शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेती जिवंत ठेवण्यासाठी आत्मीयता हवी - जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 18:51 IST

चिरनेर येथे गुरुवारी (२५) कृषी तंत्रज्ञान व्यवस्था, यंत्रणा अंतर्गत शेती मिशन अभियान हे तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 मधुकर ठाकूर

उरण : शेती हा जुगार आहे.परंतु आधुनिकीकरणामुळे त्याच्यात बदल करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. शेती जिवंत ठेवण्यासाठी आत्मीयता हवीच. त्यामुळे शेतीची कास धरा असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी चिरनेर येथे केले.  

चिरनेर येथे गुरुवारी (२५) कृषी तंत्रज्ञान व्यवस्था, यंत्रणा अंतर्गत शेती मिशन अभियान हे तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर भाषणात बोलत होत्या. कृषी अधीक्षक बाणखेले यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रक्रियेवरची प्रशिक्षणे घेऊन, प्रक्रिया युनिट उभी करून उत्पादक  कंपनी तयार करा. आणि त्याचा फायदा घ्या. उत्पादन प्रक्रियेची उद्योग कंपनीला मोठी गरज आहे. मात्र त्यासाठी प्रमुख घटक असलेल्या डायरेक्टर बोर्डाची जबाबदारीही  महत्त्वाची आहे. उरण तालुका शेतीच्या विकासाबाबत दुर्लक्षित राहिला आहे. आता तर इथे कंटेनर यार्डचे जाळे विणले आहे. दिवसेंदिवस गोदामांची संख्या वाढत आहे. यावर शेतकऱ्यांना मात करता येईल.

आपल्या जमिनीची विक्री न करता, कंपनी स्थापन करून कच्चा माल उपलब्ध नसेल तर बाहेरून  आणून प्रक्रिया करून,उत्पादन तयार करा. प्रक्रिया तयार करून केलेल्या मालाला नक्कीच जास्त भाव मिळेल. रायगड जिल्ह्याचा विचार केला तर भात आणि नाचणी एवढेच आपण उत्पादन घेतो. भाताची विक्री केली तर आपल्याला किती भाव मिळतो. हे आपल्याला ठाऊक आहे .परंतु भातावर प्रक्रिया करून  पोहे तयार करून त्या पॅकेजची विक्री केली, तर नक्कीच जास्त पैसे मिळतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.खेडचा फणस जुन्नर पर्यंत पोहोचतो. त्याच्या बियांची पावडर केल्यास ते मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर यावेळी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नामदेव म्हसकर यांनी जमिनी विकण्यापेक्षा जमीनीवर फड उभे करा. रासायनिक खतांमुळे नापीक झालेल्या जमिनी सेंद्रिय खताच्या माध्यमातून सुपीक करा. कोकणात पारंपारिक शेती केली जाते. तिला बगल द्या. मधमाशा संपल्या, तर मानवी जीवन धोक्यात येईल. त्यासाठी निसर्ग वाचविण्याची गरज आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. 

याप्रसंगी चिरनेर सरपंच भास्कर मोकल, पोलीस पाटील संजय पाटील , प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ नामदेव म्हसकर, तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ नारनवर, सीए महादेव नवले, मंडळ कृषी अधिकारी किसन शिगवण, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील,  नमिता वाकळे, कृषी पर्यवेक्षक अलका बुरकुळ, कृषी पर्यवेक्षक शिवाजी लोहकरे, कृषी सहाय्यक सुरज घरत, कृषी सहाय्यक विभावरी चव्हाण ,कृषी सहाय्यक अदिका पानसरे, कृषी सहाय्यक सुषमा अंबुलगेकर, कृषी सहाय्यक आर. पी. भजनावळे, तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.     कार्यक्रमासाठी महागणपती सेंद्रिय शेती गटाच्या शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.