर्षी ९ जानेवारी रोजी स्मृतिदिन साजरा केला जातो. त्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. आपल्या शौर्याचा अतुलनीय पराक्रम करीत शत्रूंची धूळधाण उडविणाऱ्या माणगाव तालुक्यातील आंब्रेवाडी पळसगाव येथील शूरवीर व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते शहीद वीर यशवंतराव बाळाजी घाडगे यांना पाचव्या मराठा लाइट इन्फ्रंट्रीमध्ये असताना वीरमरण आले. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२१ साली झाला होता. तर त्यांना वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी १० जुलै १९४४ रोजी वीरमरण आले. त्यांनी सुमारे १५० ते २०० शत्रूंचा खात्मा केला. त्या शूरवीराचे स्मारक इंग्रजांनी जुन्या माणगाव तहसील मैदानात बांधले आहे. घाडगे यांच्या शौर्यगाथेची दखल घेत तत्कालीन आमदार, मंत्री, पालकमंत्री तसेच उच्च अधिकाऱ्यांनी अनेक आश्वासने दिली होती. ती सर्व आश्वासने हवेतच विरली असून, गेल्या १५ वर्षांत एकही आश्वासन पूर्णत्वाला गेले नाही, त्यामुळे तालुक्यातील माजी सैनिक आणि समस्त माणगावकर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.दरम्यानच्या काळात अशोक साबळे यांच्या प्रयत्नातून वीर घाडगे यांच्या पुतळ्यावर कायमस्वरूपी छत्री बांधण्यात आली होती, ती आजही आहे. यापूर्वी वीर घाडगे यांचा स्मृतिदिन १७ जानेवारी होत असे. आता तो ९ जानेवारीला होत आहे. कारण त्यांची जन्मतारीखच कुणाला माहिती नव्हती. त्यानंतर शोधाशोध केल्यावर खरी तारीख मिळाल्यावर हे शासकीय अधिकारी ९ जानेवारीला घाडगे उत्सव दरवर्षाप्रमाणे साजरा करीत आहेत. त्यांच्या पुतळ्याला त्यांच्या जयंती उत्सवात वीरपत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात येतो. यापूर्वी त्यांच्या जयंतीनिमित्त मिलिटरी भरती होत असे. त्या वेळी अनेक तरुण भरतीसाठी येत असत. आता ती आर्मी भरतीसुद्धा बंद करण्यात आली आहे.>वीरपत्नीच्या पदरी उपेक्षाशहीद यशवंत घाडगे यांचे मोठे स्मारक, संग्रहालय आणि सैनिक विश्रांतिगृह बांधणे तसेच इतर अनेक आश्वासने दिली गेली होती, ती अद्यापही पूर्ण झाली नाहीत. वीर यशवंतराव घाडगे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई घाडगे आज ९० पेक्षा जास्त वयाच्या आहेत. त्या आता माणगाव तालुक्यातील पाटणूस येथे माहेरी अंथरुणाला खिळून आहेत. इंग्रजांनी त्या काळात आंब्रेवाडी आणि पाटणूस येथे वीरपत्नीला वीर घाडगे यांचे शौर्य पाहून दोन घरे बांधून दिली होती. त्यातील आंब्रेवाडी येथील घर जीर्ण होऊन कोसळले आहे. ज्या घरात वीर घाडगे जन्मले होते आणि इंग्रजांना आपले शौर्य दाखविले होते ते घरही बांधले गेले नाही. ते घर बांधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांच्या पदरी अद्यापही उपेक्षाच आली आहे.