शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कुरुंगमधील मातीच्या बंधाऱ्यांना गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:35 AM

पहिल्याच वर्षी भेगा; ‘जलयुक्त शिवार’चा निधी वाया

कर्जत : तालुक्यात कुरुंग येथे ‘जलयुक्त शिवार’ अभियानात दोन ठिकाणी बांधलेल्या मातीच्या बंधाºयांमधून पाणीगळती सुरू आहे. बंधा-याच्या बांधाला भेगा पडल्या आहेत, त्यामुळे मातीचे बंधारे फुटून वाहून जाण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे ‘जलयुक्त शिवार’ अभियानातील कामाबद्दल संशय निर्माण झाला आहे.कृषी विभागाच्या वतीने कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीमधील कुरुं ग गावाची निवड २०१८ साठी करण्यात आली होती. तेथील पाण्याची भूजल क्षमता वाढविण्यासाठी कृषी विभागाने सलग समतर चर आणि मातीचे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. कृषी विभागाने त्या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानातून दोन मातीचे बंधारे बांधले आहेत. सर्वत्र पाऊस होत असतानाही २० गुंठे क्षेत्र व्यापलेल्या मातीच्या बंधाºयात पाणीगळती होत असल्याने बंधाºयात पाणीच साचत नाही.दुसरीकडे त्याच भागात कृषी विभागाने दुसºया एका ठिकाणी मातीचे बंधारे बांधले आहेत. त्यातील बंधारा बांधताना कृषी विभागाने पुरेशी काळजी न घेतल्याने बंधारे पावसाळ्यात फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे बंधाºयाखाली असलेल्या शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याची शक्यताआहे.बांधाच्या तळाशी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असल्याने पाऊस थांबल्यास बंधारा रिकामा होऊ शकतो. मात्र, पावसाने कायम संततधार सुरू ठेवल्यास मातीच्या बांधाला पडलेल्या भेगामुळे बंधारा फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंधारा बांधताना मातीचा बांध हा दगडाने पिचिंग करून ठेवायचा असतो. ते न केल्याने बांधाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून, त्या भेगांमध्ये पावसाचे पाणी मुरल्यास बंधारा पूर्णपणे निकामी होऊन वाहून जाऊ शकतो.या भागात पाऊस चांगला झाला आहे. मात्र, कोणताही मातीचा बंधारा पाणीगळतीमुळे फुटून जाणार नाही, याची काळजी घेत आहोत.- किरण गंगावणे,कृषी सहायक

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारRaigadरायगड