शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शेती जिवंत ठेवण्यासाठी आत्मीयता हवी - जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 18:51 IST

चिरनेर येथे गुरुवारी (२५) कृषी तंत्रज्ञान व्यवस्था, यंत्रणा अंतर्गत शेती मिशन अभियान हे तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 मधुकर ठाकूर

उरण : शेती हा जुगार आहे.परंतु आधुनिकीकरणामुळे त्याच्यात बदल करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. शेती जिवंत ठेवण्यासाठी आत्मीयता हवीच. त्यामुळे शेतीची कास धरा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी चिरनेर येथे केले.  

चिरनेर येथे गुरुवारी (२५) कृषी तंत्रज्ञान व्यवस्था, यंत्रणा अंतर्गत शेती मिशन अभियान हे तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या. कृषी अधीक्षक बाणखेले यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रक्रियेवरची प्रशिक्षणे घेऊन, प्रक्रिया युनिट उभी करून उत्पादक  कंपनी तयार करा. आणि त्याचा फायदा घ्या. उत्पादन प्रक्रियेची उद्योग कंपनीला मोठी गरज आहे. मात्र त्यासाठी प्रमुख घटक असलेल्या डायरेक्टर बोर्डाची जबाबदारीही  महत्त्वाची आहे. उरण तालुका शेतीच्या विकासाबाबत दुर्लक्षित राहिला आहे. आता तर इथे कंटेनर यार्डचे जाळे विणले आहे. दिवसेंदिवस गोदामांची संख्या वाढत आहे. यावर शेतकऱ्यांना मात करता येईल.

आपल्या जमिनीची विक्री न करता, कंपनी स्थापन करून कच्चा माल उपलब्ध नसेल तर बाहेरून  आणून प्रक्रिया करून,उत्पादन तयार करा. प्रक्रिया तयार करून केलेल्या मालाला नक्कीच जास्त भाव मिळेल. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर भात आणि नाचणी एवढेच आपण उत्पादन घेतो. भाताची विक्री केली तर आपल्याला किती भाव मिळतो. हे आपल्याला ठाऊक आहे .परंतु भातावर प्रक्रिया करून  पोहे तयार करून त्या पॅकेजची विक्री केली, तर नक्कीच जास्त पैसे मिळतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.खेडचा फणस जुन्नर पर्यंत पोहोचतो. त्याच्या बियांची पावडर केल्यास ते मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर यावेळी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नामदेव म्हसकर यांनी जमिनी विकण्यापेक्षा जमीनीवर फड उभे करा. रासायनिक खतांमुळे नापीक झालेल्या जमिनी सेंद्रिय खताच्या माध्यमातून सुपीक करा. कोकणात पारंपारिक शेती केली जाते. तिला बगल द्या. मधमाशा संपल्या, तर मानवी जीवन धोक्यात येईल. त्यासाठी निसर्ग वाचविण्याची गरज आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. 

याप्रसंगी चिरनेर सरपंच भास्कर मोकल, पोलीस पाटील संजय पाटील , प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नामदेव म्हसकर, तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ नारनवर, सीए महादेव नवले, मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील,  नमिता वाकळे, कृषी पर्यवेक्षक अलका बुरकुळ, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे, कृषी सहाय्यक सुरज घरत, कृषी सहाय्यक विभावरी चव्हाण ,कृषी सहाय्यक अदिका पानसरे, कृषी सहाय्यक सुषमा अंबुलगेकर, कृषी सहाय्यक आर. पी. भजनावळे, तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.     कार्यक्रमासाठी महागणपती सेंद्रिय शेती गटाच्या शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.