शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

शहीद यशवंत घाडगे यांची आज जयंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 23:48 IST

व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते शहीद वीर यशवंतराव घाडगे यांचा दरवर्षी ९ जानेवारी रोजी स्मृतिदिन साजरा केला जातो. त्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.

माणगाव : येथे व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते शहीद वीर यशवंतराव घाडगे यांचा दरवर्षी ९ जानेवारी रोजी स्मृतिदिन साजरा केला जातो. त्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. आपल्या शौर्याचा अतुलनीय पराक्रम करीत शत्रूंची धूळधाण उडविणाऱ्या माणगाव तालुक्यातील आंब्रेवाडी पळसगाव येथील शूरवीर व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते शहीद वीर यशवंतराव बाळाजी घाडगे यांना पाचव्या मराठा लाइट इन्फ्रंट्रीमध्ये असताना वीरमरण आले. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२१ साली झाला होता. तर त्यांना वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी १० जुलै १९४४ रोजी वीरमरण आले. त्यांनी सुमारे १५० ते २०० शत्रूंचा खात्मा केला. त्या शूरवीराचे स्मारक इंग्रजांनी जुन्या माणगाव तहसील मैदानात बांधले आहे. घाडगे यांच्या शौर्यगाथेची दखल घेत तत्कालीन आमदार, मंत्री, पालकमंत्री तसेच उच्च अधिकाऱ्यांनी अनेक आश्वासने दिली होती. ती सर्व आश्वासने हवेतच विरली असून, गेल्या १५ वर्षांत एकही आश्वासन पूर्णत्वाला गेले नाही, त्यामुळे तालुक्यातील माजी सैनिक आणि समस्त माणगावकर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.दरम्यानच्या काळात अशोक साबळे यांच्या प्रयत्नातून वीर घाडगे यांच्या पुतळ्यावर कायमस्वरूपी छत्री बांधण्यात आली होती, ती आजही आहे. यापूर्वी वीर घाडगे यांचा स्मृतिदिन १७ जानेवारी होत असे. आता तो ९ जानेवारीला होत आहे. कारण त्यांची जन्मतारीखच कुणाला माहिती नव्हती. त्यानंतर शोधाशोध केल्यावर खरी तारीख मिळाल्यावर हे शासकीय अधिकारी ९ जानेवारीला घाडगे उत्सव दरवर्षाप्रमाणे साजरा करीत आहेत. त्यांच्या पुतळ्याला त्यांच्या जयंती उत्सवात वीरपत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात येतो. यापूर्वी त्यांच्या जयंतीनिमित्त मिलिटरी भरती होत असे. त्या वेळी अनेक तरुण भरतीसाठी येत असत. आता ती आर्मी भरतीसुद्धा बंद करण्यात आली आहे.>वीरपत्नीच्या पदरी उपेक्षाशहीद यशवंत घाडगे यांचे मोठे स्मारक, संग्रहालय आणि सैनिक विश्रांतिगृह बांधणे तसेच इतर अनेक आश्वासने दिली गेली होती, ती अद्यापही पूर्ण झाली नाहीत. वीर यशवंतराव घाडगे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई घाडगे आज ९० पेक्षा जास्त वयाच्या आहेत. त्या आता माणगाव तालुक्यातील पाटणूस येथे माहेरी अंथरुणाला खिळून आहेत. इंग्रजांनी त्या काळात आंब्रेवाडी आणि पाटणूस येथे वीरपत्नीला वीर घाडगे यांचे शौर्य पाहून दोन घरे बांधून दिली होती. त्यातील आंब्रेवाडी येथील घर जीर्ण होऊन कोसळले आहे. ज्या घरात वीर घाडगे जन्मले होते आणि इंग्रजांना आपले शौर्य दाखविले होते ते घरही बांधले गेले नाही. ते घर बांधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांच्या पदरी अद्यापही उपेक्षाच आली आहे.