शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

शेती जिवंत ठेवण्यासाठी आत्मीयता हवी - जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 18:51 IST

चिरनेर येथे गुरुवारी (२५) कृषी तंत्रज्ञान व्यवस्था, यंत्रणा अंतर्गत शेती मिशन अभियान हे तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 मधुकर ठाकूर

उरण : शेती हा जुगार आहे.परंतु आधुनिकीकरणामुळे त्याच्यात बदल करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. शेती जिवंत ठेवण्यासाठी आत्मीयता हवीच. त्यामुळे शेतीची कास धरा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी चिरनेर येथे केले.  

चिरनेर येथे गुरुवारी (२५) कृषी तंत्रज्ञान व्यवस्था, यंत्रणा अंतर्गत शेती मिशन अभियान हे तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या. कृषी अधीक्षक बाणखेले यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रक्रियेवरची प्रशिक्षणे घेऊन, प्रक्रिया युनिट उभी करून उत्पादक  कंपनी तयार करा. आणि त्याचा फायदा घ्या. उत्पादन प्रक्रियेची उद्योग कंपनीला मोठी गरज आहे. मात्र त्यासाठी प्रमुख घटक असलेल्या डायरेक्टर बोर्डाची जबाबदारीही  महत्त्वाची आहे. उरण तालुका शेतीच्या विकासाबाबत दुर्लक्षित राहिला आहे. आता तर इथे कंटेनर यार्डचे जाळे विणले आहे. दिवसेंदिवस गोदामांची संख्या वाढत आहे. यावर शेतकऱ्यांना मात करता येईल.

आपल्या जमिनीची विक्री न करता, कंपनी स्थापन करून कच्चा माल उपलब्ध नसेल तर बाहेरून  आणून प्रक्रिया करून,उत्पादन तयार करा. प्रक्रिया तयार करून केलेल्या मालाला नक्कीच जास्त भाव मिळेल. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर भात आणि नाचणी एवढेच आपण उत्पादन घेतो. भाताची विक्री केली तर आपल्याला किती भाव मिळतो. हे आपल्याला ठाऊक आहे .परंतु भातावर प्रक्रिया करून  पोहे तयार करून त्या पॅकेजची विक्री केली, तर नक्कीच जास्त पैसे मिळतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.खेडचा फणस जुन्नर पर्यंत पोहोचतो. त्याच्या बियांची पावडर केल्यास ते मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर यावेळी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नामदेव म्हसकर यांनी जमिनी विकण्यापेक्षा जमीनीवर फड उभे करा. रासायनिक खतांमुळे नापीक झालेल्या जमिनी सेंद्रिय खताच्या माध्यमातून सुपीक करा. कोकणात पारंपारिक शेती केली जाते. तिला बगल द्या. मधमाशा संपल्या, तर मानवी जीवन धोक्यात येईल. त्यासाठी निसर्ग वाचविण्याची गरज आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. 

याप्रसंगी चिरनेर सरपंच भास्कर मोकल, पोलीस पाटील संजय पाटील , प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नामदेव म्हसकर, तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ नारनवर, सीए महादेव नवले, मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील,  नमिता वाकळे, कृषी पर्यवेक्षक अलका बुरकुळ, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे, कृषी सहाय्यक सुरज घरत, कृषी सहाय्यक विभावरी चव्हाण ,कृषी सहाय्यक अदिका पानसरे, कृषी सहाय्यक सुषमा अंबुलगेकर, कृषी सहाय्यक आर. पी. भजनावळे, तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.     कार्यक्रमासाठी महागणपती सेंद्रिय शेती गटाच्या शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.